शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंशिस्त हाच उपचार; गेल्या ५ महिन्याच्या जीवनशैलीत बदलाची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:11 IST

चार महिने सणासुदीचे असले, तरी हे सण साजरे करताना त्याचे सार्वजनिकीकरण टाळण्याची व घरातच सण साजरे करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. सरकारने निर्बंध उठविले, तरी प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घातले पाहिजेत. गेल्या पाच महिन्यांत स्वीकार केलेल्या जीवनशैलीत बदलाची गरज नाही.

सरकारने आजपासून आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करण्यास मुभा दिली आहे. म्हणजे आता प्रवासासाठी परवानगीपत्राची आवश्यकता असणार नाही. याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात आली आहे, असा घेणे सर्वस्वी चूक आहे. उलट सरकारने अशा बिकट परिस्थितीत ही सवलत दिली. तिचा सन्मान राखण्याची जबाबदारीच सर्वांवर येऊन पडली आहे. आता कोणी अडवणार नाही. महाराष्ट्र शासनाने मात्र अद्याप ई-पासची सक्ती कायम ठेवली आहे. आता यापुढे ऊठसूट भटकण्याच्या वृत्तीला आपणच आवर घातला पाहिजे. म्हणजे सरकारने निर्बंध उठविले असले, तरी प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घातले पाहिजेत. नियमांच्या जंजाळामुळे गेल्या पाच महिन्यांत स्वीकार केलेल्या जीवनशैलीत बदल करण्याची अजिबात गरज नाही. कोरोना आटोक्यात नाही आणि सर्वसामान्यांपर्यंत लस उपलब्ध होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल, याची निश्चित तारीख कोणी देऊ शकत नाही.

पहिली लस भारतच तयार करणार व ऑगस्टच्या मुहूर्तावर ती येणार, अशी घोषणाघाई आपण केली आहेच. त्यामुळे कोरोना आटोक्यात आला असे समजू नये. महाराष्ट्राबाबत बोलायचे तर या महिन्याच्या पहिल्या १७ दिवसांत १ लाख ८२ हजार ८२४ रुग्णसंख्या वाढली आणि आजही मृत्युदर ३.३५ टक्के आहे. आरोग्यमंत्र्यांना तो एक टक्क्याच्या खाली आणायचा आहे. दुसरीकडे रुग्णवाढीचा वेग वाढत आहे. जेवढ्या जास्त चाचण्या, तेवढी रुग्णवाढ हे गणित कायम आहे, त्यात बदल नाही. मुंबईचा मृत्युदर ५.५४ टक्के, नंदुरबार ४.४८, सोलापूर ४.३५, अकोला ४.२४, लातूर ३.८३, जळगाव ३.७८ आणि रत्नागिरी ३.५९, अशी टक्केवारी या पहिल्या रांगेतील जिल्ह्याची असून, ती चिंताजनक आहे. रुग्ण शोधण्यासाठी प्रतिपिंड चाचण्याही वाढविण्यात आल्या. सध्या राज्यात दररोज पाच हजारांवर या चाचण्या होत आहेत. रुग्णसंख्या कितीही वाढली किंवा कमी झाली, तरी वस्तुस्थितीचे मोजमाप हे मृत्युदरावरून होत असते. ज्यावेळी हा दर कमी करण्यात आपण यशस्वी होऊ, त्यावेळी कोरोनावर मात करण्यासाठी पहिले पाऊल पडलेले असेल. थोडाफार दिलासा देणारी एक गोष्ट आढळते ती ‘सिरो’ चाचण्यांतून प्रतिपिंड तयार होण्याचे प्रमाण लक्षात येते. पुण्यात ५१ टक्के लोकांमध्ये प्रतिपिंड तयार झाल्याचा निष्कर्ष समोर आला.

Maharashtra to extend lockdown till May 31, areas outside COVID-19 ...

वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर या लोकांना संसर्ग झाला होता; पण त्यांनी त्यावर प्रतिकारशक्तीच्या जोरावर मात केली; परंतु प्रतिपिंड तयार होण्याची ही पहिली पायरी आहे, याचा अर्थ आता संसर्ग होऊ शकत नाही, असा सोयीचा घेता येणार नाही. हे वर्तमानाचे वास्तव आहे. त्याचे भान सर्वांनी राखले, तर खऱ्या अर्थाने अरिष्ट काय ते कोसळणार नाही. म्हणूनच देशभर प्रवासाची परवानगी असल्याने पाच महिन्यांच्या विजनवासावर पाणी फेरले जाऊ नये. उलट स्वयंशिस्त पाळण्याची जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मर्यादित वापर, गर्दी टाळणे व प्रतिकारशक्ती वाढवून स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे. राज्यातील २८ हजार ३५९ गावांनी आजवर हे नियम कसोशीने पाळल्याचे दिसते. कारण ४३,०२५ गावांपैकी ही २८,३५९ गावे आजही कोरोनामुक्त आहेत. या सर्व गावांनी स्वयंशिस्त पाळली. त्याचे हे फलित आहे. याचे अनुकरण शहरातील कॉलन्या, वस्त्यांनी केले पाहिजे. चित्रपटगृहे, मनोरंजनाचे कार्यक्रम, उपाहारगृहे, हॉटेल यांवरील निर्बंध कायम आहेत. आजच्या निर्णयानंतर यापुढे सरकारने रुग्णालयेही लहान मुले आणि इतर आजारांची पार्श्वभूमी असणाऱ्या कोविड रुग्णांसाठी प्राधान्याने उपलब्ध केली पाहिजेत. लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे. असे बाधित घरीच पथ्यपाणी पाळून कोरोनामुक्त होऊ शकतात, हे औरंगाबाद, नागपूर या शहरांतील अनुभवावरून स्पष्ट झाले आहे. गणरायाच्या आगमनापासून चार महिने सणासुदीचे असले, तरी ते साजरे करताना त्याचे सार्वजनिकीकरण कसोशीने टाळण्याची आणि घरातच सण साजरे करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. आपले व आसपासच्या लोकांचे यातच हित आहे. यापासून एवढा बोध घेऊन जीवनशैलीची नवी स्वयंशिस्त परंपरा आपण निर्माण केली पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या