शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना खरं सांगायची भीतीच वाटते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 05:49 IST

पर्यावरणाबद्दल केवळ भान असणं पुरेसं नाही, सजग कृतीकडं सरकणं हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे!

- प्रियदर्शिनी कर्वे, पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाच्या पुरस्कर्त्याकोरोनाकाळानं जागतिक पर्यावरणाबद्दल माणसांचं भान अधिक ठळक केलं, असं वाटतं का? तुमचा स्वत:चा अनुभव काय?पर्यावरणाकडं लोक जरा जास्त रोखून बघायला लागले, हे खरं; पण सुरुवातीला  ‘पर्यावरणाचा ऱ्हास केलात ना? आता भोगा शिक्षा!’ अशा प्रतिक्रिया होत्या. घरामध्ये स्वस्थ बसून लोक या अशा सोशल मीडिया पोस्ट टाकत होते, तेव्हा शेकडो किलोमीटर्स पायपीट करून असंख्य माणसं हालअपेष्टा सोसत, उपाशीतापाशी  स्वत:च्या गावा-घराकडं निघाली होती. शिक्षा भोगण्याबद्दलच्या चर्चा करताना ही विसंगती मला खुपत होती. ‘पर्यावरण’ म्हटल्यावर त्यातली माणसं त्याचा भाग नाहीत का?  मानवी हस्तक्षेप घटल्यामुळं स्वच्छ झालेली तळी नि नद्या, अचानक दिसायला लागलेले पक्षी, यांच्याबद्दलचे उमाळे  सर्वसामान्य उच्च मध्यमवर्गीय माणूस असे काही काढतो, जसं पर्यावरणाचा ऱ्हास कोणी दुसऱ्यानं केला होता! जे हे लिहितात ते या ऱ्हासाला व उद्भवलेल्या समस्यांना जबाबदार नसतात का?  जानेवारीत २०२० मध्ये जेव्हा आम्ही काही लोकांनी जगभरातले आढावे घेऊन लोकांशी बोलायला, त्यांना सावध करायला सुरूवात केली तेव्हा लोक गांभीर्यानं घेत नव्हते. कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढू लागली तशा चर्चा समोर येऊ लागल्या, की परदेशात साथीचं थैमान खूपच वाढलंय त्यामानानं आपल्याकडं कमी आहे. मुळात त्यावेळी चाचण्या करण्याचं प्रमाण अत्यंत कमी होतं. शिवाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही तोपर्यंत पूर्ण चित्र समोर येत नाही, हा मुद्दा बऱ्याच ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी केला.  

पुढच्या लाटेत तीव्र संसर्गानं माणसं मरू लागली तेव्हा आकडे लपवणं सरकारला कठीण होऊन बसलं. पर्यावरण असा शब्द उच्चारला की, माणसासहित पर्यावरण मी मानत असल्यामुळं पर्यावरणाबद्दल भान असणं व सजग कृतीकडं सरकणं या गोष्टींमध्ये अंतर राहतंय. ते ठळक झालं.नैसर्गिक व कोविडसारख्या  आपत्तींचं वाढतं प्रमाण पाहता डिग्रोथ, मिनिमलिझम अशा संकल्पनांना बळ मिळेल असं वाटतंय?‘पर्यावरणस्नेही जीवनशैली’ नावाची एक कार्यशाळा आम्ही घेतो. त्यावेळी चर्चेचा एक मुद्दा असतो की, आपण संसाधनांचा वापर कमीत कमी करून पर्यावरणावरचा ताण कसा कमी करू शकतो, याचा विचार करायचा! पाणी वाचवणं, कचऱ्याचं वर्गीकरण करणं, हे विचार तिथं सुरू होतात तेव्हा अनेक जण दोन तऱ्हेचे प्रश्‍न विचारतात, ‘आम्ही घरी काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांना हे कसं पटवून सांगू?’ व ‘ग्रामीण भागातील लोकांना हे कसं शिकवायचं?’शहरांमध्ये संसाधनांची उधळमाधळ अधिक होते, तेव्हा ग्रामीण भागात जाऊन समजावण्याची काहीच गरज नाही. घरात काम करायला येणारी बाई दहा घरी काम करत असेल, तर तिचा भर दहा मिनिटांत काम संपवून जाण्याकडं असणार. तुमचं पाणी तिनं वाचवावं म्हणून तिनं दहा मिनिटं वाढवून काम करावं, असं वाटत असेल, तर तिला तिच्या वेळेसाठी वाढवून मेहनताना द्यायला हवा. तिची प्राथमिकता काय आहे, हे समजून न घेता तुम्ही उपाययोजना करणार असाल, तर कठीण आहे. आपल्याला स्वत:च्या सवयी बदलायच्या नाहीत, म्हणून  दुसऱ्याचं नाव पुढं करून आपण सुटू पाहतोय. 
पर्यावरणीय प्रश्‍न निघाले की, बऱ्याचदा गाडी लोकसंख्या वाढीकडं घसरते. जन्मदर संपूर्ण जगभरात कमी होत चाललेला आहे, अशावेळी लोकसंख्या वाढत्या आयुर्मानामुळं फुगून दिसते आहे. मुळात आपल्या समस्येला कुणी अन्य लोक जबाबदार आहेत, हा नजरिया बदलायला हवा आहे. मिनिमलिझम म्हणजेच गरजेपेक्षा एकही गोष्ट जास्तीची न वापरता कमीत कमी संसाधनात निर्वाह करणं! ही गोष्टही कुणीतरी दुसऱ्यांनी करावी असं म्हणणारेच जास्त. कुठल्याही समस्यापूर्तीसाठी आपल्या देशातली मुख्य अडचण ही व्यवस्थापन व नियोजनाबाबतीत आहे. एकट्या माणसाच्या प्रयत्नातून उत्तर शोधता येणं कठीण. उदा. खाजगी गाड्यांचा वापर इतका प्रचंड आहे, त्यामुळं प्रदूषण वाढत आहे. - याचं मूळ आहे गबाळी व नियोजनशून्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. ती सुधारण्याबाबतीत प्रश्‍न न विचारता खाजगी गाड्यांकडं बोट दाखवणं ही सोपी वाट. असं सगळ्याच प्रश्‍नांविषयी घडतं आपल्याकडं. ज्या गोष्टीत जनतेनं बदल करायला हवा, त्या बदलासाठी पूरक परिस्थिती निर्माण करणं हे शासनव्यवस्थेचं कर्तव्य व जबाबदारी आहे. त्यासाठी आवाज उठवणं हेही पर्यावरणासाठी काम करणं आहे. प्रत्येक माणसाला पर्यावरणपूरक व आत्मसन्मानानं जगण्याच्या यंत्रणा असत्या व तरीही माणसं उधळमाधळ करत असती, तर मिनिमलिझम वगैरे मुद्दे बोलू. ते आज युरोप अमेरिकेत घडतंय!
रस्त्यावर उतरून आपापल्या सरकारांना पर्यावरणप्रश्‍नी जाब विचारणारी, कोर्टात खेचणारी मुलं हे चित्र तुम्हाला आशादायी वाटतं का?आपण आपलं कर्तव्य करत नाही आहोत, म्हणून मुलांना जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. हे चित्र आशादायी कसं म्हणू?  पर्यावरणीय प्रश्‍नांची तड लागली नाही, तर आयुष्य जगणं कठीण आहे, या भीती व नैराश्यातून जगभरातली मुलं रस्त्यावर उतरताहेत. ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या प्लॅटफॉर्मवर ही मुलं  एकत्र येऊन आवाहन करत आहेत.  रस्त्यावर येणं ही त्यांच्यादृष्टीनं अस्तित्वाची लढाई आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना जागतिक आयाम देणं, एका मोठ्या समस्येशी नाळ जोडून घेत समस्येच्या उपचारामध्ये आपलं स्थान नेमकं कुठं आहे, याची जाणीव करून देणं याचं उत्तरदायित्व नागरिकांनी व यंत्रणांनी स्वीकारणं गरजेचं आहे. तसं केलं नाही, तर येत्या दहा-वीस वर्षांत मोठ्या झालेल्या या मुलांनी श्‍वास कसा घ्यायचा?  वाढत्या वयातल्या मुलांना पर्यावरणीय व अस्तित्वाच्या प्रश्‍नांबद्दल माहिती असण्यातून शासकीय यंत्रणांवरचा दबाव वाढू शकतो; पण मुलांच्या चळवळीबद्दल प्रशंसोद्गार काढताना मला कचरायला होतं. या मुला-मुलींना गोळा करून त्यांना ‘तुमचं भविष्य अंधकारमय आहे.’ हे सांगणं मला भीतिदायकच वाटतं. मुलाखत : सोनाली नवांगुळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण