शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

बेकायदा बांधकामांची राजधानी ‘मुंबई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:16 IST

१९६७ पासून चटई क्षेत्राच्या कुपोषणाने मुंबई गलित गात्र झाली होती. यापुढे अनिर्बंध चटई क्षेत्राच्या अतिरेकाचे परिणाम मुंबईला भोगावे लागतील. गुदमरत असेलेली मुंबई आणि मुंबईकरांना यापुढे कोणी वाचवू शकेल, असे वाटत नाही.

सुलक्षणा महाजन१९६७ पासून चटई क्षेत्राच्या कुपोषणाने मुंबई गलित गात्र झाली होती. यापुढे अनिर्बंध चटई क्षेत्राच्या अतिरेकाचे परिणाम मुंबईला भोगावे लागतील. गुदमरत असेलेली मुंबई आणि मुंबईकरांना यापुढे कोणी वाचवू शकेल, असे वाटत नाही.वास्तुकला महाविद्यालयात शिकत असताना १९७० साली आम्हाला मुंबईच्या विकास नियमावलीचा अभ्यासात समावेश होता. हा विषय मला कंटाळवाणा आणि क्लिष्ट वाटत असे. तो मुंबईसाठी घातक होता, हे नंतरच्या वर्षांमध्ये समजत गेले. मुंबईमध्ये आज चटई क्षेत्र हा विषय नगररचना क्षेत्रात आणि अवैध बांधकामांच्या घोटाळ्यांमुळे सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. अशा या चटई क्षेत्राचा जन्म कधी, कोठे आणि कशामुळे झाला, त्याची कथा मनोरंजक आहे. तशीच मुंबईच्या दुर्दैवाला, ºहासाला कारणीभूत ठरणारी आहे. विकासक आणि राजकारणी मात्र समाजाला चटई क्षेत्राची चटक आणि व्यसन लावत गब्बर व सत्ताधीश झाले आहेत. त्यामुळे आज मध्यमवर्गीयही सोसायटीला किती चटई क्षेत्र मिळणार याचे गणित मांडत असतात.१९६१ साली मुंबईसाठी पहिला विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये चटई क्षेत्र हा शब्दही नव्हता. कसा असेल? कारण हा शब्द पहिल्याप्रथम १९६६ साली महाराष्ट्र शासनाने राज्यभरासाठी तयार केलेल्या नगररचना कायद्यामध्ये समाविष्ट केला होता. १९७०मध्ये मुंबई उपनगरात १ आणि मुंबई बेटांवरील विभागांमध्ये १.३३ चटई क्षेत्र असते आणि त्याचे गणित कसे करायचे, याचे तंत्र आम्हाला महाविद्यालयात शिकविले होते.त्या आधी गिरगाव, बेलार्ड इस्टेट, फोर्ट भागातील सर्व इमारती कितीतरी जास्त क्षेत्रफळ, म्हणजे २ ते ४ इतके चटई क्षेत्र वापरून बांधलेल्या होत्या, याची माहिती कोणालाच नव्हती. शिवाजी पार्क, पारशी आणि हिंदू कॉलनीमधील इमारतींना तळ अधिक तीन मजल्यांची परवानगी असे. कारण केवळ त्याच विभागांपुरते खास नियोजनाचे नियम वापरले होते. त्यात इमारतीच्या सर्व बाजूने जागा किती असावी आणि उंची किती असावी, याचे नियम कडक होते. ते लहान विभाग आरोग्याच्या दृष्टीने आदर्शनगर नियोजन कल्पनेतून विकसित केले होते आणि त्यांचे चटई क्षेत्र १.३३ इतके भरत असल्याने, पुढील सर्व विकास आराखड्यांनी १ आणि १.३३ हे चटई क्षेत्राचे प्रमाण योग्य आहे, असे ठरविले आणि अवैध बांधकाम व्यवसायाची पायाभरणी केली. त्याचा परिणाम असा झाला की, हे नगररचनेचे तथाकथित चटई क्षेत्राचे प्रमाण जाचक असल्याचे लक्षात आले.कडक नियमांत बदल न करण्याचा पवित्रा सरकारने घेतला आणि पळवाटा शोधण्याचे काम वास्तुरचनाकारांनी सुरू केले.या मार्गाने जाणे खर्चिक असले, तरी तुलनेने सोपे, सरळ आणि हिताचे आहे, हे लक्षात आल्यावर, वास्तुरचनाकार मध्यस्थांचे पेव फुटले. चटई क्षेत्राची पवित्र मात्रा वाढवित, नियमाला बगल देत जमीनमालक, राजकारणी, विकासक श्रीमंत लोकांना हवी तशी घरे, इमारती बांधून देऊ लागले. खालच्या अधिकृत मजल्यांवर अनधिकृत मजले चढू लागले, तर घरांच्या अधिकृत बाजारातून बेदखल होऊन गरीब आणि स्थलांतरित झोपडपट्ट्यांमध्ये ढकलले गेले.चटई क्षेत्र मर्यादा अभ्यास करून, कायदेशीर आणि शहाणपणाने वाढवून मूळची चूक सुधारली असती, जोडीला जर भाडे नियंत्रण कायदाही सुधारला असता, तर मुंबईत भाड्याची घरे, चाळी बांधल्या गेल्या असत्या, लोकांना घरे मिळाली असती. झोपडपट्ट्यांची अक्राळविक्राळ समस्या उभी राहिली नसती. प्रतिभा, आदर्श, कॅम्पाकोला इमारतींचे पंचतारांकित घोटाळे झाले नसते आणि झोपु योजनेचे सरकारी घोटाळेही टळले असते. लोकांना खिशाला परवडतील, अशी लहान-मोठ्या आकाराची घरे भाड्याने/ विकत मिळाली असती आणि मुंबईची भयाण अवस्था झाली नसती.महाराष्ट्राच्या नगररचना कायद्यातील चटई क्षेत्राची चूक मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्वच शहरांना अतिशय महाग पडली आहे. २४ एप्रिल २०१८ला मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या २०१४-३४ कालावधीसाठी असलेल्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. नगर नियोजन क्षेत्रातील अनेकांना ती मुंबईच्या शेवटाची सुरुवात वाटते आहे. मुख्यमंत्र्यांनी विकासकांच्या माध्यम तमाशाला साथ देऊन तज्ज्ञ नियोजनकारांनी तयार केलेला आराखडा रद्द केला. त्यात फक्त दादर आणि अंधेरी स्टेशन परिसरातील लहान क्षेत्रावर ५ ते ८ चटई क्षेत्र सुचविले होते. नवीन आराखड्याने आता मुंबईभर कोठेही, ५ ते १० पट चटई क्षेत्र विकासकांना बहाल करण्याचे केलेले मुक्त नियोजन म्हणजे भ्रष्टाचाराचे नवे महाआवर्तन आहे.