शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

भाष्य - मराठी वंचितच?

By admin | Updated: May 4, 2017 00:15 IST

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य सरकारने हा

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य सरकारने हा दर्जा देण्यासाठी आवश्यक असलेला दोन हजार वर्षांपूर्वीपासूनच्या पुराव्यांचा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवला. या घटनेला १२ जुलै रोजी चार वर्षं पूर्ण होतील. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास विरोध करणारी मद्रास उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिकाही निकाली निघाली. यास दोन महिने उलटले. या सर्व घडमोडी पाहता मराठी ‘अभिजात’पासून वंचितच राहणार का, असा प्रश्न समोर येत आहे. केंद्र सरकारकडून एखाद्या भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्यास त्या भाषेची उंची वाढते. भाषेच्या संवर्धनसाठी निधी उपलब्ध होतो. आतापर्यंत तमिळ, कन्नड, संस्कृत, ओडिया, तेलुगू, मल्याळम या सहा भाषांना हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. हा दर्जा मिळविण्यासाठी काही निकष ठरवलेले आहेत. या निकषात मराठी भाषा बसते. हे सर्वांनाच माहिती आहे. तरीही दर्जा मिळत नसल्यामुळे साहित्यिकांसह मराठीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. १० जानेवारी २०१२ रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अभिजात मराठी भाषा समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीने सर्व ऐतिहासिक पुरावे गोळा करत अहवाल सादर केला. यात भाषेच्या प्राचीनत्वसाठी सातवाहनांच्या काळातील ‘गाथासत्सई’ या ग्रंथातील गंगथडीचे किंवा गोदाकाठच्या प्रदेशातील संदर्भ महत्त्वाचे आहेत. याशिवाय ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ या १२व्या शतकातील ग्रंथातील भाषा अतिशय प्रगल्भ, विकसित झालेली आहे. याशिवाय विविध शिलालेखांतून मराठी भाषेचे संदर्भ समोर आले आहेत. असे अनेक जिवंत पुरावे ‘अभिजात’साठी पुरेसे ठरतात. तरीही ‘अभिजात’ दर्जा रेंगाळतच आहे. तमिळ भाषेला अभिजात दर्जा देताना इ.स. पूर्व ‘तमिळ संघम’ या नावाच्या संस्थेने काही साहित्याची निर्मिती, लेखन केल्याचा पुरावा ग्राह्य मानून दर्जा बहाल केला. मराठीकडे तर थेट ग्रंथ, शिलालेख, आयुर्वेद, वैद्यकशास्त्रातील असंख्य पुस्तकांची निर्मिती मराठी भाषेत झालेली आढळते. तरीही दर्जा देण्यात येत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मद्रास उच्च न्यायालयातील याचिका निकाली निघाल्यामुळे ‘महाराष्ट्रदिनी’ म्हणजेच १ मेला मराठीला अभिजात दर्जा देण्याची अपेक्षा होती. मात्र तमाम मराठी जनतेचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला. स्वातंत्र्यानंतर सर्वत्र भाषिक तत्त्वावर राज्यांची निर्मिती झाली. मात्र मराठी भाषिकांचे राज्य निर्मितीसाठी संघर्ष करावा लागला होता. १०५ हुतात्म्यांनंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा इतिहास समोर ठेवून पुन्हा एकदा मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी लढा उभारावा लागणार हे नक्की.