शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

भाजपाचा नवा राजधर्म

By admin | Updated: February 28, 2017 00:02 IST

एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत.

एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. हा भाजपाचा नवा राजधर्म आहे, या निवडणुकीतून त्याचे सूतोवाचही झाले आहे. परवाच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विदर्भात संपादन केलेल्या घवघवीत यशाला वेगवेगळे आयाम आहेत. हा पक्ष आता शहरीकरणाकडून ग्रामीण भागाकडे वेगाने वाटचाल करीत आहे, उधार-उसनवारीवर इतर पक्षांकडून घेतलेले नेते-कार्यकर्ते या पक्षात एकरूप होत आहेत. हा पक्ष निवडणुकीपुरता का होईना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्चस्वातून बाहेर पडत आहे, असे हे विविध कंगोरे. भाजपाच्या या यशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासक नेतृत्व जेवढे कारणीभूत आहे, तेवढेच श्रेय नितीन गडकरींच्या विकासात्मक सर्वसमावेशक राजकारणालाही द्यावे लागेल. भाजपा हा राजकीय पक्ष संघटना म्हणूनही विविध समाज स्तरांत अधिक व्यापक होत असल्याचेही या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले आहे. नोटाबंदीच्या अरिष्टानंतरही भाजपाला विदर्भात लखलखीत यश मिळते याचा अर्थ असा आहे की विरोधकांच्या आक्रमकतेपेक्षा फडणवीस सरकारची अडीच वर्षातील कामगिरी उजवी ठरली आहे. भाजपाच्या या विजयाचे ‘श्रेय’ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही देणे आवश्यक आहे. ज्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्याच प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकतात त्या पक्षाच्या पराभवाबद्दल स्वकीयांच्या मनातही शंका राहत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील अस्तित्व मोसमी आणि हंगामी आहे. प्रफुल्ल पटेलांच्या नागपुरातील सभेला मोजून शंभर माणसेही उपस्थित नव्हती. त्याच दिवशी या पक्षाचा निकाल लागला होता. मुंबईत भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेना नागपुरात आक्रमक होईल, असे वाटले होते. पण सेनेचा ‘तानाजी’ नागपुरात कधी आला आणि परत गेला, हे शिवसैनिकांनाही कळले नाही. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे - अनिल सोले, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार-हंसराज अहिर, अमरावतीत प्रवीण पोटे-डॉ. सुनील देशमुख, अकोल्यात डॉ. रणजित पाटील-संजय धोत्रे, वर्धेत रामदास तडस-पंकज भोयर या भाजपा नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि पक्षाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. काँग्रेस नेत्यांची अवस्था अगदी उलट होती. अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसने लक्षणीय यश संपादन केले. हा एक अपवाद सोडला तर उर्वरित ठिकाणी काँग्रेसचे नेते एकमेकांचे पाय ओढण्यातच मश्गुल राहिले. यवतमाळमध्ये शिवाजीराव मोघे-वसंत पुरके हे काँग्रेस नेते आपला लाल दिवा आता राहिलेला नाही, हे कटु वास्तव अजूनही स्वीकारायला तयार नाहीत. माणिकराव ठाकरेंचा बहुतांश वेळ स्वत:ला निरखण्यातच जात असल्याने पक्षासाठी त्यांना वेळ तरी कसा मिळणार? मुकुल वासनिक हे बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वमान्य नेते. पण, दिल्लीत बसूनच त्यांचे राजकारण सुरू असते, त्यामुळे आधी रामटेक आणि आता बुलडाणाही त्यांच्या हातून निसटले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे बुलडाण्याचे आमदार प्रामाणिक आहेत. परंतु सावलीतच राहायची सवय असल्याने क्षमता असूनही त्यांचे नेतृत्व बहरू शकले नाही. चंद्रपुरात नरेश पुगलिया हा लोकनेता आपला स्वभाव आणि कार्यशैलीत बदल करायला तयार नाही आणि विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वातील अनिवासीपण जायला तयार नाही. दोन सख्ख्या भावांचे कितीही मतभेद असले तरी ते कुटुंबातील सुख-दु:खात मतभेद विसरून एकत्र येतात. तसा एकोपा हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात आहे. त्यामुळे भाजपाची तेथील घोडदौड वेगाने सुरू असते. या निवडणुकीतील अधोरेखित करणारी आणखी एक गोष्ट अशी की, दलित आणि मुस्लीम मतदार पारंपरिक राजकीय पक्षांच्या मक्तेदारीतून हळूहळू बाहेर पडत आहे. कुठलातरी बागुलबुवा उभा करून त्यांना आता घाबरवता येणार नाही, हे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या दाखवूनही दिले आहे. भलेही नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात मतांच्या धृवीकरणासाठी कब्रस्तान-स्मशानाचा आधार घेत असले तरीही गडकरी-फडणवीस या घाणेरड्या राजकारणात पडत नाहीत, संघाचे सल्ले गरजेपुरतेच मनावर घेत आहेत, हेच या निकालातून दिसून आले आहे. एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. हा भाजपचा नवा राजधर्म आहे आणि या निवडणुकीतून त्याचे सूतोवाचही झाले आहे. - गजानन जानभोर