शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

बीटी कपाशी: धोरण गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

विदर्भात सोयाबीनची लागवड वाढण्यामागे तेच कारण आहे. प्रारंभी शेतकºयांना चांगला हात दिलेल्या सोयाबीनची मर्यादाही पुढे उघड झाली आणि नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा एकदा कापसाकडे वळला.

खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना, विदर्भातील कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांसमोरच्या पर्यायांवर चर्चा सुरू झाली आहे. कधीकाळी पांढरे सोने म्हणून उदोउदो झालेल्या कापसाची चमक कधीच हरवली आहे. काही दशकांपूर्वीपर्यंत शेतकºयांना आनंदाचे दिवस दाखविणाºया कापसाचे अर्थकारण बिघडल्याने, गत काही वर्षांमध्ये कापूस उत्पादक पट्ट्यास शेतकरी आत्महत्यांनी ग्रासले आहे. त्यातूनच कापसाला पर्याय ठरू शकणाºया पिकांचा शोध घेण्यात आला. विदर्भात सोयाबीनची लागवड वाढण्यामागे तेच कारण आहे. प्रारंभी शेतकºयांना चांगला हात दिलेल्या सोयाबीनची मर्यादाही पुढे उघड झाली आणि नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा एकदा कापसाकडे वळला; मात्र बोंडअळी प्रतिबंधक क्षमतेच्या बळावर कापसाच्या इतर सर्व जातींना हद्दपार केलेल्या बीटी कापसावरच गतवर्षी बोंडअळीचा प्रचंड प्रकोप झाला. शेवटी बोंडअळीस आटोक्यात आणण्यासाठी बीटी कपाशीवरही कीटकनाशकांची फवारणी करावी लागली. त्या फवारणीने अनेक शेतकरी-शेतमजुरांचे बळी घेतले. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कापसाला पर्यायी पीक शोधण्याची चर्चा सुरू झाली आहे; मात्र आगामी खरीप हंगाम एवढा नजीक येऊन ठेपला आहे, की किमान या हंगामात तरी विदर्भात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होणे अनिवार्य दिसते. सुमारे दोन दशकांपूर्वी देशात बीटी कपाशीचे आगमन झाल्यानंतर थोड्याच वर्षात कपाशी म्हणजे बीटी कपाशी असे समीकरण निर्माण झाले. पुढे बीटी कापसाच्या विदेशी जातींवर आधारित बीटी कापसाच्या मर्यादा लक्षात आल्याने, देशी जातींवर आधारित बीटी कपाशीचे वाण विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले; मात्र अद्याप तरी त्या प्रयत्नांना लक्षणीय यश लाभलेले नाही. त्यामुळे आगामी हंगामातही प्रामुख्याने विदेशी बीटी कपाशी बियाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, आगामी हंगामातही कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप होण्याची टांगती तलवार आहेच! त्यातून पुन्हा एकदा फवारणीचे बळी नोंदविल्या जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने बीटी कपाशीसंदर्भात निश्चित असे धोरण निर्धारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोबतच कीटकनाशकांची विक्री आणि वापरासंदर्भातही काटेकोर मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित करण्याची गरज आहे. गत काही वर्षांपासून अवैध बीटी कपाशी बियाणे विक्रीचा व्यवसायही प्रचंड बोकाळला आहे. त्यावरही नियंत्रण आणणे गरजेचे आहे. शेजारच्या तेलंगणा राज्याने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही हा मुद्दा गांभीर्याने घेणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :cottonकापूस