शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

मोठय़ा उंदरांची पळापळ

By admin | Updated: July 8, 2014 09:50 IST

जहाज बुडू लागले, की त्यावरचे उंदीर सर्वांत आधी पळू लागतात, अशा आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. काँग्रेसचे जहाज पाण्याखाली जात असलेले दिसताच त्यावरच्या उंदरांनीही पळ काढायला सुरुवात केली आहे.

जहाज बुडू लागले, की त्यावरचे उंदीर सर्वांत आधी पळू लागतात, अशा आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. काँग्रेसचे जहाज पाण्याखाली जात असलेले दिसताच त्यावरच्या उंदरांनीही  पळ काढायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांची ‘मरेपर्यंत निष्ठेने’ सेवा करण्याची प्रतिज्ञा केलेले माजी मंत्री, खासदार व आमदार दत्ता मेघे हे त्यांच्या दोन मुलांसकट  भाजपामध्ये सामील झाले आहेत. काँग्रेसचे एक माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख त्यांच्या एका मुलाला भाजपात पाठवून व दुसर्‍याला काँग्रेसमध्ये ठेवून थांबले आहेत. त्यांनी बसपाचाही दरवाजा एकदा ठोठावल्याची चर्चा आहे. वणीचे  आमदार वामनराव कासावार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला असून, ते पलीकडून येणार्‍या निमंत्रणाची वाट पाहत आहेत. वध्र्याचे सुरेश देशमुखही तशा पवित्र्यात आहेत आणि प्रफुल्ल पटेलांना दोन वर्षांची खासदारकी देऊन पवारांनी थोपवून ठेवले आहे. पक्षनिष्ठा, विचारांवरील श्रद्धा आणि जुन्या काळी घेतलेल्या आणाभाका या गोष्टी राजकारणात केवढय़ा निर्थक ठरल्या आहेत, याचा प्रत्यय आणून देणार्‍या या हालचाली आहेत. परक्या घरी जाणारी ही वरात इथवरच थांबणारी नाही. काँग्रेस पक्षही असा सुस्त, की तो यांना थांबवत नाही आणि त्यातली काही कर्मठ व कठोर माणसे म्हणताहेत, जाणार्‍यांना जाऊ द्या पक्ष स्वच्छ होईल आणि जे उरतील, ते खरे निष्ठावंत असतील. अशा वेळी आपल्याला पडणारे प्रश्न, या पक्षाला आपले निष्ठावंत ओळखायला एवढे दिवस का लागावेत, हा आणि दुसरा, एवढय़ा काळात या तथाकथित निष्ठावंतांनी केलेल्या मिळकतीचे काय,  हा. माणसे राजकारणात सेवेसाठी जात नाहीत, सोयीसाठी जातात. आताची पक्षांतरे पाहिली, की त्यांच्यासमोर फक्त त्यांचीच नव्हे तर पुढल्या अनेक पिढय़ांची सोय असते, हेही जाणवते. ही माणसे गरीब नाहीत, लाचार नाहीत आणि रस्त्यावर आली नाहीत, त्यांच्या इस्टेटी देशात व विदेशांत आहेत, कमाई मोठी आहे आणि स्वबळावर निवडणुका लढविण्याएवढी श्रीमंतीही त्यांच्यात आहे. लहान माणसे पक्षाला चिकटून आहेत अन् ही मोठी म्हणविणारी प्रवासी बॅगा भरण्याच्या कामी लागली आहेत. हे दृश्य जगात एकमेवाद्वितीय असे आहे आणि ते सार्‍या समाजाला लाज वाटायला लावणारे आहे. ही माणसे निर्ढावली आहेत. पूर्वी काँग्रेसमध्ये असणारी माणसे ‘माहेरी’ चालल्याचे लोकांना ऐकवत. आताच्या पक्षांतरकर्त्यांचे इकडेही माहेर आणि तिकडेही माहेर आणि दोन्हीकडे कधीही जाता येईल, असा मार्गही  मोकळा. गंमत म्हणजे त्यांचे स्वागतकर्ते दोन्हीकडे हारतुरे घेऊन. यांना लाज नाही आणि त्यांनाही लाज नाही. एके काळी अशा माणसांना ‘आयाराम-गयाराम’ म्हणत; पण त्यामुळे रामाचे नाव बदनाम होते म्हणून मग वेगळी नावे आली. पण, नाव कोणतेही दिले तरी प्रकृतीत बदल थोडाच होतो? मेघे इकडे आदरणीय आणि तिकडेही आदरणीय. याला आम्ही लोकशाही म्हणणार आणि तीत राजकीय विचारांची व त्यावरच्या पुढार्‍यांच्या श्रद्धेची चर्चा करणार. ही चर्चा करणारेच मग बावळे वाटू लागणार. जाणारे जातात, खाणारे खातात आणि चर्चा करणारे उपाशी पोटाने नुसतीच त्यांची मीमांसा करतात. पक्षांतरावर बंदी घालणारा कायदाही लंगडा आहे. तो कार्यकर्त्यांवरच बंधने घालत असतो. नेत्यांवर त्याची मात्रा चालत नाही. ती चालत असती, तर निम्म्या विदर्भातील काँग्रेस अशी रिकामी झाली नसती. त्या पक्षातली माणसेही अशा सोडून जाणार्‍यांविषयी बोलत नाहीत. त्यांच्या निरोपाचे समारंभ घडवीत नाहीत. उद्या आपणही त्या वाटेवर असू, याची धास्ती त्यांच्याही मनात कदाचित असावी. एकट्या विदर्भाला नावे ठेवून येथे चालणार नाही. पक्षांतराची ही लागण तिकडे कोकणातही आहे आणि ती काही फार बड्या माणसांनाही झाली असल्याची चर्चा आहे. अशा पळापळीची सवय असलेल्या एका माजी मुख्यमंत्र्याचे नाव त्यांच्या वेगवान बछड्यांसोबत या संदर्भात घेतले जात आहे. त्यांच्या भाजपाप्रवेशाला सेनेचा विरोध असल्याने ते थांबल्याची चर्चा आहे. पण सेनेचा विरोध आता शक्तिहीन झाला असून, मोदी तिला हवे तसे  नाचवीत आहेत. या स्थितीत विधानसभेची निवडणूकही त्या पक्षाला लढवावी लागायची नाही. निवडणुकीचा बिगुल वाजला, की आयुधेच नव्हे तर वस्त्रेही घेऊन आपापली बिळे शोधण्याचेच काम मग यांनी करायचे. सोनिया गांधींच्या नशिबात यापुढे काय पाहणे राहिले असेल, याची कल्पना यावी, अशी ही पळापळ आहे आणि ती लाजिरवाणी आणि राजकारणाची बदनामी करणारी आहे.