शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

भाष्य - महाराजाची अखेर?

By admin | Updated: June 1, 2017 00:16 IST

गत काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत असलेल्या एअर इंडियाचा शुभंकर असलेला महाराजा कदाचित लवकरच इतिहासजमा होईल. प्रचंड

गत काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत असलेल्या एअर इंडियाचा शुभंकर असलेला महाराजा कदाचित लवकरच इतिहासजमा होईल. प्रचंड तोट्याच्या दलदलीत फसलेली एअर इंडिया ही भारत सरकारच्या मालकीची सरकारी कंपनी विकून टाकण्याचा सल्ला नीती आयोगाने दिला आहे. भारतीयांचा भावनाप्रधान स्वभाव विचारात घेता, नीती आयोगाच्या या सल्ल्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे; मात्र थंड डोक्याने विचार केल्यास नीती आयोगाचा सल्ला मानण्यातच शहाणपण आहे. यापूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारने एअर इंडियाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तब्बल ३० हजार कोटी रुपयांचे ‘बेलआउट पॅकेज’ दिले होते; मात्र त्याचा काहीही फायदा झालेला नाही. सध्याच्या घडीला एअर इंडियाचा तोटा तब्बल साठ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे. गत काही वर्षात देशात अनेक खासगी एअरलाईन्स सुरू झाल्या आहेत आणि त्या प्रवाशांना चांगली सेवा देत आहेत. त्यामुळे विमान कंपनी चालविणे, हा खचितच सरकारच्या प्राधान्यक्रमावरील विषय असू नये. हा सरकारी हत्ती अजूनही पोसायचा झाल्यास, भारत सरकारला त्यामध्ये आणखी पैसा ओतावा लागेल. उलटपक्षी जर ही कंपनी विकून टाकली, तर तो पैसा सरकारला जनकल्याणकारी योजनांसाठी वापरता येईल. अर्थात हे कागदावर कितीही आकर्षक वाटत असले तरी, प्रत्यक्षात एअर इंडियाचे निर्गुंतवणुकीकरण हे काही सोपे काम नाही. कोणतीही खासगी कंपनी कर्जाच्या दलदलीत गळ्यापर्यंत रुतलेल्या या सरकारी हत्तीचे लोढणे स्वत:च्या गळ्यात घालून घ्यायला सहजासहजी तयार होणार नाही. एअर इंडियावरील एकूण कर्जापैकी नऊ हजार कोटींच्या कर्जाचे समभागांमध्ये रूपांतर करण्यास नुकताच कर्जदार बॅँकांनी नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर एअर इंडिया विकत घेणाऱ्या कंपनीस एक तर कर्जाची परतफेड करावी लागेल, वा स्वत:चे दिवाळे वाजवून घेण्यास सिद्ध व्हावे लागेल. प्रचंड मोठे कर्ज आणि तुलनात्मकरीत्या खूप जास्त ‘आॅपरेटिंग कॉस्ट’मुळे एअर इंडियाची सध्याची नफ्याची पातळी कर्ज परतफेडीसाठी सक्षम होण्याइतपत वाढविणे हे काही सोपे काम नाही. भरीस भर म्हणून देशात १९९० मध्ये खासगी एअरलाइन्सचे युग सुरू झाल्यापासून प्रत्येक एअर इंडियाचा बाजारातील हिस्सा खालावतच गेला आहे. त्यामुळे कोणतीही खासगी कंपनी आहे त्या स्थितीत एअर इंडिया विकत घेण्यास तयार होईल, असे वाटत नाही. देशातील प्रमुख शहरांमध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली मालमत्ता हे खरेदीदारासाठी एकमेव आकर्षण असू शकते; पण शेवटी सरकार एअर इंडियाचे मूल्य किती निर्धारित करते, यावरच पुढील खेळ अवलंबून असेल. सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे सरकारने कितीही मूल्य निर्धारित केले, तरी विरोधी पक्ष, तसेच लेखा परीक्षण संस्थांकडून त्यावर आक्षेप घेतला जाणारच ! त्यामुळे सरकारच्या कितीही मनात असले तरी महाराजाची अखेर करणे सोपे नाही, हे निश्चित!