शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

बदलते अर्थकारण बदलत्या हवामानास कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:06 IST

हवामानासह तापमानातील बदल थांबवायचे असल्यास वातावरणावर प्रभाव टाकतील, असे वायू मर्यादित प्रमाणात सोडणे क्रमप्राप्त आहे.

सचिन लुंगसेहवामानासह तापमानातील बदल थांबवायचे असल्यास वातावरणावर प्रभाव टाकतील, असे वायू मर्यादित प्रमाणात सोडणे क्रमप्राप्त आहे. याकरिता प्रत्येकाने स्वत:वर बंधन घालणे गरजेचे आहे. अमेरिका व युरोपने एवढे प्रदूषण केले आहे की, ते रोखण्यासाठी त्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. ऊन, पाऊस, वारा यांच्या दिशा, तीव्रता आणि दशा बदलत आहेत. बदलांचा संबंध राहणीमानाशी जोडला जात आहे. इंधनाच्या जळणामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. हे घटक हवामान बदलास कारणीभूत आहेत.समुद्राची पातळी वाढल्याने शहरे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. वेळी-अवेळी पाऊस, गारा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पिके नष्ट होत आहेत. परिणामी, शेतकरी वर्गाचे जीवन जगणे कठीण होत आहे. तापमानाच्या चटक्याने सामान्य माणूस हैराण होत आहे.कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रत्येक देशाने प्रयत्न करण्याची गरज असताना, विकसनशील आणि विकसित देश यांच्यामधील याबाबतचे धोरण स्पष्ट नाही; आणि धोरण स्पष्ट असले, तरी प्रत्यक्षात कृती वेगाने होत नाही, असे चित्र आहे. निसर्गाचे चक्र बिघडण्यास हवामानातील बदल कारणीभूत आहेत. हवामान बदलाचा फटका कृषी, पाणी, वन व मानवी आरोग्य यास बसत आहे. मात्र, हे कोणीही मान्य करत नाही. महत्त्वाचे म्हणजे, याचा सर्वात मोठा परिणाम आरोग्यावर होत असून, यावरही देशांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे.आपली अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. त्यामुळे हवामानाच्या बदलाला सामोरे जाण्याची गरज शेतीसह त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येकाला आहे. कृषीला हवामान बदलाचा फटका बसणार नाही, अशी यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने प्रयत्नशील असले पाहिजे. विकसित देश हवामान बदलास सामोरे जात असताना त्यांच्या उपाययोजना असल्या, तरी विकसनशील देशांची अवस्था तशी नाही. परिणामी, त्यांना नैसर्गिक आपत्तींचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागत आहे. याचा परिणाम विकसनशील देशांच्या आर्थिक प्रगतीवर होत आहे.एका अर्थाने बदलती आणि चुकीच्या पद्धतीने जाणारी अर्थव्यवस्था, औद्योगिकीकरणाचा वाढता भस्मासूर, बदललेली जीवनशैली हे घटक बदलत्या हवामानाशी जोडले गेले आहेत. हवामान बदलत असल्याने त्याचा वेगाने वेध घेताना हवामान विभागासमोरही आव्हाने उभी आहेत. अलीकडच्या काळात हवामान विभाग अत्याधुनिक होत असला, तरीदेखील प्रत्यक्षात निसर्गाच्या पुढे तंत्रज्ञान फार काळ टिकत नाही, हे सर्वश्रुत आहे.हवामानाचे अंदाज चुकत नाहीत तर ते बदलतात, हे हवामान विभागाचे नेहमीचे वाक्य आहे. तरीदेखील बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज घेण्याबाबत हवामान विभागाने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून आपल्या कार्यप्रणालीत वेग आणला असला, तरीदेखील आपणास अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. हवामान बदल ही अपवादात्मक परिस्थिती नाही. तो बदल सुरूच आहे. परिणामी, जगाला भीती वाटते आहे. आता नुसता विचार करून चालणार नाही, बदलत्या हवामानाचा बदलता अंदाज घेण्यासाठी हवामान खात्याने सक्षम झाले पाहिजे.