शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

व्यूह

By admin | Updated: October 3, 2016 06:18 IST

तुकाराम म्हणतात तसा मनाशी संवाद होतो का? तो झाला तर वाद आला विवाद आला.

तुका म्हणे होय मनाशी संवाद। आपुलाचि वाद आपणासी।। तुकाराम म्हणतात तसा मनाशी संवाद होतो का? तो झाला तर वाद आला विवाद आला. पण तुकाराम वाद इतरांशी करीत नाहीत. त्यांचा वाद स्वत:शी आहे. जे स्वत:शी बोलू शकतात ते स्वत:ला नवनव्या प्रवाहात सामील करून घेऊ शकतात, त्यातील आणि आपल्यातील टाकाऊ काय किंवा टिकाऊ काय हे पाहण्याची दृष्टी त्यांना मिळते, म्हणूनच आश्चर्य वाटतं प्रचंड जीवनाची हाव आणि हौस असणारी माणसं क्षणात विरक्त होतात. इतके की आपण पूर्वी कोण होतो याचीही त्यांना जाणीव राहत नाही. मराठीतील एक नामवंत लेखक आयुष्यभर माणसातील वासना, व्यवस्थेविरुद्धची तडफड, राग, स्त्रीविषयी प्रचंड आसक्ती आणि घृणाही... हे सगळं त्याच्या लेखनात होतं. कसा बदल होत जातो कळत नाही पण झाला आणि तो लेखक इतका विरक्त झाला की घरदार सोडून, भगवी वस्त्र घालून एका अनाम मंदिरात राहू लागला. सर्वसंगपरित्याग हा शब्द आहे. तो बोलायला छान, पण आचरायला कठीण. त्याने ते केलं. एखादा माणूस इतरांना क्षणात नकोसा होत नाही. त्याच्या वागण्यात बदल होऊ लागतात. तो एकतर कमालीचा चिडचिडा, उद्धट किंवा पराकोटीचा शांत, बधिर, एकटा, निर्विकार होत जातो.ही दोन्ही टोकं ज्याने आपल्या मनाच्या धाकाने बांधली वा जोडली तोच जिंकला. पण, हे जिंकणं सोपं नाही. आपण ऊठसूट काही संत-महात्मे यांची नावं घेतो. सगळे आपलेच सोयरे आहेत असं आपण बोलतो. पण खरं सांगायचं तर हा प्रचंड चक्रव्यूह आहे. वेद, तत्त्वज्ञान, धम्म या साऱ्यांत सहज म्हणून फिरता येत नाही. त्यात पूर्ण अवगाहन करून बुडून गेलेले स्वत:ला पूर्ण वाया गेलो अशी समजूत झालेले जेव्हा तक्रार न करता जगाला वेडं वाटावं असं वागतात किंवा बोलतात तेव्हा समजायचं ही चक्रव्यूह भेदण्याची धडपड आहे. बरेचसे अभिमन्यू होण्यात धन्यता मानतात. किती वेगळं जगता जगता संपत गेलो हे डोळ्यांनी पाहतानाही ते कृतार्थ असतात. कारण तथाकथित विषयांची, संसाराची, लौकिकार्थाची कुठलीही बंधनं त्यांनी स्वीकारलेली नसतात. म्हणून ही माणसं भणंग असतात. जगाला एक तर ते पराकोटीचे मूर्ख, गाढव वाटतात नाहीतर एकदम महान व्यक्ती. पण त्याला खूप वेळ द्यावा लागतो. पिढ्या बरबाद कराव्या लागतात.त्यांना क्षमा करो, ते काय करतात त्यांना कळत नाही... हे म्हणायला क्षमेचे काटे आणि विरक्तीचा काटेरी मुकुट परिधान करावा लागतो. ज्यांनी जखमा जोजवल्या त्यांना हा छळ काहीच वाटत नाही. फक्त जगण्याचे हे व्यूह भेदून जाता यायला हवेत. ते ज्याला जमलं तो जिंकला. जेते झाला, नेते झाला, संत झाला.व्यूह करून शत्रूचा तळ उद््ध्वस्त करायला हिंमत लागते बाबा! त्याचाच जयजयकार होतो. तो खरा सैनिक!-किशोर पाठक