शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - महाराजाची अखेर?

By admin | Updated: June 1, 2017 00:16 IST

गत काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत असलेल्या एअर इंडियाचा शुभंकर असलेला महाराजा कदाचित लवकरच इतिहासजमा होईल. प्रचंड

गत काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत असलेल्या एअर इंडियाचा शुभंकर असलेला महाराजा कदाचित लवकरच इतिहासजमा होईल. प्रचंड तोट्याच्या दलदलीत फसलेली एअर इंडिया ही भारत सरकारच्या मालकीची सरकारी कंपनी विकून टाकण्याचा सल्ला नीती आयोगाने दिला आहे. भारतीयांचा भावनाप्रधान स्वभाव विचारात घेता, नीती आयोगाच्या या सल्ल्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे; मात्र थंड डोक्याने विचार केल्यास नीती आयोगाचा सल्ला मानण्यातच शहाणपण आहे. यापूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारने एअर इंडियाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तब्बल ३० हजार कोटी रुपयांचे ‘बेलआउट पॅकेज’ दिले होते; मात्र त्याचा काहीही फायदा झालेला नाही. सध्याच्या घडीला एअर इंडियाचा तोटा तब्बल साठ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे. गत काही वर्षात देशात अनेक खासगी एअरलाईन्स सुरू झाल्या आहेत आणि त्या प्रवाशांना चांगली सेवा देत आहेत. त्यामुळे विमान कंपनी चालविणे, हा खचितच सरकारच्या प्राधान्यक्रमावरील विषय असू नये. हा सरकारी हत्ती अजूनही पोसायचा झाल्यास, भारत सरकारला त्यामध्ये आणखी पैसा ओतावा लागेल. उलटपक्षी जर ही कंपनी विकून टाकली, तर तो पैसा सरकारला जनकल्याणकारी योजनांसाठी वापरता येईल. अर्थात हे कागदावर कितीही आकर्षक वाटत असले तरी, प्रत्यक्षात एअर इंडियाचे निर्गुंतवणुकीकरण हे काही सोपे काम नाही. कोणतीही खासगी कंपनी कर्जाच्या दलदलीत गळ्यापर्यंत रुतलेल्या या सरकारी हत्तीचे लोढणे स्वत:च्या गळ्यात घालून घ्यायला सहजासहजी तयार होणार नाही. एअर इंडियावरील एकूण कर्जापैकी नऊ हजार कोटींच्या कर्जाचे समभागांमध्ये रूपांतर करण्यास नुकताच कर्जदार बॅँकांनी नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर एअर इंडिया विकत घेणाऱ्या कंपनीस एक तर कर्जाची परतफेड करावी लागेल, वा स्वत:चे दिवाळे वाजवून घेण्यास सिद्ध व्हावे लागेल. प्रचंड मोठे कर्ज आणि तुलनात्मकरीत्या खूप जास्त ‘आॅपरेटिंग कॉस्ट’मुळे एअर इंडियाची सध्याची नफ्याची पातळी कर्ज परतफेडीसाठी सक्षम होण्याइतपत वाढविणे हे काही सोपे काम नाही. भरीस भर म्हणून देशात १९९० मध्ये खासगी एअरलाइन्सचे युग सुरू झाल्यापासून प्रत्येक एअर इंडियाचा बाजारातील हिस्सा खालावतच गेला आहे. त्यामुळे कोणतीही खासगी कंपनी आहे त्या स्थितीत एअर इंडिया विकत घेण्यास तयार होईल, असे वाटत नाही. देशातील प्रमुख शहरांमध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली मालमत्ता हे खरेदीदारासाठी एकमेव आकर्षण असू शकते; पण शेवटी सरकार एअर इंडियाचे मूल्य किती निर्धारित करते, यावरच पुढील खेळ अवलंबून असेल. सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे सरकारने कितीही मूल्य निर्धारित केले, तरी विरोधी पक्ष, तसेच लेखा परीक्षण संस्थांकडून त्यावर आक्षेप घेतला जाणारच ! त्यामुळे सरकारच्या कितीही मनात असले तरी महाराजाची अखेर करणे सोपे नाही, हे निश्चित!