शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

पूर्णत्व आणि शांती

By admin | Updated: March 9, 2017 03:56 IST

शांती या तत्त्वाला जसे आध्यात्मिक मूल्य आहे तसेच व्यावहारिक जीवनातही शांती या तत्त्वाचे मूल्य सर्वश्रेष्ठ आहे. खरे तर कोणतेही मूल्य आध्यात्मिक आणि व्यावहारिक

- डॉ. रामचंद्र देखणेशांती या तत्त्वाला जसे आध्यात्मिक मूल्य आहे तसेच व्यावहारिक जीवनातही शांती या तत्त्वाचे मूल्य सर्वश्रेष्ठ आहे. खरे तर कोणतेही मूल्य आध्यात्मिक आणि व्यावहारिक अशा द्वंद्वांत बांधलेले नसते. आध्यात्मिकता ही सदाचारी जीवन व्यवहारापासून कधीच दूर गेलेली नसते. म्हणून तर आध्यात्मिक मूल्यांची परिणती आणि प्रत्यक्ष कृती ही व्यवहारी जीवनात उतरायला हवी अशीच धारणा आहे. दोहोंचाही विचार केला तर लक्षात येते की शांती ही वाटचाल, प्रसन्नता हा विसावा तर समाधान हा मुक्काम आहे. प्रत्येकालाच ही वाटचालही हवी आहे, विसावाही हवा आहे आणि मुक्कामही तत्त्ववेत्यांनी शांतीला खूप उच्चतम अवस्थेला नेऊन ठेवले आहे. शांती हेदेखील ब्रह्माचेच स्वरूप आहे. म्हणूनच शांतिब्रह्म ही अवस्था मांडली गेली. ज्ञात्याने जी वस्तू जाणावयाची ती पूर्णपणे जाणल्यावर मागून साता व ज्ञान ही ज्या ठिकाणी लय पावतात त्यालाच शांती असे म्हणतात. शांती हे मानवी पूर्णत्वाचे लक्षण आहे. ब्रह्मदारण्यकोपनिषदान शांतीमय आला आहे. ‘‘ॐ पूर्णमद: पूर्णमिंद पूर्णात्पूर्णमुदच्यते,पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।, ॐशांति:।शांति:।शांति:।’’ ॐ पूर्ण आहे. हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण निष्पन्न होते आणि पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक रहाते. यावर गुरुदेव रा. ड. रानडे यांनी सुंदर भाष्य केले आहे की, आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही पूर्ण आहेत. पूर्ण ब्रह्मातून पूर्ण आत्मा वजा केला तर पूर्णच शिल्लक रहाते. एका पूर्णामुळे दुसऱ्या पूर्णास पूर्ण अस्तित्व प्राप्त होते. पण, हे ब्रह्म, आत्मा किंवा एवढ्या जड जड विचारातून मांडलेले शांती तत्त्वाचे विवेचन हे सामान्यांच्या प्रतिभेला केव्हा समजणार? त्या संकल्पना आणखी सोपी करून सांगणे आवश्यक ठरते. इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ज्याला ज्ञानाने जाणायचे आहे ते ज्ञेय होय. आणि जो जाणणारा आहे तो ज्ञाता होय. ज्याला जाणायचे आहे त्याला जाणल्यावर ज्याने जाणले आहे त्याच्या ज्ञातेपणाचाही त्यात लय होतो आणि जे उरते ते शांतीचे रूप होय. अगदी व्यावहारिक भाषेत सांगायचे तर एखाद्याला एक सुंदरसे ध्येय गाठायचे असते. तो त्यासाठी खूप परिश्रम करतो. एक अवस्था अशी येते की त्याला जे ध्येय गाठायचे आहे ते त्याने मिळविलेले आहे मग आता त्या ध्येयामध्येच त्या ध्येयाविषयीची त्याची आसक्ती आणि ध्येयपूर्ती करणाऱ्याचा अभिमानही आपोआप विरतो आणि उरती ती शांती. थोडक्यात सांगायचे तर ज्ञानाचाही अहंकार आणि कर्माचाही अहंकार जाऊन अहंकारविरहित जी वृत्ती होते तीच शांती होय. खरे तर इथे आसक्ती संपलेली असते. कारण ध्येयाचेही पूर्णत्व प्राप्त झालेले असते. थोडक्यात समाधानाचे आणि तृप्तीचे पूर्णत्व म्हणजे शांती.