शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

बाबासाहेब, ‘आम्ही कृतघ्न’

By admin | Updated: July 12, 2016 00:02 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या गावात साजरी करण्यासाठी एखाद्या कार्यकर्त्याला न्यायालयाचे दार ठोठवावे लागत असेल तर समाज म्हणून आपण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या गावात साजरी करण्यासाठी एखाद्या कार्यकर्त्याला न्यायालयाचे दार ठोठवावे लागत असेल तर समाज म्हणून आपण केवळ कृतघ्नच नाही तर त्या महापुरुषाच्या विचारांचे मारेकरीही ठरतो.वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या पांगरी नवघरे या गावात २००७ पासून बाबासाहेबांच्या जयंती-पुण्यतिथीचा कार्यक्रम होत नाही. एका वादाची पार्श्वभूमी असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची सबब पुढे करून पोलीस प्रशासन बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाही. ज्या महापुरुषाने या देशाला राज्यघटना दिली, त्याची जयंती साजरी केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी घटनेतील मूल्य अद्याप स्वीकारलेले नाही, असा त्याचा अर्थ होतो. बाबासाहेबांनी तुमच्या-आमच्या आयुष्याचे मार्ग प्रशस्त केले, त्यांच्याविषयीची कृतज्ञता जयंती-पुण्यतिथीच्या माध्यमातून व्यक्त केल्यामुळे सामाजिक शांततेचा भंग होत असेल तर अशा वेळी समाजाच्या खऱ्या प्रबोधनाची निकड वाटू लागते. केवळ देशातच नव्हे तर साऱ्या जगात वंदनीय ठरलेल्या या महामानवाबद्दल काही माणसांच्या मनात पूर्वग्रह असतील तर ते कायद्याने नव्हे तर लोकशिक्षणातूनच नष्ट करावे लागतील, हेही इथे परखडपणे सांगायलाच हवे.या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक आश्वासक निर्णय देताना, ‘गावकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा’, असे सुचविले आहे. समाजाने निर्माण केलेले प्रश्न समाजानेच एकत्र येऊन सोडवायचे असतात. कायद्याने या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची उत्तरे तत्कालिक मिळतात खरी पण समाजाच्या मनात असलेले पूर्वग्रह त्यातून नष्ट होत नाहीत, उलट ते अधिक बळकट होतात. असे सामाजिक सौहार्दाचे प्रश्न सोडवायला राजकारणी माणसे फारशी उत्सुक नसतात. कारण जातीय तेढ निर्माण करणे व ती तशीच ठेवणे हेच त्यांच्या राजकारणाचे भांडवल असते. या वादांमुळे आपली मते वाढतात, असा समज राजकारण्यांचा असल्यामुळेच पांगरी नवघरेचा प्रश्न सुटत नाही. आज कायद्याने जात, पात पाहण्याचे दिवस संपले. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ती रुतून असतेच. जेव्हा ती उफाळून येते तेव्हा एखाद्या असाह्य दलित महिलेची गावातून धिंड काढली जाते किंवा दलित तरुणाला जिवंत जाळले जाते. पांगरी नवघरेत बाबासाहेबांची जयंती होऊ न देण्यामागे हीच ‘जात’ कारणीभूत आहे. स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही खेड्यापाड्यातील दलित समाज वेगळी वस्ती करून का राहतो? इतर जातीच्या लोकांसोबत राहायला तो का घाबरतो? वरवर अतिशय क्षुल्लक वाटणारा हा प्रश्न पांगरीच्या घटनेच्या निमित्ताने साऱ्यांनाच अस्वस्थ करणारा आहे. प्रश्न एका गावात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा नाही. या महापुरुषाची भूमिका राष्ट्रनिर्मात्याची होती. केवळ दलितच नाही तर समाजातील शोषित-वंचितांना माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. बाबासाहेबांच्या त्यागापुढे नतमस्तक होताना आपण नेहमी कद्रुपणा दाखवतो, त्यांना जातीबाहेर पडू देत नाही, हे कटू सत्य आहे. पांगरीसारख्या गावातील ‘जातवास्तव’ समोर आले की, आपले सामाजिक अपराधीपण मग असे ठसठशीतपणे समोर येत असते. ‘शुद्रादी-अतिशुद्रांची’ समान आधारावर एकजूट व्हावी आणि शोषणावर, विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेचे त्यांनी उच्चाटन करावे’ हे फुले-शाहू-आंबेडकरांचे स्वप्न होते. ते स्वप्न आपण जाती-पोटजातींच्या अस्मितेत अमानुषपणे कुस्करुन टाकले. वंचितांचा एक वर्ग त्यातूनच उपेक्षित राहिला. बहुजन समाजातीलच एका मोठ्या घटकाला फुले-शाहू-आंबेडकर जवळचे का वाटत नाहीत, या प्रश्नाचे थेट उत्तर ‘दलित-बहुजन’ या व्यापक संकल्पनेत दडलेले आहे. हा एकोपा ज्या दिवशी प्रत्यक्षात घडून येईल त्या दिवशी पांगरी नवघरेत एकदिलाने बाबासाहेबांचा आणि माणुसकीचाही जयजयकार होईल.- गजानन जानभोर