शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

लाइफस्टाईल बदला!

By admin | Updated: December 21, 2014 00:17 IST

सागरपातळीची वाढ, बर्फ वितळणे, समुद्रातील पाण्याची वाफ अशा अनेक घटनांमुळे पृथ्वीवरील अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी होत आहे.

सागरपातळीची वाढ, बर्फ वितळणे, समुद्रातील पाण्याची वाफ अशा अनेक घटनांमुळे पृथ्वीवरील अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी होत आहे. जागतिक स्तरावर हा प्रश्न चिघळला असून, महाराष्ट्रात गतवर्षी व यावर्षी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट हा त्याचाच परिणाम आहे. मुळात मनुष्यप्राणी निसर्गाला हानी पोचवित असून, वाढत जाणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे दिवसेंदिवस भरच पडत आहे. यावर साधा, सोपा व सरळ उपाय म्हणजेच निसर्गाला हानी पोचविता कामा नये.रत उष्ण कटिबंधातला देश आहे. त्याच्यामुळे शून्य डिग्री सेल्सिअसची जी पातळी असते, ती जमिनीपासून उंचीवर असते. तेव्हा गारा क्वचित पडतात. गारांमुळे पिकांची, जमिनीची पिटाई होते, मोठे नुकसानही होते. म्हणून त्याला गारपीट म्हणतात. हवामान खात्याची आकडेवारी पाहिली किंवा नीट निरीक्षण केले तर असे लक्षात येते, की वर्षात कुठे तरी गारा पडण्याच्या घटना घडतात. हे प्रमाण तसे कमी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गारपिटीची घटना क्वचित अथवा केव्हा तरी घडत असल्याने तिचे पूर्वानुमान करणे कठीण होऊन बसते, असे म्हटले जाते. मात्र ते तसे नाही. कारण पुढील २४ अथवा ४८ तासांचा अंदाज जर हवामान खाते वर्तवित असेल, तर त्या हवामान खात्याला गारपिटीचा अंदाज देखील वर्तविता आला पाहिजे. आपण आपले हवामान खाते आणखी अद्ययावत, आधुनिक केले पाहिजे. याचा अर्थ ते अद्ययावत अथवा अत्याधुनिक नाही, असा होत नाही. पण त्याने सतर्क राहत लोकांना देखील सतर्क केले पाहिजे.एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी म्हणजे जागतिक तापमानवाढ आणि स्थानिक बदल यात फरक आहे. स्थानिक तापमानवाढ होते ती शहरीकरणामुळे. परंतु गेल्या काही वर्षांत यात वाढ झाली. अनेक वेळा होते असे, की महाराष्ट्रातील गारपीट असो वा केदारनाथला झालेली अतिवृष्टी असो, अशा घटनांनंतर आपण घाईघाईने काही तरी निष्कर्ष काढतो. मात्र पर्यावरणात जो मानवी हस्तक्षेप झाला आहे, त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. महाराष्ट्रात गेल्यावर्षी आणि यावर्षी झालेल्या गारपिटीने शेतकरीवर्गासह पर्यावरणाची देखील हानी झाली. जसे शेतीचे नुकसान झाले आहे तसे ते पशुपक्ष्यांचे देखील झाले आहे.गारपीट झाल्यानंतर नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने तत्परता दाखविली पाहिजे. गारपीट झालेल्या ठिकाणचे दौरे काढून काही होत नसते. कारण अशा घटनांनी शेतकरी आर्थिक आणि मानसिकरीत्या खचलेला असतो. म्हणून भरीव मदतीची आश्वासने देऊन काही होत नाही, तर तत्काळ त्याला मदतीच्या हाताची गरज असते. आणि दुसरे असे, की अशा घटनांकडे आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहात नाही. या घटनांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे. यासाठी वैज्ञानिक आणि मोसम विभागाने एकत्र काम केले पाहिजे.सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे ते असे, की आपण आपली लाइफस्टाईल बदलली तर सगळे काही ठीक होईल. कारण आपण आपल्या सुखासाठी, स्वार्थासाठी, आरामदायी जीवनासाठी धरतीमातेचा गळा घोटतो आहोत. विकासाचा हव्यास आपणाला विनाशाकडे घेऊन जातो आहे. विकासाची व्याख्या करताना आपण पर्यावरणाला जाणीवपूर्वक बगल दिली आणि अशा विकासाच्या हव्यासामुळे, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील सृष्टी नष्ट होते आहे. म्हणून धरतीला ताप आला आहे. ती आजारी पडली आहे. तिचा ताप कमी करायचा असेल तर येथील हरियाली वाढवावी लागेल आणि हा कॉमन सेन्स आहे. कुणाला सांगून ही हरियाली वाढणार नाही. यासाठी तुमचा, माझा आणि प्रत्येकाचा हात पुढे आला पाहिजे.

- डॉ. राजेंद्र सिंह

(लेखक जलपुरुष आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)(शब्दांकन - सचिन लुंगसे)अत्याधुनिक हवामान खाते काळाची गरजहवामान खात्याला गारपिटीचा अंदाज देखील वर्तविता आला पाहिजे. आपण आपले हवामान खाते अद्ययावत, आधुनिक केले पाहिजे. याचा अर्थ ते अद्ययावत अथवा अत्याधुनिक नाही, असा होत नाही. पण त्याने सतर्क राहत लोकांना देखील सतर्क केले पाहिजे.