शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

भुजबळांचे साम्राज्य!

By admin | Updated: August 27, 2016 05:49 IST

इंग्रजी भाषेत ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’ अशी म्हण आहे. म्हणजे रोम शहराची उभारणी काही रातोरात झाली नाही.

इंग्रजी भाषेत ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’ अशी म्हण आहे. म्हणजे रोम शहराची उभारणी काही रातोरात झाली नाही. रोमुलस आणि रेमस यांच्याकडे जरी या उभारणीचे श्रेय जात असले तरी ते काम केवळ या दोघांचे नव्हते. दोघांच्या चार हाताना ते शक्यही नव्हते. हजारो कामगार रात्रंदिवस खपत होते, कलाकार राबत होते, पैशाच्या राशी गोळा करुन ओतल्या जात होत्या, तेव्हां कुठे रोमन साम्राज्याचे वैभव मानल्या गेलेल्या रोम शहराची उभारणी झाली. अगदी आजदेखील त्या शहराचे वैभव, त्याचे ऐश्वर्य आणि त्याची भव्यता साऱ्यांना एकाच वेळी अचंबितही करते आणि बुचकळ्यातही पाडते. अशा या ऐश्वर्यसंपन्न भव्यतेचे मोल ते काय करणार आणि कसे करणार व ते मोजणार तरी कोणत्या मापाने? अशी नेत्रदीपक आणि खरे तर पाहाणाऱ्याचे डोळे फाडून टाकणारी खूबसुरती कधीही मोजता आणि मापता येत नसते. तसे करणे ना त्या काळी शक्य होते ना आजच्या काळी ते शक्य आहे. ऐश्वर्य नजरेत जितके माववून घेता येईल तितके माववून घ्यावे आणि मनातल्या मनात अंदाज बांधत राहावे. पण तसे करताना पाहाणाऱ्यानी स्वत:ची कल्पनाशक्ती कितीही ताणण्याचा प्रयत्न केला तरी ही शक्ती वास्तवाच्या जवळपासदेखील जाऊन पोहोचू शकणार नाही याची पक्की खूणगाठ मनाशी बांधून ठेवावी हेच अंती हितावह. म्हणूनच मोजदाद करणारे लोक भले कोणीही असोत, छगन भुजबळ यांनी ‘स्वकर्तृत्वाने’ उभारलेल्या अत्याधुनिक काळातील रोमन साम्राज्यसदृश साम्राज्याची ते काय मोजदाद करणार आणि काय त्यांना तिथे ओतल्या आणि सांडल्या गेलेल्या संपत्तीचा थांग लागणार? याचे महत्वाचे कारण म्हणजे जसे रोम रातोरात उभे राहिले नाही तसेच भुजबळांचे साम्राज्यदेखील रातोरात उभे राहिलेले नाही. त्यांच्या साम्राज्यातील काही मोजक्या वास्तूंकडेच आज साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे आणि तिथल्या संपत्तीचेच मोजमाप केले जात आहे. नाशकातील त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या निवासी व विलासी वास्तूकडे जरी लोक विस्फारुन बघत असले तरी त्याच्याही उदरात आणखी जे ऐश्वर्य दडलेले आहे ते लोकांच्या नजरेसमोर तर अजून यायचेच आहे. शिवाय भुजबळ नॉलेज सिटी, मुंबई एज्युकेशन ट्रस्ट आणि तत्सम वास्तूंसमान या साम्राज्याच्या अन्य खुणा तर अजून अस्पर्शच आहे. पण मुद्दा तो नाही. मुद्दा इतकाच की हे कामदेखील त्या रोम शहराच्या उभारणीसारखे एकट्या दुकट्याच्या हातून आणि रातोरातही झालेले नाही. एकेक वीट रचत रचतच कोणतेही साम्राज्य उभे राहात असते व त्याला अनेकांचा हातभारही लागावा लागत असतो. भुजबळ ज्या काळात ही एकेक वीट रचत होते, त्या काळात त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते का ज्यांनी लक्ष द्यावयास हेवे होते, ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते? जे भुजबळाना कोणे एके काळी आपला चेला, आपला वारस, आपला उत्तराधिकारी मानीत होते, त्यांना आपला शिष्योत्तम वाममार्गाकडे झुकत चालला आहे, याची कधीच का जाणीव झाली नव्हती? खचितच झाली असणार. पण त्यांनी कधीही शिष्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट भुजबळांच्या परमनेत्यांची भूमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन देण्याचीच असणार. अन्यथा, कोणाचेही इतके स्खलन होऊ शकत नाही. लहान मुलांच्या गोष्टीतील एका तरुणावर चोरीचा आरोप सिद्ध होतो. न्यायाधीश त्याला काही सांगायचे आहे का म्हणून विचारतो. चोर सांगत काही नाही, तिथेच हजर असलेल्या आईजवळ जाण्याची परवानगी घेऊन जातो आणि आईच्या कानाचा कडकडून चावा घेतो. सारे दंग. न्यायाधीश खडसावतो. त्यावर चोर म्हणतो, लहानपणी शाळेत मी पहिल्यांदा एक पेन्सील चोरली तेव्हां हिने माझे कौतुक केले. त्याऐवजी तेव्हांच तिने माझा कान धरला असता तर मी आज चोर झालो नसतो! होईल का असे काही भुजबळांच्याही बाबतीत? आता ते अशक्य आहे. कल्पनेतील गोष्टीतल्याच त्या वाटमारी करणाऱ्याच्या पापात त्याची बायकोही सहभागी होण्यास तयार होत नाही मग भुजबळांचे कर्म कोण कशासाठी आणि का म्हणून आपल्या अंगावर ओढून घेईल? महात्मा गांधी ‘वॉन्ट’ आणि ’नीड’ म्हणजे हाव आणि गरज असा भेद करतात आणि वॉन्ट निषिद्ध मानतात. पण भुजबळ काही गांधीभक्त नव्हेत. त्यांचा सारा विश्वास वॉन्टवर आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना जे कोणी प्रतिपालक भेटले तेदेखील वॉन्टवालेच. एकप्रकारचा समसमासंयोगच तो! नाशकातील भुजबळांच्या प्रासादाचे मूल्य तपासण्याचे कार्य म्हणे दीर्घकाळ चालणारे आहे. दगड विटा सीमेंट मोजता येईल, सागवानाच्या लाकडाचा अंदाज बांधता येईल, विद्युत रोषणाईचा अदमास येऊ शकेल पण मुळातच अवैध संपत्ती अवगुंठित करुन ठेवण्याचे साधन म्हणूनच ज्या पेन्टींग्जना आणि पुराणकालीन वस्तू म्हणजे अ‍ॅन्टीक पीसेसना स्वत:ची अशी खास ओळख आहे, त्यांची बाजारभावातील किंमत शोधून काढणे अशक्य कोटीतील समजले जात असताना त्याची किंमत कोण आणि कशी लावणार? तरीही या प्रकरणात एक मोठा काव्यगत न्याय लपलेला आहे. ज्या हातांनी दीर्घकाळ भुजबळांच्या साम्राज्यात भर टाकण्याचे काम केले तेच हात आता मोजपट्टी घेऊन या साम्राज्याला रुपये आणे पैच्या थोटक्या कोंदणात बसवायचा प्रयत्न करीत आहेत!