शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कोटी कोटींची अमली ममता

By admin | Updated: June 24, 2016 01:00 IST

अडीच हजार कोटींचा आकडा, २३ टन एवढ्या प्रचंड प्रमाणात ड्रग्जचा साठा आणि त्यात एका जमान्यात अनेक सिनेमावेड्यांची लाडकी असलेली ममता कुलकर्णी हिचे चर्चेत आलेले नाव

अडीच हजार कोटींचा आकडा, २३ टन एवढ्या प्रचंड प्रमाणात ड्रग्जचा साठा आणि त्यात एका जमान्यात अनेक सिनेमावेड्यांची लाडकी असलेली ममता कुलकर्णी हिचे चर्चेत आलेले नाव, यामुळे सोलापूरकर चक्रावून गेले आहेत. सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत नक्की काय घडले आणि घडते आहे याविषयी कुणालाच कुणकुण कशी लागत नाही, याचीच चर्चा चालू आहे. साधी पानटपरी सुरू करायची तर हज्जार शासकीय अडथळे पार केल्यानंतर ती सुरू होते हा सर्वसामान्य अनुभव. पण इथे हजारो कोटींचे अवैध व्यवहार सुरू असताना कुठलाच अडथळा का आला नाही, हा प्रश्न सर्वांना सतावतो आहे. त्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला असता अनेक चिंताजनक मुद्दे पुढे आले. केमिकल कारखाने आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावरच या निमित्ताने प्रकाश पडतो आहे. सोलापूर शहरालगत १५ किलोमीटर अंतरावरील चिंचोली औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. ही कंपनी औषध निर्मितीचे काम करते आहे. जवळजवळ दीडशे लोकांना रोजगार देण्याचे काम या कंपनीने केले. निर्मिती होते पण नक्की कशाची याचा पत्ता मात्र त्या दीडशे लोकांना आजही लागलेला नाही. याच कंपनीतून इफेड्रीन हे अमली पदार्थ मानले जाणारे ड्रग पोलिसांनी हस्तगत केले आणि सर्वांचे डोळे उघडले.नायजेरियाच्या माफियाला ताब्यात घेतलेल्या ठाणे पोलिसांनी अमली पदार्थाचे सोलापूर कनेक्शन शोधून काढले. ठाणे पोलीसच या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर इफेड्रीन आणि अमली पदार्थ माफियांचे जाळे कसे विणले गेले आहे, याची माहिती त्यांनी उजेडात आणली. ड्रग डॉन गोस्वामी आणि त्याची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या सहभागापर्यंत पोलीस यंत्रणेचा तपास पोहोचला. देशात आणि विदेशात या प्रकरणाने खळबळ उडाली असताना सोलापुरात मात्र सामसूम असल्याचेच चित्र आजही दिसते. वास्तविक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या अमली पदार्थासारख्या विषयाचे कनेक्शन सोलापूरशी आहे म्हटल्याबरोबर जिल्हा प्रशासन खडबडून जागे व्हायला हवे होते. तसे न घडता जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणांनी बघ्याची भूमिका घेतली. कोणताही उद्योग सुरू होताना कंपनी कायद्यानुसार नोंदणीपासून ते अन्न व औषधी प्रशासनापर्यंतच्या असंख्य परवान्यांची गरज असते. उद्योग सुरू झाला तरी कामगार कायद्यापासून ते औषधी प्रशासनापर्यंतच्या अनेक तपासण्यांना दर महिन्याला उद्योगांना सामोरे जावे लागते. असा अनुभव एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीच्या बाबतीत आलाच नसेल काय? जर तशा तपासण्या वेळोवेळी झाल्या असतील तर अन्न व औषधी विभागाला त्यात काहीच का सापडले नाही. असे अनेक प्रश्न उभे राहतात. एरव्ही उद्योगाशी संबंधित सर्वच स्थानिक शासकीय यंत्रणा त्रुटी राहिली की कायद्याचा बडगा उगारताना दिसतात. तोच न्याय एव्हॉन कंपनीला वेळोवेळी लावला असता तर अमली पदार्थाचे जाळे वेळीच उद्ध्वस्त करता आले असते. त्यात औषध निर्मिती आणि त्यावरील नियंत्रण पद्धती यातील तांत्रिक गौडबंगालही सामान्य माणसाच्या विचारापलीकडचे आहे. शासनमान्य औषधांच्या फॉर्म्युल्यात थोडाबहुत फरक केला तरी तो अमली पदार्थ म्हणून वापरात येऊ शकतो, असे सांगितले जाते. त्याचाच फायदा अमली पदार्थ निर्मितीत गुंतलेले तस्कर घेतात. २० महिन्यांपूर्वी कुर्डूवाडीत एका कारखान्यात अशीच अमली पदार्थ निर्मिती झाल्याचे उघडकीस आले होते. त्या प्रकरणात स्थानिक ढवळे व शहा ही मंडळी आजही तुरुंगात आहेत. त्या प्रकरणाची पाळेमुळे आणि सूत्रधार आजही शोधले गेलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर एव्हॉन कंपनी आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचे रॅकेट सोलापूरच्या माध्यमातून कार्यरत असेल तर ती चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उद्योगांशी असलेल्या सर्वच विभागांचे मजबूत कुंपण कार्यरत करायला हवे तसे घडल्यास कोटी कोटींची अमली ममता रोखून सोलापूरही स्वच्छ राहील.- राजा माने