शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा नवा राजधर्म

By admin | Updated: February 28, 2017 00:02 IST

एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत.

एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. हा भाजपाचा नवा राजधर्म आहे, या निवडणुकीतून त्याचे सूतोवाचही झाले आहे. परवाच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विदर्भात संपादन केलेल्या घवघवीत यशाला वेगवेगळे आयाम आहेत. हा पक्ष आता शहरीकरणाकडून ग्रामीण भागाकडे वेगाने वाटचाल करीत आहे, उधार-उसनवारीवर इतर पक्षांकडून घेतलेले नेते-कार्यकर्ते या पक्षात एकरूप होत आहेत. हा पक्ष निवडणुकीपुरता का होईना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्चस्वातून बाहेर पडत आहे, असे हे विविध कंगोरे. भाजपाच्या या यशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासक नेतृत्व जेवढे कारणीभूत आहे, तेवढेच श्रेय नितीन गडकरींच्या विकासात्मक सर्वसमावेशक राजकारणालाही द्यावे लागेल. भाजपा हा राजकीय पक्ष संघटना म्हणूनही विविध समाज स्तरांत अधिक व्यापक होत असल्याचेही या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले आहे. नोटाबंदीच्या अरिष्टानंतरही भाजपाला विदर्भात लखलखीत यश मिळते याचा अर्थ असा आहे की विरोधकांच्या आक्रमकतेपेक्षा फडणवीस सरकारची अडीच वर्षातील कामगिरी उजवी ठरली आहे. भाजपाच्या या विजयाचे ‘श्रेय’ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही देणे आवश्यक आहे. ज्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्याच प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकतात त्या पक्षाच्या पराभवाबद्दल स्वकीयांच्या मनातही शंका राहत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील अस्तित्व मोसमी आणि हंगामी आहे. प्रफुल्ल पटेलांच्या नागपुरातील सभेला मोजून शंभर माणसेही उपस्थित नव्हती. त्याच दिवशी या पक्षाचा निकाल लागला होता. मुंबईत भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेना नागपुरात आक्रमक होईल, असे वाटले होते. पण सेनेचा ‘तानाजी’ नागपुरात कधी आला आणि परत गेला, हे शिवसैनिकांनाही कळले नाही. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे - अनिल सोले, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार-हंसराज अहिर, अमरावतीत प्रवीण पोटे-डॉ. सुनील देशमुख, अकोल्यात डॉ. रणजित पाटील-संजय धोत्रे, वर्धेत रामदास तडस-पंकज भोयर या भाजपा नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि पक्षाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. काँग्रेस नेत्यांची अवस्था अगदी उलट होती. अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसने लक्षणीय यश संपादन केले. हा एक अपवाद सोडला तर उर्वरित ठिकाणी काँग्रेसचे नेते एकमेकांचे पाय ओढण्यातच मश्गुल राहिले. यवतमाळमध्ये शिवाजीराव मोघे-वसंत पुरके हे काँग्रेस नेते आपला लाल दिवा आता राहिलेला नाही, हे कटु वास्तव अजूनही स्वीकारायला तयार नाहीत. माणिकराव ठाकरेंचा बहुतांश वेळ स्वत:ला निरखण्यातच जात असल्याने पक्षासाठी त्यांना वेळ तरी कसा मिळणार? मुकुल वासनिक हे बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वमान्य नेते. पण, दिल्लीत बसूनच त्यांचे राजकारण सुरू असते, त्यामुळे आधी रामटेक आणि आता बुलडाणाही त्यांच्या हातून निसटले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे बुलडाण्याचे आमदार प्रामाणिक आहेत. परंतु सावलीतच राहायची सवय असल्याने क्षमता असूनही त्यांचे नेतृत्व बहरू शकले नाही. चंद्रपुरात नरेश पुगलिया हा लोकनेता आपला स्वभाव आणि कार्यशैलीत बदल करायला तयार नाही आणि विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वातील अनिवासीपण जायला तयार नाही. दोन सख्ख्या भावांचे कितीही मतभेद असले तरी ते कुटुंबातील सुख-दु:खात मतभेद विसरून एकत्र येतात. तसा एकोपा हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात आहे. त्यामुळे भाजपाची तेथील घोडदौड वेगाने सुरू असते. या निवडणुकीतील अधोरेखित करणारी आणखी एक गोष्ट अशी की, दलित आणि मुस्लीम मतदार पारंपरिक राजकीय पक्षांच्या मक्तेदारीतून हळूहळू बाहेर पडत आहे. कुठलातरी बागुलबुवा उभा करून त्यांना आता घाबरवता येणार नाही, हे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या दाखवूनही दिले आहे. भलेही नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात मतांच्या धृवीकरणासाठी कब्रस्तान-स्मशानाचा आधार घेत असले तरीही गडकरी-फडणवीस या घाणेरड्या राजकारणात पडत नाहीत, संघाचे सल्ले गरजेपुरतेच मनावर घेत आहेत, हेच या निकालातून दिसून आले आहे. एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. हा भाजपचा नवा राजधर्म आहे आणि या निवडणुकीतून त्याचे सूतोवाचही झाले आहे. - गजानन जानभोर