शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

तब्येतीस जपावे!

By admin | Updated: May 28, 2014 11:47 IST

लच्छेदार दूध, त्यात भरपूर साखर, तळाशी गुळाचा खडा, मधाचे चार वळसे आणि वरतून साजूक तुपाची धार! देशातील सध्याचे सारे वातावरणच असे मिष्टान्नपूर्ण बनले आहे

लच्छेदार दूध, त्यात भरपूर साखर, तळाशी गुळाचा खडा, मधाचे चार वळसे आणि वरतून साजूक तुपाची धार!  देशातील सध्याचे सारे वातावरणच असे मिष्टान्नपूर्ण बनले आहे. शरीररक्षणास गोड तसे गरजेचेच, पण अतिगोड म्हणजे अकारण मधुमेहास निमंत्रण, असे आरोग्यशास्त्र सांगते. अर्थात, मधुमेह टाळण्यासाठी कारल्याचा रस उत्तम. तोही मंत्रिमंडळाच्या रचनेच्या परिणामी झालेल्या नाराजवंतांच्या  रूपाने मिळत असल्याने मोदी सरकारला तूर्तास तरी चिंतेचे काही कारण नाही. दीर्घकालीन साथ करणारी शिवसेना असो, त्यानंतर मैत्र गटात आलेला अकाली दल असो, वार्‍याची दिशा अचूकपणे ओळखून या गटात आपला शिरकाव करून घेणारी लोजपा असो, की दहा वर्षांपूर्वी जिने दगाफटका केला, ती तेदेपा असो, सार्‍यांमध्ये मंत्रिपदाचे समन्यायी वाटप. प्रत्येकी केवळ एकच. साडेचार वर्षे  मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या चंद्राबाबूंच्या तेदेपाला दहा वर्षांपूर्वी अचानक भाजपा जातीयवादी असल्याचा साक्षात्कार झाला आणि इंडिया शायनिंगच्या जोडीनेच भाजपा शायनिंगचे स्वप्न अधुरे राहून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संपुआचा सत्ताप्रवेश झाला. याबाबतीत रामविलास पासवान हेदेखील चंद्राबाबूंचे सख्खे बंधूच. पण, मनी कोणताही डूख न धरता, मोदींनी सब घोडे बारा टक्के हा न्याय लागू केला. जुन्या मित्रांनी जराशी आदळआपट करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण मोदींच्या चेहर्‍यावरची सुरकुती जराही ढळली नाही. रालोआचा इतिहास बघता हे धाडसच. पण, ते आले कुठून? तर ते आले जनतेने एकट्या भाजपाला दिलेल्या स्पष्ट बहुमताच्या माध्यमातून. देशात आजवर होऊन गेलेल्या पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक कणखर म्हणून आजही इंदिरा गांधी यांचे नाव अगदी सार्थपणे घेतले जाते. पण, त्यांनी प्रत्येक वेळी प्रचंड बहुमत पाठीशी घेऊन राज्य केले. त्यांच्या निर्घृण हत्येनंतर राजीव गांधी यांना उच्चांकी बहुमत मिळाले आणि ते देशाला एकविसाव्या शतकात लीलया घेऊन गेले. पण, त्यानंतरच्या निवडणुकीत जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत नाकारले, तेव्हा राजीव यांनी चक्क सत्तेकडेच पाठ फिरविली. याचा स्पष्ट अर्थ आज लोकांना मोदी कणखर वाटत असतील, तर ती किमया निश्‍चित त्यांना लाभलेल्या स्पष्ट जनाधाराची आहे! त्यापायीच मग त्यांनी कोणाच्याही विरोधाची वा अगदी सर्मथनाचीही वाट न बघता आपल्या शपथविधीसाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आवर्जून निमंत्रित केले. तरीही त्यांच्यापैकी सर्वाधिक  चर्चिले गेलेले नाव म्हणजे पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ. काही कथित विचारवंतांसह प्रसारमाध्यमांनी आणि सेनेसारख्या भाजपाच्या जिवलग मित्रांनीही या नावाला आक्षेप घेतला. काही गर्भित आणि काही उघड धमक्याही देऊन पाहिल्या. पण, मोदी हललेसुद्धा नाहीत. रालोआ-एकसारखी स्थिती असती, तर हे जमले असते? अर्थात, शरीफ यांना धाडलेल्या निमंत्रणावरून असा गदारोळ माजविला जाण्याचे काही कारण नव्हते. सरकारने केवळ काम करीत राहून चालत नाही, तर ते काम करीत असल्याचे लोकांना दिसले आणि जाणवलेही पाहिजे, असे जे म्हटले जाते, ते खरे असेल, तर मोदींच्या या निमंत्रण राजनीतीमुळे सरकार आपल्या सर्व शेजार्‍यांशी मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंध राखू शकते व नव्या सरकारची यापुढील काळातील परराष्ट्रनीती याच तत्त्वावर आधारित असेल, हा संदेश जाणे म्हणजेच सरकार काम करीत असल्याचे लोकांना दिसणे, असे म्हणता येईल. अर्थात, मोदींनी निमंत्रण धाडले आणि शरीफ भारतात आले, असे झालेले नाही. ते येतील वा नाही, याबाबतच दीर्घ काळ चर्चा सुरू होती. अंतत: ते आले, पण त्यामागील प्रेरणा नवाझ यांच्या मातोश्रींची होती, असे खुद्द मोदी यांनीच म्हटले आहे. मोदींच्या मनात आपल्या मातेविषयी असलेले प्रेम आणि ओढ पाहून शरीफ यांची माता अत्यंत भारावून गेली व तिनेच आपल्या पुत्राला दिल्लीकडे रवाना केले. याचा अर्थ केवळ भारताचाच नव्हे, तर पाकिस्तानचा नेतादेखील तितकाच भावनाप्रधान असल्याची बाब यातून जगासमोर  आली आणि भावनाशील नेतृत्व रयतेच्या मानात आपले विशिष्ट स्थान निर्माण करीत असते, हे तर सार्वत्रिक सत्यच आहे. पण, यामधून लगेचच हुरळून जाण्याचेही कारण नाही. राजकीय प्रक्रियेमधून देशाच्या नेतृत्वपदी पोहोचलेल्या मोदी आणि शरीफ यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तो लक्षात ठेवूनच किमान पाकच्या बाबतीत तरी यापुढील पावले काळजीपूर्वकच उचलावी लागतील.  त्याचबरोबर उचलला दगड आणि हाणला बेस्टच्या बसवर या सहजतेने, पाकिस्तानने जराशी गडबड केली रे केली, की दाबून टाका अणुबॉम्बची कळ, असा आचरट सल्ला देणार्‍या मित्रांपासून तर अधिकच सावध राहावे लागेल. त्यासाठीच मग तब्येतीस जपावे, हा मोदी सरकारला सल्ला!