शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

न्यायालयाचे खडेबोल

By admin | Updated: March 8, 2017 02:47 IST

एका अल्पवयीन बलात्कारपीडितेस भरपाईची रक्कम देण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आपल्या या भूमिकेच्या समर्थनार्थ तिच्या मानसिक खच्चीकरणाचा होणारा प्रयत्न

एका अल्पवयीन बलात्कारपीडितेस भरपाईची रक्कम देण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आपल्या या भूमिकेच्या समर्थनार्थ तिच्या मानसिक खच्चीकरणाचा होणारा प्रयत्न म्हणजे शासनाच्या असंवेदनशीलतेचा कळसच म्हणावा लागेल. पीडित महिलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मोठा गाजावाजा करीत योजना जाहीर करायची अन् प्रत्यक्ष मदतीचा हात द्यायची वेळ आली की तिला योजनेच्या लाभापासून वंचित ठेवायचे हा कुठला राजधर्म? आपल्या कर्तव्यापासून विमूढ होणाऱ्या राज्य शासनाला मुंबई उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले हे फार चांगले झाले. ज्या प्रकरणात न्यायालयाने शासनाला खडसावले त्यातील पीडिता ही अवघ्या १४ वर्षांची आहे. मानसिकदृष्ट्या ती अद्याप परिपक्वही झालेली नाही. अशा परिस्थितीत हा प्रकार संमतीने झाला असल्याचा युक्तिवाद शासनाने करावा. तेसुद्धा तिला द्यावयाच्या नुकसानभरपाईच्या रकमेत कपात व्हावी म्हणून अत्यंत संतापजनक आहे. बलात्कारपीडितांना शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई हा त्यांचा हक्क आहे, याचाही विसर शासनाला पडला आहे का? शासनाच्या या भूमिकेमागे पुरुषी मानसिकता स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच गुजरातेतील न्यायालयाने बलात्काराच्या एका प्रकरणात अल्पवयीन मुलीसोबत सहमतीने शारीरिक संबंध ठेवले असले तरी तो गंभीर गुन्हा असल्याचे सांगून आरोपीस जामीन देण्यास नकार दिला आहे. या अनोख्या प्रकरणातील पीडित महिलेने तिच्या पतीवर लग्नाच्या तब्बल १६ वर्षांनंतर बलात्काराचा आरोप केला आहे. ती केवळ १३ वर्षांची असताना लग्नापूर्वी त्याने तिच्यावर बलात्कार केला होता असा आरोप आहे. देशातील विविध न्यायालयांमध्ये अत्याचाराच्या अशा हजारो प्रकरणात पीडित महिला न्यायासाठी संघर्ष करताना दिसतात आणि तिचा हा संघर्ष केवळ न्यायालयापुरताच मर्यादित नसतो तर कुटुंबात आणि समाजातही तिला त्याचे चटके सहन करावे लागतात. तिच्या नशिबी अपराध्याचेच जीवन येते, ही या समाजाची शोकांतिका आहे. खरे तर अशा अमानुषतेला बळी पडणारी स्त्री ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही पार खचली असते. हा एक अपघात मानून तिला नव्याने आयुष्य जगण्याची संधी देणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वप्रथम पुरुषी मानसिकता बदलावी लागेल.