शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

भाष्य - महाराजाची अखेर?

By admin | Updated: June 1, 2017 00:16 IST

गत काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत असलेल्या एअर इंडियाचा शुभंकर असलेला महाराजा कदाचित लवकरच इतिहासजमा होईल. प्रचंड

गत काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत असलेल्या एअर इंडियाचा शुभंकर असलेला महाराजा कदाचित लवकरच इतिहासजमा होईल. प्रचंड तोट्याच्या दलदलीत फसलेली एअर इंडिया ही भारत सरकारच्या मालकीची सरकारी कंपनी विकून टाकण्याचा सल्ला नीती आयोगाने दिला आहे. भारतीयांचा भावनाप्रधान स्वभाव विचारात घेता, नीती आयोगाच्या या सल्ल्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे; मात्र थंड डोक्याने विचार केल्यास नीती आयोगाचा सल्ला मानण्यातच शहाणपण आहे. यापूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारने एअर इंडियाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तब्बल ३० हजार कोटी रुपयांचे ‘बेलआउट पॅकेज’ दिले होते; मात्र त्याचा काहीही फायदा झालेला नाही. सध्याच्या घडीला एअर इंडियाचा तोटा तब्बल साठ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे. गत काही वर्षात देशात अनेक खासगी एअरलाईन्स सुरू झाल्या आहेत आणि त्या प्रवाशांना चांगली सेवा देत आहेत. त्यामुळे विमान कंपनी चालविणे, हा खचितच सरकारच्या प्राधान्यक्रमावरील विषय असू नये. हा सरकारी हत्ती अजूनही पोसायचा झाल्यास, भारत सरकारला त्यामध्ये आणखी पैसा ओतावा लागेल. उलटपक्षी जर ही कंपनी विकून टाकली, तर तो पैसा सरकारला जनकल्याणकारी योजनांसाठी वापरता येईल. अर्थात हे कागदावर कितीही आकर्षक वाटत असले तरी, प्रत्यक्षात एअर इंडियाचे निर्गुंतवणुकीकरण हे काही सोपे काम नाही. कोणतीही खासगी कंपनी कर्जाच्या दलदलीत गळ्यापर्यंत रुतलेल्या या सरकारी हत्तीचे लोढणे स्वत:च्या गळ्यात घालून घ्यायला सहजासहजी तयार होणार नाही. एअर इंडियावरील एकूण कर्जापैकी नऊ हजार कोटींच्या कर्जाचे समभागांमध्ये रूपांतर करण्यास नुकताच कर्जदार बॅँकांनी नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर एअर इंडिया विकत घेणाऱ्या कंपनीस एक तर कर्जाची परतफेड करावी लागेल, वा स्वत:चे दिवाळे वाजवून घेण्यास सिद्ध व्हावे लागेल. प्रचंड मोठे कर्ज आणि तुलनात्मकरीत्या खूप जास्त ‘आॅपरेटिंग कॉस्ट’मुळे एअर इंडियाची सध्याची नफ्याची पातळी कर्ज परतफेडीसाठी सक्षम होण्याइतपत वाढविणे हे काही सोपे काम नाही. भरीस भर म्हणून देशात १९९० मध्ये खासगी एअरलाइन्सचे युग सुरू झाल्यापासून प्रत्येक एअर इंडियाचा बाजारातील हिस्सा खालावतच गेला आहे. त्यामुळे कोणतीही खासगी कंपनी आहे त्या स्थितीत एअर इंडिया विकत घेण्यास तयार होईल, असे वाटत नाही. देशातील प्रमुख शहरांमध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली मालमत्ता हे खरेदीदारासाठी एकमेव आकर्षण असू शकते; पण शेवटी सरकार एअर इंडियाचे मूल्य किती निर्धारित करते, यावरच पुढील खेळ अवलंबून असेल. सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे सरकारने कितीही मूल्य निर्धारित केले, तरी विरोधी पक्ष, तसेच लेखा परीक्षण संस्थांकडून त्यावर आक्षेप घेतला जाणारच ! त्यामुळे सरकारच्या कितीही मनात असले तरी महाराजाची अखेर करणे सोपे नाही, हे निश्चित!