शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

बीटी कपाशी: धोरण गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

विदर्भात सोयाबीनची लागवड वाढण्यामागे तेच कारण आहे. प्रारंभी शेतकºयांना चांगला हात दिलेल्या सोयाबीनची मर्यादाही पुढे उघड झाली आणि नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा एकदा कापसाकडे वळला.

खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना, विदर्भातील कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांसमोरच्या पर्यायांवर चर्चा सुरू झाली आहे. कधीकाळी पांढरे सोने म्हणून उदोउदो झालेल्या कापसाची चमक कधीच हरवली आहे. काही दशकांपूर्वीपर्यंत शेतकºयांना आनंदाचे दिवस दाखविणाºया कापसाचे अर्थकारण बिघडल्याने, गत काही वर्षांमध्ये कापूस उत्पादक पट्ट्यास शेतकरी आत्महत्यांनी ग्रासले आहे. त्यातूनच कापसाला पर्याय ठरू शकणाºया पिकांचा शोध घेण्यात आला. विदर्भात सोयाबीनची लागवड वाढण्यामागे तेच कारण आहे. प्रारंभी शेतकºयांना चांगला हात दिलेल्या सोयाबीनची मर्यादाही पुढे उघड झाली आणि नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा एकदा कापसाकडे वळला; मात्र बोंडअळी प्रतिबंधक क्षमतेच्या बळावर कापसाच्या इतर सर्व जातींना हद्दपार केलेल्या बीटी कापसावरच गतवर्षी बोंडअळीचा प्रचंड प्रकोप झाला. शेवटी बोंडअळीस आटोक्यात आणण्यासाठी बीटी कपाशीवरही कीटकनाशकांची फवारणी करावी लागली. त्या फवारणीने अनेक शेतकरी-शेतमजुरांचे बळी घेतले. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कापसाला पर्यायी पीक शोधण्याची चर्चा सुरू झाली आहे; मात्र आगामी खरीप हंगाम एवढा नजीक येऊन ठेपला आहे, की किमान या हंगामात तरी विदर्भात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होणे अनिवार्य दिसते. सुमारे दोन दशकांपूर्वी देशात बीटी कपाशीचे आगमन झाल्यानंतर थोड्याच वर्षात कपाशी म्हणजे बीटी कपाशी असे समीकरण निर्माण झाले. पुढे बीटी कापसाच्या विदेशी जातींवर आधारित बीटी कापसाच्या मर्यादा लक्षात आल्याने, देशी जातींवर आधारित बीटी कपाशीचे वाण विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले; मात्र अद्याप तरी त्या प्रयत्नांना लक्षणीय यश लाभलेले नाही. त्यामुळे आगामी हंगामातही प्रामुख्याने विदेशी बीटी कपाशी बियाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, आगामी हंगामातही कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप होण्याची टांगती तलवार आहेच! त्यातून पुन्हा एकदा फवारणीचे बळी नोंदविल्या जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने बीटी कपाशीसंदर्भात निश्चित असे धोरण निर्धारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोबतच कीटकनाशकांची विक्री आणि वापरासंदर्भातही काटेकोर मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित करण्याची गरज आहे. गत काही वर्षांपासून अवैध बीटी कपाशी बियाणे विक्रीचा व्यवसायही प्रचंड बोकाळला आहे. त्यावरही नियंत्रण आणणे गरजेचे आहे. शेजारच्या तेलंगणा राज्याने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही हा मुद्दा गांभीर्याने घेणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :cottonकापूस