शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचे खडेबोल

By admin | Updated: March 8, 2017 02:47 IST

एका अल्पवयीन बलात्कारपीडितेस भरपाईची रक्कम देण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आपल्या या भूमिकेच्या समर्थनार्थ तिच्या मानसिक खच्चीकरणाचा होणारा प्रयत्न

एका अल्पवयीन बलात्कारपीडितेस भरपाईची रक्कम देण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आपल्या या भूमिकेच्या समर्थनार्थ तिच्या मानसिक खच्चीकरणाचा होणारा प्रयत्न म्हणजे शासनाच्या असंवेदनशीलतेचा कळसच म्हणावा लागेल. पीडित महिलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मोठा गाजावाजा करीत योजना जाहीर करायची अन् प्रत्यक्ष मदतीचा हात द्यायची वेळ आली की तिला योजनेच्या लाभापासून वंचित ठेवायचे हा कुठला राजधर्म? आपल्या कर्तव्यापासून विमूढ होणाऱ्या राज्य शासनाला मुंबई उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले हे फार चांगले झाले. ज्या प्रकरणात न्यायालयाने शासनाला खडसावले त्यातील पीडिता ही अवघ्या १४ वर्षांची आहे. मानसिकदृष्ट्या ती अद्याप परिपक्वही झालेली नाही. अशा परिस्थितीत हा प्रकार संमतीने झाला असल्याचा युक्तिवाद शासनाने करावा. तेसुद्धा तिला द्यावयाच्या नुकसानभरपाईच्या रकमेत कपात व्हावी म्हणून अत्यंत संतापजनक आहे. बलात्कारपीडितांना शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई हा त्यांचा हक्क आहे, याचाही विसर शासनाला पडला आहे का? शासनाच्या या भूमिकेमागे पुरुषी मानसिकता स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच गुजरातेतील न्यायालयाने बलात्काराच्या एका प्रकरणात अल्पवयीन मुलीसोबत सहमतीने शारीरिक संबंध ठेवले असले तरी तो गंभीर गुन्हा असल्याचे सांगून आरोपीस जामीन देण्यास नकार दिला आहे. या अनोख्या प्रकरणातील पीडित महिलेने तिच्या पतीवर लग्नाच्या तब्बल १६ वर्षांनंतर बलात्काराचा आरोप केला आहे. ती केवळ १३ वर्षांची असताना लग्नापूर्वी त्याने तिच्यावर बलात्कार केला होता असा आरोप आहे. देशातील विविध न्यायालयांमध्ये अत्याचाराच्या अशा हजारो प्रकरणात पीडित महिला न्यायासाठी संघर्ष करताना दिसतात आणि तिचा हा संघर्ष केवळ न्यायालयापुरताच मर्यादित नसतो तर कुटुंबात आणि समाजातही तिला त्याचे चटके सहन करावे लागतात. तिच्या नशिबी अपराध्याचेच जीवन येते, ही या समाजाची शोकांतिका आहे. खरे तर अशा अमानुषतेला बळी पडणारी स्त्री ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही पार खचली असते. हा एक अपघात मानून तिला नव्याने आयुष्य जगण्याची संधी देणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वप्रथम पुरुषी मानसिकता बदलावी लागेल.