शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा नवा राजधर्म

By admin | Updated: February 28, 2017 00:02 IST

एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत.

एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. हा भाजपाचा नवा राजधर्म आहे, या निवडणुकीतून त्याचे सूतोवाचही झाले आहे. परवाच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विदर्भात संपादन केलेल्या घवघवीत यशाला वेगवेगळे आयाम आहेत. हा पक्ष आता शहरीकरणाकडून ग्रामीण भागाकडे वेगाने वाटचाल करीत आहे, उधार-उसनवारीवर इतर पक्षांकडून घेतलेले नेते-कार्यकर्ते या पक्षात एकरूप होत आहेत. हा पक्ष निवडणुकीपुरता का होईना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्चस्वातून बाहेर पडत आहे, असे हे विविध कंगोरे. भाजपाच्या या यशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासक नेतृत्व जेवढे कारणीभूत आहे, तेवढेच श्रेय नितीन गडकरींच्या विकासात्मक सर्वसमावेशक राजकारणालाही द्यावे लागेल. भाजपा हा राजकीय पक्ष संघटना म्हणूनही विविध समाज स्तरांत अधिक व्यापक होत असल्याचेही या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले आहे. नोटाबंदीच्या अरिष्टानंतरही भाजपाला विदर्भात लखलखीत यश मिळते याचा अर्थ असा आहे की विरोधकांच्या आक्रमकतेपेक्षा फडणवीस सरकारची अडीच वर्षातील कामगिरी उजवी ठरली आहे. भाजपाच्या या विजयाचे ‘श्रेय’ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही देणे आवश्यक आहे. ज्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्याच प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकतात त्या पक्षाच्या पराभवाबद्दल स्वकीयांच्या मनातही शंका राहत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील अस्तित्व मोसमी आणि हंगामी आहे. प्रफुल्ल पटेलांच्या नागपुरातील सभेला मोजून शंभर माणसेही उपस्थित नव्हती. त्याच दिवशी या पक्षाचा निकाल लागला होता. मुंबईत भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेना नागपुरात आक्रमक होईल, असे वाटले होते. पण सेनेचा ‘तानाजी’ नागपुरात कधी आला आणि परत गेला, हे शिवसैनिकांनाही कळले नाही. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे - अनिल सोले, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार-हंसराज अहिर, अमरावतीत प्रवीण पोटे-डॉ. सुनील देशमुख, अकोल्यात डॉ. रणजित पाटील-संजय धोत्रे, वर्धेत रामदास तडस-पंकज भोयर या भाजपा नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि पक्षाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. काँग्रेस नेत्यांची अवस्था अगदी उलट होती. अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसने लक्षणीय यश संपादन केले. हा एक अपवाद सोडला तर उर्वरित ठिकाणी काँग्रेसचे नेते एकमेकांचे पाय ओढण्यातच मश्गुल राहिले. यवतमाळमध्ये शिवाजीराव मोघे-वसंत पुरके हे काँग्रेस नेते आपला लाल दिवा आता राहिलेला नाही, हे कटु वास्तव अजूनही स्वीकारायला तयार नाहीत. माणिकराव ठाकरेंचा बहुतांश वेळ स्वत:ला निरखण्यातच जात असल्याने पक्षासाठी त्यांना वेळ तरी कसा मिळणार? मुकुल वासनिक हे बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वमान्य नेते. पण, दिल्लीत बसूनच त्यांचे राजकारण सुरू असते, त्यामुळे आधी रामटेक आणि आता बुलडाणाही त्यांच्या हातून निसटले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे बुलडाण्याचे आमदार प्रामाणिक आहेत. परंतु सावलीतच राहायची सवय असल्याने क्षमता असूनही त्यांचे नेतृत्व बहरू शकले नाही. चंद्रपुरात नरेश पुगलिया हा लोकनेता आपला स्वभाव आणि कार्यशैलीत बदल करायला तयार नाही आणि विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वातील अनिवासीपण जायला तयार नाही. दोन सख्ख्या भावांचे कितीही मतभेद असले तरी ते कुटुंबातील सुख-दु:खात मतभेद विसरून एकत्र येतात. तसा एकोपा हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात आहे. त्यामुळे भाजपाची तेथील घोडदौड वेगाने सुरू असते. या निवडणुकीतील अधोरेखित करणारी आणखी एक गोष्ट अशी की, दलित आणि मुस्लीम मतदार पारंपरिक राजकीय पक्षांच्या मक्तेदारीतून हळूहळू बाहेर पडत आहे. कुठलातरी बागुलबुवा उभा करून त्यांना आता घाबरवता येणार नाही, हे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या दाखवूनही दिले आहे. भलेही नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात मतांच्या धृवीकरणासाठी कब्रस्तान-स्मशानाचा आधार घेत असले तरीही गडकरी-फडणवीस या घाणेरड्या राजकारणात पडत नाहीत, संघाचे सल्ले गरजेपुरतेच मनावर घेत आहेत, हेच या निकालातून दिसून आले आहे. एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. हा भाजपचा नवा राजधर्म आहे आणि या निवडणुकीतून त्याचे सूतोवाचही झाले आहे. - गजानन जानभोर