शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - शांती-विशाल मनोवृत्ती

By admin | Updated: February 23, 2017 00:16 IST

महात्म्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वजण म्हणत असतात आम्हाला ‘शांती’ हवी आहे. लोकव्यवहारातून अनेक संकटांशी झगडत

महात्म्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वजण म्हणत असतात आम्हाला ‘शांती’ हवी आहे. लोकव्यवहारातून अनेक संकटांशी झगडत त्यावर मात करीत व्यवहारी जीवन जगणारा माणूसही शेवटी कुठेतरी शांती लाभावी ही अपेक्षा करतो तर अशांतीला कारणीभूत असणारी प्रपंचबंधने आणि प्रलोभने तोडून अनासक्त जीवन जगणाऱ्या वैराग्यालाही शांतीच हवी असते.प्रापंचिक माणसाची धडपड तर पारमार्थिक माणसाची उपासना ही केवळ त्या शांतीसाठीच आहे. ‘शांती’ ही भगवंताची आवडती विभूती आहे. भगवद्गीतेने शांती या तत्त्वाला सर्वश्रेष्ठ मानवी मूल्य म्हणून गौरविले आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्म, उपासना या साऱ्यांपेक्षाही शांती सर्वश्रेष्ठ आहे. ‘श्रेयो ही ज्ञानम् अभ्यासात’ या गीतेतील बाराव्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माउलींनी म्हटले आहे.‘‘अभ्यासाहूनि गहन।पार्था मग ज्ञान।ज्ञानापासोनि ध्यान।विशेषिजे।।’’ अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे. ज्ञानापेक्षा ध्यान सर्वश्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षा कर्मफलत्याग विशेष आहे आणि शेवटी ‘त्यागाहुनि भोगु। शांतिसुखाचा’ कर्मफलत्यागापेक्षाही शांति सर्वश्रेष्ठ आहे. शेवटी ज्ञान आणि ध्यान ज्या गावाला मुक्कामाला जातात, त्या गावाचे नाव ‘शांती’ होय. दैवीगुणसंपत्तीच्या अधिकाधिक जवळ जाणे हे मानवी जीवनाचे प्रयोजन आहे. शांती ही भगवंताच्या अगदी जवळ वावरणारी आणि प्रेमाचा आनंद देणारी अवस्था आहे. ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी शांती या गुणसांैदर्याचे लक्षण सांगितले आहे. आत्मदर्शनाने विकास पावलेली विशाल आणि व्यापक मनोवृत्ती म्हणजे शांती होय. मानवी जीवन जगताना काही शारीरिक, मानसिक गरजा आहेत. त्या गरजांची पूर्तता होणे आणि ती करून घेणे हे स्वाभाविक आहे. पण गरजा या जर मर्यादा सोडून हव्यासाकडे झेपावल्या की सुखोपभोगाच्या शांतीचाही लय होतो. माणसाला गरजेपेक्षा खूप पैसा मिळाला, खूप पदे लाभली, खूप भोग भोगले, पाण्यासारखा पैसाही खर्च केला. पैशाच्या मागे आवश्यकता नसतानाही धावत सुटला आणि सारखा पैसा पैसा करत आसक्तीने ग्रासला गेला तर शेवटी त्या आसक्तीच्या मागे लागून जीवनाच्या आनंदाला मुकतो. जगाच्या व्यवहारात बेचैनी आणि अहंकार थैमान घालीत असतात. मी आणि माझे या अहंतेचे आणि ममतेचे दडपण दूर झाल्याशिवाय आनंद मिळणार नाही. शांती ही ममत्व नाहीसे करते आणि समत्व उभे करते. त्यामध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हरपून त्याला अत्यानंदाची अनुभूती येते. ही अनुभूती निर्हेतुक आणि नैसर्गिक असते. त्यातूनच सारे अंतरविरोध शमन पावतात आणि शांतीच्या वाटचालीतून समाधानाचा मुक्काम गाठला जातो.डॉ. रामचंद्र देखणे