शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

हद्दवाढीची लक्तरे वेशीवर!

By admin | Updated: February 26, 2016 04:37 IST

राज्याच्या कोणत्याही भागात गेलात तर त्या त्या शहरांची हद्दवाढ होत राहिलेली दिसेल. कोल्हापूर हे एकमेव शहर आहे की, ज्याची महापालिका स्थापन होऊन ४४ वर्षे उलटली तरी हद्दवाढ काही

- वसंत भोसलेराज्याच्या कोणत्याही भागात गेलात तर त्या त्या शहरांची हद्दवाढ होत राहिलेली दिसेल. कोल्हापूर हे एकमेव शहर आहे की, ज्याची महापालिका स्थापन होऊन ४४ वर्षे उलटली तरी हद्दवाढ काही होत नाही. कोल्हापूर महापालिकेची स्थापना होऊन ४४ वर्षे पूर्ण झाली. दरम्यानच्या कालावधीत शहराचा विस्तार वाढला. शेजारच्या गावात राहाण्यास आणि शहरात काम करणाऱ्यांची लोकसंख्याही वाढली. मात्र, कोल्हापूर शहराची हद्द काही वाढली नाही. शहराच्या विस्तारासाठी आणि वाढीसाठी हद्दवाढ झाली पाहिजे. शेजारची गावे शहर महापालिकेत समाविष्ट केली पाहिजेत, अशी चर्चा अनेक वर्षे चालू आहे; पण वास्तव वेगळेच आहे. चर्चा करणाऱ्यांकडे राजकीय ताकद नाही आणि शहराचा विस्तार व्हावा, अशी भावना असूनही ग्रामीण राजकीय वर्चस्वावर मातही करता येत नाही.गेल्या आठवड्यात राज्य शासनाला जिल्हा प्रशासनाने हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला. त्यात १७ गावांचा समावेश करावा आणि शिरोली तसेच गोकुळ शिरगावच्या औद्योगिक वसाहतींना वगळण्यात यावे, असे म्हटले. मात्र या १७ गावांनी त्याला विरोध सुरू केला. कोणत्याही परिस्थितीत महापालिका हद्दीत सहभागी होणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ही सर्व गावे तीन ग्रामीण विधानसभा मतदार संघात विभागली गेली आहेत. त्या आमदारांचा हद्दवाढीस ठाम विरोध आहे.राज्याच्या कोणत्याही भागात गेलात तर त्या त्या शहरांची हद्दवाढ होत राहिलेली दिसेल. कोल्हापूर हा एकमेव अपवाद. कोल्हापूर शहराचा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा नाही. महापालिकेतील राजकारण करणारे वजनदार नाहीत. कोल्हापूर शहराचे आमदार नेहमीच विरोधी पक्षातील असतात आणि ग्रामीण भागाचे आमदार सत्तारूढ पक्षाचे असतात. त्यामुळे त्यांचेच पारडे जड राहते.वास्तविक हद्दवाढीची मागणी करणारे कोल्हापूर शहरातील राज्यकर्तेही अनेक चुका करीत आहेत. महापालिकेची हद्दवाढ करण्याचा पहिला प्रस्तावच ४२ गावांचा समावेश असलेला दिला. वास्तविक कोल्हापूर शहराच्या आजूबाजूला हिरवीगार पिके बहरणारी शेती आहे. बारमाही पिके शेतात डोलत असतात. ही सर्व शेती लहान व गरीब शेतकऱ्यांची आहे. त्यांना आपले उत्पन्न हातचे जाऊ नये, असे वाटते. शिवाय शहराच्या पश्चिम ते उत्तर बाजूने पंचगंगा नदी वाहते. त्याच्या पलीकडील गावेही महापालिकेच्या हद्दीत हवीत, असा दुराग्रही प्रस्ताव तयार केला. तो कोणीही मान्य करणार नाही. सुधारित प्रस्ताव दिला त्यात १७ गावे आणि शहरापासून दूरवर असणाऱ्या दोन औद्योगिक वसाहतींचा समावेश केला. त्यामुळे उद्योजकही दुखावले गेले. या औद्योगिक वसाहतींचा कारण नसताना केवळ महापालिकेस उत्पन्न वाढवून मिळेल म्हणून समावेश करण्यात आला.कोल्हापूरचा विकास आणि विस्तार व्हावा, यासाठी हद्दवाढीची नितांत गरज आहे. त्यासाठी व्यवहारी मार्ग निवडणे गरजेचे आहे. शहराच्या पूर्व-पश्चिम बाजूने दक्षिणेस असणारी कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, आर.के.नगर, उजळाईवाडी, सरनोबतवाडी आणि उचगाव एवढीच गावे महापालिका हद्दीत घ्यायला हवीत. कारण या गावांचा विस्तारही शहरापर्यंत आला आहे. शहर कोठे संपते आणि या गावांची हद्द कोठे सुरू होते, हेच समजत नाही. इतकी ही गावे शहराला बिलगली आहेत. त्यामुळे शहराबरोबरच गावांनीही सामंजस्यपणा दाखवून वाढत्या शहराच्या विस्ताराचा स्वीकार करायला हवा. त्यासाठी समन्वय साधण्याची तयारी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांकडे नाही. ‘आम्ही सारे कोल्हापुरी’ म्हणणारे शहरात की गावात राहतात, मात्र शत्रूसारखे वागत आहेत. उद्योजकही शहरात राहतात आणि गावातील वसाहतीत कारखानदारी चालवितात. त्यांनीही सर्वांना समजून घ्यावे. शहर वाढ ही अपरिहार्य आहे. तिचा केव्हा ना केव्हा स्वीकार करावाच लागणार आहे, हे वास्तव कोणी समजून सांगेल का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांच्या दबावाखाली वास्तववादी भूमिका न घेता कोणावर काही लादणार नाही, असे म्हणतात. तेव्हा तेही राज्यकर्त्यांची भूमिका विसरले आहेत असे म्हणावेसे वाटते. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला पोषक निर्णय घेण्यासाठी सर्वांनीच शहाणपण दाखविणे गरजेचे आहे.