शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

व्यूह

By admin | Updated: October 3, 2016 06:18 IST

तुकाराम म्हणतात तसा मनाशी संवाद होतो का? तो झाला तर वाद आला विवाद आला.

तुका म्हणे होय मनाशी संवाद। आपुलाचि वाद आपणासी।। तुकाराम म्हणतात तसा मनाशी संवाद होतो का? तो झाला तर वाद आला विवाद आला. पण तुकाराम वाद इतरांशी करीत नाहीत. त्यांचा वाद स्वत:शी आहे. जे स्वत:शी बोलू शकतात ते स्वत:ला नवनव्या प्रवाहात सामील करून घेऊ शकतात, त्यातील आणि आपल्यातील टाकाऊ काय किंवा टिकाऊ काय हे पाहण्याची दृष्टी त्यांना मिळते, म्हणूनच आश्चर्य वाटतं प्रचंड जीवनाची हाव आणि हौस असणारी माणसं क्षणात विरक्त होतात. इतके की आपण पूर्वी कोण होतो याचीही त्यांना जाणीव राहत नाही. मराठीतील एक नामवंत लेखक आयुष्यभर माणसातील वासना, व्यवस्थेविरुद्धची तडफड, राग, स्त्रीविषयी प्रचंड आसक्ती आणि घृणाही... हे सगळं त्याच्या लेखनात होतं. कसा बदल होत जातो कळत नाही पण झाला आणि तो लेखक इतका विरक्त झाला की घरदार सोडून, भगवी वस्त्र घालून एका अनाम मंदिरात राहू लागला. सर्वसंगपरित्याग हा शब्द आहे. तो बोलायला छान, पण आचरायला कठीण. त्याने ते केलं. एखादा माणूस इतरांना क्षणात नकोसा होत नाही. त्याच्या वागण्यात बदल होऊ लागतात. तो एकतर कमालीचा चिडचिडा, उद्धट किंवा पराकोटीचा शांत, बधिर, एकटा, निर्विकार होत जातो.ही दोन्ही टोकं ज्याने आपल्या मनाच्या धाकाने बांधली वा जोडली तोच जिंकला. पण, हे जिंकणं सोपं नाही. आपण ऊठसूट काही संत-महात्मे यांची नावं घेतो. सगळे आपलेच सोयरे आहेत असं आपण बोलतो. पण खरं सांगायचं तर हा प्रचंड चक्रव्यूह आहे. वेद, तत्त्वज्ञान, धम्म या साऱ्यांत सहज म्हणून फिरता येत नाही. त्यात पूर्ण अवगाहन करून बुडून गेलेले स्वत:ला पूर्ण वाया गेलो अशी समजूत झालेले जेव्हा तक्रार न करता जगाला वेडं वाटावं असं वागतात किंवा बोलतात तेव्हा समजायचं ही चक्रव्यूह भेदण्याची धडपड आहे. बरेचसे अभिमन्यू होण्यात धन्यता मानतात. किती वेगळं जगता जगता संपत गेलो हे डोळ्यांनी पाहतानाही ते कृतार्थ असतात. कारण तथाकथित विषयांची, संसाराची, लौकिकार्थाची कुठलीही बंधनं त्यांनी स्वीकारलेली नसतात. म्हणून ही माणसं भणंग असतात. जगाला एक तर ते पराकोटीचे मूर्ख, गाढव वाटतात नाहीतर एकदम महान व्यक्ती. पण त्याला खूप वेळ द्यावा लागतो. पिढ्या बरबाद कराव्या लागतात.त्यांना क्षमा करो, ते काय करतात त्यांना कळत नाही... हे म्हणायला क्षमेचे काटे आणि विरक्तीचा काटेरी मुकुट परिधान करावा लागतो. ज्यांनी जखमा जोजवल्या त्यांना हा छळ काहीच वाटत नाही. फक्त जगण्याचे हे व्यूह भेदून जाता यायला हवेत. ते ज्याला जमलं तो जिंकला. जेते झाला, नेते झाला, संत झाला.व्यूह करून शत्रूचा तळ उद््ध्वस्त करायला हिंमत लागते बाबा! त्याचाच जयजयकार होतो. तो खरा सैनिक!-किशोर पाठक