शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

शुभ वर्तमान

By admin | Updated: October 27, 2015 23:02 IST

‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक निर्यातीमध्ये भरारी घेऊ पाहणाऱ्या भारतासाठी, क्वीन एलिझाबेथ प्राईझ फॉर इंजिनिअरिंग या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संस्थेद्वारा जारी अहवाल

‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक निर्यातीमध्ये भरारी घेऊ पाहणाऱ्या भारतासाठी, क्वीन एलिझाबेथ प्राईझ फॉर इंजिनिअरिंग या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संस्थेद्वारा जारी अहवाल, शुभ वर्तमान ठरू शकतो. या अहवालानुसार, भारत हा जगात सर्वाधिक अभियंते तयार करणारा देश ठरणार आहे. भारतातील तब्बल ८० टक्के विद्यार्थ्यांचा ओढा अभियांत्रिकीकडे असून, त्यामध्ये मुलींचाही मोठा वाटा आहे. याउलट ब्रिटनमधील केवळ २० टक्के तर अमेरिकेतील केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे आहे. चीनमध्येही ६२ टक्के विद्यार्थ्यांनीच अभियांत्रिकीप्रती आवड दर्शविली असल्याचे हा अहवाल म्हणतो. सदर आकडेवारी महत्त्वाची आहे आणि ही बातमी भारतासाठी शुभ वर्तमान ठरू शकते ती यासाठी, की मानवी जीवन सुखकर करण्याची कामगिरी, जेवढी उपयोजित विज्ञान म्हणजेच अभियांत्रिकीने बजावली आहे तेवढी ती इतर कोणत्याही घटकाने बजावलेली नाही. त्यामुळे भारत जर अभियंते निर्माण करण्यात जगात आघाडी घेणार असेल, तर ती आपल्यासाठी आनंदाची बातमी आहेच; पण एखाद्या देशाचे अभियांत्रिकीमधील कौशल्य अभियंत्यांच्या केवळ संख्येवर नव्हे, तर दर्जावर अवलंबून असते, हे विसरता येणार नाही व नेमके तिथेच घोडे पेंड खाते! शिक्षणाचा बाजार मांडून ठेवल्यामुळे, काही सन्माननीय अपवाद वगळता देशातील बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालये केवळ पदवीची भेंडोळी घेऊन बाहेर पडणारे अभियंते तयार करणारे कारखाने झाले आहेत. त्याचवेळी दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण मिळालेले बहुतांश युवक, देशात उत्तम संधी उपलब्ध नसल्याने पाश्चात्य राष्ट्रांची वाट धरतात. त्यामुळे त्यांच्या कौशल्याचा देशाला काही उपयोग होऊ शकत नाही. भारताला एक आधुनिक, शक्तिशाली, समर्थ देश बनवायचे असेल तर देशात मोठ्या संख्येत दर्जेदार अभियंते तयार करावे लागतील आणि ते देशातच राहून त्यांच्या कौशल्याचा देशाच्या उभारणीसाठी वापर करतील, अशी स्थिती निर्माण करावी लागेल. अशी स्थिती निर्माण होईल, तेव्हाच क्वीन एलिझाबेथ प्राईझ फॉर इंजिनिअरिंगचा अहवाल भारतासाठी शुभ वर्तमान ठरेल!