शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

भाजपाचा नवा राजधर्म

By admin | Updated: February 28, 2017 00:02 IST

एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत.

एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. हा भाजपाचा नवा राजधर्म आहे, या निवडणुकीतून त्याचे सूतोवाचही झाले आहे. परवाच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विदर्भात संपादन केलेल्या घवघवीत यशाला वेगवेगळे आयाम आहेत. हा पक्ष आता शहरीकरणाकडून ग्रामीण भागाकडे वेगाने वाटचाल करीत आहे, उधार-उसनवारीवर इतर पक्षांकडून घेतलेले नेते-कार्यकर्ते या पक्षात एकरूप होत आहेत. हा पक्ष निवडणुकीपुरता का होईना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्चस्वातून बाहेर पडत आहे, असे हे विविध कंगोरे. भाजपाच्या या यशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासक नेतृत्व जेवढे कारणीभूत आहे, तेवढेच श्रेय नितीन गडकरींच्या विकासात्मक सर्वसमावेशक राजकारणालाही द्यावे लागेल. भाजपा हा राजकीय पक्ष संघटना म्हणूनही विविध समाज स्तरांत अधिक व्यापक होत असल्याचेही या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले आहे. नोटाबंदीच्या अरिष्टानंतरही भाजपाला विदर्भात लखलखीत यश मिळते याचा अर्थ असा आहे की विरोधकांच्या आक्रमकतेपेक्षा फडणवीस सरकारची अडीच वर्षातील कामगिरी उजवी ठरली आहे. भाजपाच्या या विजयाचे ‘श्रेय’ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही देणे आवश्यक आहे. ज्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्याच प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकतात त्या पक्षाच्या पराभवाबद्दल स्वकीयांच्या मनातही शंका राहत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील अस्तित्व मोसमी आणि हंगामी आहे. प्रफुल्ल पटेलांच्या नागपुरातील सभेला मोजून शंभर माणसेही उपस्थित नव्हती. त्याच दिवशी या पक्षाचा निकाल लागला होता. मुंबईत भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेना नागपुरात आक्रमक होईल, असे वाटले होते. पण सेनेचा ‘तानाजी’ नागपुरात कधी आला आणि परत गेला, हे शिवसैनिकांनाही कळले नाही. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे - अनिल सोले, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार-हंसराज अहिर, अमरावतीत प्रवीण पोटे-डॉ. सुनील देशमुख, अकोल्यात डॉ. रणजित पाटील-संजय धोत्रे, वर्धेत रामदास तडस-पंकज भोयर या भाजपा नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि पक्षाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. काँग्रेस नेत्यांची अवस्था अगदी उलट होती. अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसने लक्षणीय यश संपादन केले. हा एक अपवाद सोडला तर उर्वरित ठिकाणी काँग्रेसचे नेते एकमेकांचे पाय ओढण्यातच मश्गुल राहिले. यवतमाळमध्ये शिवाजीराव मोघे-वसंत पुरके हे काँग्रेस नेते आपला लाल दिवा आता राहिलेला नाही, हे कटु वास्तव अजूनही स्वीकारायला तयार नाहीत. माणिकराव ठाकरेंचा बहुतांश वेळ स्वत:ला निरखण्यातच जात असल्याने पक्षासाठी त्यांना वेळ तरी कसा मिळणार? मुकुल वासनिक हे बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वमान्य नेते. पण, दिल्लीत बसूनच त्यांचे राजकारण सुरू असते, त्यामुळे आधी रामटेक आणि आता बुलडाणाही त्यांच्या हातून निसटले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे बुलडाण्याचे आमदार प्रामाणिक आहेत. परंतु सावलीतच राहायची सवय असल्याने क्षमता असूनही त्यांचे नेतृत्व बहरू शकले नाही. चंद्रपुरात नरेश पुगलिया हा लोकनेता आपला स्वभाव आणि कार्यशैलीत बदल करायला तयार नाही आणि विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वातील अनिवासीपण जायला तयार नाही. दोन सख्ख्या भावांचे कितीही मतभेद असले तरी ते कुटुंबातील सुख-दु:खात मतभेद विसरून एकत्र येतात. तसा एकोपा हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात आहे. त्यामुळे भाजपाची तेथील घोडदौड वेगाने सुरू असते. या निवडणुकीतील अधोरेखित करणारी आणखी एक गोष्ट अशी की, दलित आणि मुस्लीम मतदार पारंपरिक राजकीय पक्षांच्या मक्तेदारीतून हळूहळू बाहेर पडत आहे. कुठलातरी बागुलबुवा उभा करून त्यांना आता घाबरवता येणार नाही, हे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या दाखवूनही दिले आहे. भलेही नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात मतांच्या धृवीकरणासाठी कब्रस्तान-स्मशानाचा आधार घेत असले तरीही गडकरी-फडणवीस या घाणेरड्या राजकारणात पडत नाहीत, संघाचे सल्ले गरजेपुरतेच मनावर घेत आहेत, हेच या निकालातून दिसून आले आहे. एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. हा भाजपचा नवा राजधर्म आहे आणि या निवडणुकीतून त्याचे सूतोवाचही झाले आहे. - गजानन जानभोर