शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

बीटी कपाशी: धोरण गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

विदर्भात सोयाबीनची लागवड वाढण्यामागे तेच कारण आहे. प्रारंभी शेतकºयांना चांगला हात दिलेल्या सोयाबीनची मर्यादाही पुढे उघड झाली आणि नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा एकदा कापसाकडे वळला.

खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना, विदर्भातील कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांसमोरच्या पर्यायांवर चर्चा सुरू झाली आहे. कधीकाळी पांढरे सोने म्हणून उदोउदो झालेल्या कापसाची चमक कधीच हरवली आहे. काही दशकांपूर्वीपर्यंत शेतकºयांना आनंदाचे दिवस दाखविणाºया कापसाचे अर्थकारण बिघडल्याने, गत काही वर्षांमध्ये कापूस उत्पादक पट्ट्यास शेतकरी आत्महत्यांनी ग्रासले आहे. त्यातूनच कापसाला पर्याय ठरू शकणाºया पिकांचा शोध घेण्यात आला. विदर्भात सोयाबीनची लागवड वाढण्यामागे तेच कारण आहे. प्रारंभी शेतकºयांना चांगला हात दिलेल्या सोयाबीनची मर्यादाही पुढे उघड झाली आणि नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा एकदा कापसाकडे वळला; मात्र बोंडअळी प्रतिबंधक क्षमतेच्या बळावर कापसाच्या इतर सर्व जातींना हद्दपार केलेल्या बीटी कापसावरच गतवर्षी बोंडअळीचा प्रचंड प्रकोप झाला. शेवटी बोंडअळीस आटोक्यात आणण्यासाठी बीटी कपाशीवरही कीटकनाशकांची फवारणी करावी लागली. त्या फवारणीने अनेक शेतकरी-शेतमजुरांचे बळी घेतले. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कापसाला पर्यायी पीक शोधण्याची चर्चा सुरू झाली आहे; मात्र आगामी खरीप हंगाम एवढा नजीक येऊन ठेपला आहे, की किमान या हंगामात तरी विदर्भात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होणे अनिवार्य दिसते. सुमारे दोन दशकांपूर्वी देशात बीटी कपाशीचे आगमन झाल्यानंतर थोड्याच वर्षात कपाशी म्हणजे बीटी कपाशी असे समीकरण निर्माण झाले. पुढे बीटी कापसाच्या विदेशी जातींवर आधारित बीटी कापसाच्या मर्यादा लक्षात आल्याने, देशी जातींवर आधारित बीटी कपाशीचे वाण विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले; मात्र अद्याप तरी त्या प्रयत्नांना लक्षणीय यश लाभलेले नाही. त्यामुळे आगामी हंगामातही प्रामुख्याने विदेशी बीटी कपाशी बियाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, आगामी हंगामातही कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप होण्याची टांगती तलवार आहेच! त्यातून पुन्हा एकदा फवारणीचे बळी नोंदविल्या जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने बीटी कपाशीसंदर्भात निश्चित असे धोरण निर्धारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोबतच कीटकनाशकांची विक्री आणि वापरासंदर्भातही काटेकोर मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित करण्याची गरज आहे. गत काही वर्षांपासून अवैध बीटी कपाशी बियाणे विक्रीचा व्यवसायही प्रचंड बोकाळला आहे. त्यावरही नियंत्रण आणणे गरजेचे आहे. शेजारच्या तेलंगणा राज्याने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही हा मुद्दा गांभीर्याने घेणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :cottonकापूस