शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

स्वयंशिस्त हाच उपचार; गेल्या ५ महिन्याच्या जीवनशैलीत बदलाची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:11 IST

चार महिने सणासुदीचे असले, तरी हे सण साजरे करताना त्याचे सार्वजनिकीकरण टाळण्याची व घरातच सण साजरे करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. सरकारने निर्बंध उठविले, तरी प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घातले पाहिजेत. गेल्या पाच महिन्यांत स्वीकार केलेल्या जीवनशैलीत बदलाची गरज नाही.

सरकारने आजपासून आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करण्यास मुभा दिली आहे. म्हणजे आता प्रवासासाठी परवानगीपत्राची आवश्यकता असणार नाही. याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात आली आहे, असा घेणे सर्वस्वी चूक आहे. उलट सरकारने अशा बिकट परिस्थितीत ही सवलत दिली. तिचा सन्मान राखण्याची जबाबदारीच सर्वांवर येऊन पडली आहे. आता कोणी अडवणार नाही. महाराष्ट्र शासनाने मात्र अद्याप ई-पासची सक्ती कायम ठेवली आहे. आता यापुढे ऊठसूट भटकण्याच्या वृत्तीला आपणच आवर घातला पाहिजे. म्हणजे सरकारने निर्बंध उठविले असले, तरी प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घातले पाहिजेत. नियमांच्या जंजाळामुळे गेल्या पाच महिन्यांत स्वीकार केलेल्या जीवनशैलीत बदल करण्याची अजिबात गरज नाही. कोरोना आटोक्यात नाही आणि सर्वसामान्यांपर्यंत लस उपलब्ध होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल, याची निश्चित तारीख कोणी देऊ शकत नाही.

पहिली लस भारतच तयार करणार व ऑगस्टच्या मुहूर्तावर ती येणार, अशी घोषणाघाई आपण केली आहेच. त्यामुळे कोरोना आटोक्यात आला असे समजू नये. महाराष्ट्राबाबत बोलायचे तर या महिन्याच्या पहिल्या १७ दिवसांत १ लाख ८२ हजार ८२४ रुग्णसंख्या वाढली आणि आजही मृत्युदर ३.३५ टक्के आहे. आरोग्यमंत्र्यांना तो एक टक्क्याच्या खाली आणायचा आहे. दुसरीकडे रुग्णवाढीचा वेग वाढत आहे. जेवढ्या जास्त चाचण्या, तेवढी रुग्णवाढ हे गणित कायम आहे, त्यात बदल नाही. मुंबईचा मृत्युदर ५.५४ टक्के, नंदुरबार ४.४८, सोलापूर ४.३५, अकोला ४.२४, लातूर ३.८३, जळगाव ३.७८ आणि रत्नागिरी ३.५९, अशी टक्केवारी या पहिल्या रांगेतील जिल्ह्याची असून, ती चिंताजनक आहे. रुग्ण शोधण्यासाठी प्रतिपिंड चाचण्याही वाढविण्यात आल्या. सध्या राज्यात दररोज पाच हजारांवर या चाचण्या होत आहेत. रुग्णसंख्या कितीही वाढली किंवा कमी झाली, तरी वस्तुस्थितीचे मोजमाप हे मृत्युदरावरून होत असते. ज्यावेळी हा दर कमी करण्यात आपण यशस्वी होऊ, त्यावेळी कोरोनावर मात करण्यासाठी पहिले पाऊल पडलेले असेल. थोडाफार दिलासा देणारी एक गोष्ट आढळते ती ‘सिरो’ चाचण्यांतून प्रतिपिंड तयार होण्याचे प्रमाण लक्षात येते. पुण्यात ५१ टक्के लोकांमध्ये प्रतिपिंड तयार झाल्याचा निष्कर्ष समोर आला.

Maharashtra to extend lockdown till May 31, areas outside COVID-19 ...

वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर या लोकांना संसर्ग झाला होता; पण त्यांनी त्यावर प्रतिकारशक्तीच्या जोरावर मात केली; परंतु प्रतिपिंड तयार होण्याची ही पहिली पायरी आहे, याचा अर्थ आता संसर्ग होऊ शकत नाही, असा सोयीचा घेता येणार नाही. हे वर्तमानाचे वास्तव आहे. त्याचे भान सर्वांनी राखले, तर खऱ्या अर्थाने अरिष्ट काय ते कोसळणार नाही. म्हणूनच देशभर प्रवासाची परवानगी असल्याने पाच महिन्यांच्या विजनवासावर पाणी फेरले जाऊ नये. उलट स्वयंशिस्त पाळण्याची जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मर्यादित वापर, गर्दी टाळणे व प्रतिकारशक्ती वाढवून स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे. राज्यातील २८ हजार ३५९ गावांनी आजवर हे नियम कसोशीने पाळल्याचे दिसते. कारण ४३,०२५ गावांपैकी ही २८,३५९ गावे आजही कोरोनामुक्त आहेत. या सर्व गावांनी स्वयंशिस्त पाळली. त्याचे हे फलित आहे. याचे अनुकरण शहरातील कॉलन्या, वस्त्यांनी केले पाहिजे. चित्रपटगृहे, मनोरंजनाचे कार्यक्रम, उपाहारगृहे, हॉटेल यांवरील निर्बंध कायम आहेत. आजच्या निर्णयानंतर यापुढे सरकारने रुग्णालयेही लहान मुले आणि इतर आजारांची पार्श्वभूमी असणाऱ्या कोविड रुग्णांसाठी प्राधान्याने उपलब्ध केली पाहिजेत. लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे. असे बाधित घरीच पथ्यपाणी पाळून कोरोनामुक्त होऊ शकतात, हे औरंगाबाद, नागपूर या शहरांतील अनुभवावरून स्पष्ट झाले आहे. गणरायाच्या आगमनापासून चार महिने सणासुदीचे असले, तरी ते साजरे करताना त्याचे सार्वजनिकीकरण कसोशीने टाळण्याची आणि घरातच सण साजरे करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. आपले व आसपासच्या लोकांचे यातच हित आहे. यापासून एवढा बोध घेऊन जीवनशैलीची नवी स्वयंशिस्त परंपरा आपण निर्माण केली पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या