शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंशिस्त हाच उपचार; गेल्या ५ महिन्याच्या जीवनशैलीत बदलाची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:11 IST

चार महिने सणासुदीचे असले, तरी हे सण साजरे करताना त्याचे सार्वजनिकीकरण टाळण्याची व घरातच सण साजरे करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. सरकारने निर्बंध उठविले, तरी प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घातले पाहिजेत. गेल्या पाच महिन्यांत स्वीकार केलेल्या जीवनशैलीत बदलाची गरज नाही.

सरकारने आजपासून आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करण्यास मुभा दिली आहे. म्हणजे आता प्रवासासाठी परवानगीपत्राची आवश्यकता असणार नाही. याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात आली आहे, असा घेणे सर्वस्वी चूक आहे. उलट सरकारने अशा बिकट परिस्थितीत ही सवलत दिली. तिचा सन्मान राखण्याची जबाबदारीच सर्वांवर येऊन पडली आहे. आता कोणी अडवणार नाही. महाराष्ट्र शासनाने मात्र अद्याप ई-पासची सक्ती कायम ठेवली आहे. आता यापुढे ऊठसूट भटकण्याच्या वृत्तीला आपणच आवर घातला पाहिजे. म्हणजे सरकारने निर्बंध उठविले असले, तरी प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घातले पाहिजेत. नियमांच्या जंजाळामुळे गेल्या पाच महिन्यांत स्वीकार केलेल्या जीवनशैलीत बदल करण्याची अजिबात गरज नाही. कोरोना आटोक्यात नाही आणि सर्वसामान्यांपर्यंत लस उपलब्ध होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल, याची निश्चित तारीख कोणी देऊ शकत नाही.

पहिली लस भारतच तयार करणार व ऑगस्टच्या मुहूर्तावर ती येणार, अशी घोषणाघाई आपण केली आहेच. त्यामुळे कोरोना आटोक्यात आला असे समजू नये. महाराष्ट्राबाबत बोलायचे तर या महिन्याच्या पहिल्या १७ दिवसांत १ लाख ८२ हजार ८२४ रुग्णसंख्या वाढली आणि आजही मृत्युदर ३.३५ टक्के आहे. आरोग्यमंत्र्यांना तो एक टक्क्याच्या खाली आणायचा आहे. दुसरीकडे रुग्णवाढीचा वेग वाढत आहे. जेवढ्या जास्त चाचण्या, तेवढी रुग्णवाढ हे गणित कायम आहे, त्यात बदल नाही. मुंबईचा मृत्युदर ५.५४ टक्के, नंदुरबार ४.४८, सोलापूर ४.३५, अकोला ४.२४, लातूर ३.८३, जळगाव ३.७८ आणि रत्नागिरी ३.५९, अशी टक्केवारी या पहिल्या रांगेतील जिल्ह्याची असून, ती चिंताजनक आहे. रुग्ण शोधण्यासाठी प्रतिपिंड चाचण्याही वाढविण्यात आल्या. सध्या राज्यात दररोज पाच हजारांवर या चाचण्या होत आहेत. रुग्णसंख्या कितीही वाढली किंवा कमी झाली, तरी वस्तुस्थितीचे मोजमाप हे मृत्युदरावरून होत असते. ज्यावेळी हा दर कमी करण्यात आपण यशस्वी होऊ, त्यावेळी कोरोनावर मात करण्यासाठी पहिले पाऊल पडलेले असेल. थोडाफार दिलासा देणारी एक गोष्ट आढळते ती ‘सिरो’ चाचण्यांतून प्रतिपिंड तयार होण्याचे प्रमाण लक्षात येते. पुण्यात ५१ टक्के लोकांमध्ये प्रतिपिंड तयार झाल्याचा निष्कर्ष समोर आला.

Maharashtra to extend lockdown till May 31, areas outside COVID-19 ...

वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर या लोकांना संसर्ग झाला होता; पण त्यांनी त्यावर प्रतिकारशक्तीच्या जोरावर मात केली; परंतु प्रतिपिंड तयार होण्याची ही पहिली पायरी आहे, याचा अर्थ आता संसर्ग होऊ शकत नाही, असा सोयीचा घेता येणार नाही. हे वर्तमानाचे वास्तव आहे. त्याचे भान सर्वांनी राखले, तर खऱ्या अर्थाने अरिष्ट काय ते कोसळणार नाही. म्हणूनच देशभर प्रवासाची परवानगी असल्याने पाच महिन्यांच्या विजनवासावर पाणी फेरले जाऊ नये. उलट स्वयंशिस्त पाळण्याची जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मर्यादित वापर, गर्दी टाळणे व प्रतिकारशक्ती वाढवून स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे. राज्यातील २८ हजार ३५९ गावांनी आजवर हे नियम कसोशीने पाळल्याचे दिसते. कारण ४३,०२५ गावांपैकी ही २८,३५९ गावे आजही कोरोनामुक्त आहेत. या सर्व गावांनी स्वयंशिस्त पाळली. त्याचे हे फलित आहे. याचे अनुकरण शहरातील कॉलन्या, वस्त्यांनी केले पाहिजे. चित्रपटगृहे, मनोरंजनाचे कार्यक्रम, उपाहारगृहे, हॉटेल यांवरील निर्बंध कायम आहेत. आजच्या निर्णयानंतर यापुढे सरकारने रुग्णालयेही लहान मुले आणि इतर आजारांची पार्श्वभूमी असणाऱ्या कोविड रुग्णांसाठी प्राधान्याने उपलब्ध केली पाहिजेत. लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे. असे बाधित घरीच पथ्यपाणी पाळून कोरोनामुक्त होऊ शकतात, हे औरंगाबाद, नागपूर या शहरांतील अनुभवावरून स्पष्ट झाले आहे. गणरायाच्या आगमनापासून चार महिने सणासुदीचे असले, तरी ते साजरे करताना त्याचे सार्वजनिकीकरण कसोशीने टाळण्याची आणि घरातच सण साजरे करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. आपले व आसपासच्या लोकांचे यातच हित आहे. यापासून एवढा बोध घेऊन जीवनशैलीची नवी स्वयंशिस्त परंपरा आपण निर्माण केली पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या