शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

बदलते अर्थकारण बदलत्या हवामानास कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:06 IST

हवामानासह तापमानातील बदल थांबवायचे असल्यास वातावरणावर प्रभाव टाकतील, असे वायू मर्यादित प्रमाणात सोडणे क्रमप्राप्त आहे.

सचिन लुंगसेहवामानासह तापमानातील बदल थांबवायचे असल्यास वातावरणावर प्रभाव टाकतील, असे वायू मर्यादित प्रमाणात सोडणे क्रमप्राप्त आहे. याकरिता प्रत्येकाने स्वत:वर बंधन घालणे गरजेचे आहे. अमेरिका व युरोपने एवढे प्रदूषण केले आहे की, ते रोखण्यासाठी त्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. ऊन, पाऊस, वारा यांच्या दिशा, तीव्रता आणि दशा बदलत आहेत. बदलांचा संबंध राहणीमानाशी जोडला जात आहे. इंधनाच्या जळणामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. हे घटक हवामान बदलास कारणीभूत आहेत.समुद्राची पातळी वाढल्याने शहरे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. वेळी-अवेळी पाऊस, गारा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पिके नष्ट होत आहेत. परिणामी, शेतकरी वर्गाचे जीवन जगणे कठीण होत आहे. तापमानाच्या चटक्याने सामान्य माणूस हैराण होत आहे.कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रत्येक देशाने प्रयत्न करण्याची गरज असताना, विकसनशील आणि विकसित देश यांच्यामधील याबाबतचे धोरण स्पष्ट नाही; आणि धोरण स्पष्ट असले, तरी प्रत्यक्षात कृती वेगाने होत नाही, असे चित्र आहे. निसर्गाचे चक्र बिघडण्यास हवामानातील बदल कारणीभूत आहेत. हवामान बदलाचा फटका कृषी, पाणी, वन व मानवी आरोग्य यास बसत आहे. मात्र, हे कोणीही मान्य करत नाही. महत्त्वाचे म्हणजे, याचा सर्वात मोठा परिणाम आरोग्यावर होत असून, यावरही देशांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे.आपली अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. त्यामुळे हवामानाच्या बदलाला सामोरे जाण्याची गरज शेतीसह त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येकाला आहे. कृषीला हवामान बदलाचा फटका बसणार नाही, अशी यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने प्रयत्नशील असले पाहिजे. विकसित देश हवामान बदलास सामोरे जात असताना त्यांच्या उपाययोजना असल्या, तरी विकसनशील देशांची अवस्था तशी नाही. परिणामी, त्यांना नैसर्गिक आपत्तींचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागत आहे. याचा परिणाम विकसनशील देशांच्या आर्थिक प्रगतीवर होत आहे.एका अर्थाने बदलती आणि चुकीच्या पद्धतीने जाणारी अर्थव्यवस्था, औद्योगिकीकरणाचा वाढता भस्मासूर, बदललेली जीवनशैली हे घटक बदलत्या हवामानाशी जोडले गेले आहेत. हवामान बदलत असल्याने त्याचा वेगाने वेध घेताना हवामान विभागासमोरही आव्हाने उभी आहेत. अलीकडच्या काळात हवामान विभाग अत्याधुनिक होत असला, तरीदेखील प्रत्यक्षात निसर्गाच्या पुढे तंत्रज्ञान फार काळ टिकत नाही, हे सर्वश्रुत आहे.हवामानाचे अंदाज चुकत नाहीत तर ते बदलतात, हे हवामान विभागाचे नेहमीचे वाक्य आहे. तरीदेखील बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज घेण्याबाबत हवामान विभागाने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून आपल्या कार्यप्रणालीत वेग आणला असला, तरीदेखील आपणास अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. हवामान बदल ही अपवादात्मक परिस्थिती नाही. तो बदल सुरूच आहे. परिणामी, जगाला भीती वाटते आहे. आता नुसता विचार करून चालणार नाही, बदलत्या हवामानाचा बदलता अंदाज घेण्यासाठी हवामान खात्याने सक्षम झाले पाहिजे.