शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

भाष्य - अन्न आयोग केव्हा?

By admin | Updated: May 4, 2017 00:13 IST

देशातील गोरगरीब जनतेला सवलतीच्या दरात हक्काचे अन्न मिळावे, आपली भूक भागविता यावी या व्यापक उद्दिष्टातून केंद्र सरकारने

देशातील गोरगरीब जनतेला सवलतीच्या दरात हक्काचे अन्न मिळावे, आपली भूक भागविता यावी या व्यापक उद्दिष्टातून केंद्र सरकारने अन्नसुरक्षा कायदा अस्तित्वात आणला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची जी व्यवस्था करण्यात आली त्याअंतर्गत प्रत्येक राज्यात अन्न आयोगाची स्थापना करणे बंधनकारक होते. विविध उपाययोजनांसोबतच जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्याविरुद्ध अर्जांची सुनावणी करून योग्य निर्णय देणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या आयोगाला पार पाडायच्या आहेत. परंतु हा कायदा तयार होऊन तीन वर्षे लोटून गेल्यावरही अनेक राज्यांत अद्याप हा आयोग स्थापनच झालेला नाही, हे सत्य सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान समोर आले असून, न्यायालयाने या बेजबाबदार वागणुकीबद्दल संबंधित राज्यांना खडसावलेही. यात दुष्काळग्रस्त मध्य प्रदेश, बिहार आणि कर्नाटकशिवाय महाराष्ट्राचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे न्यायालयाने या मुद्द्यावर महाराष्ट्राने दिलेल्या युक्तिवादावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. अन्न आयोगावर पाच सदस्यांची नियुक्ती झाली आहे. पण अनुसूचित जाती जनजातीच्या दोन सदस्यांची नेमणूक केलेली नाही, हे राज्याच्या वतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले तेव्हा संतप्त न्यायाधीशांनी ‘तुम्हाला संपूर्ण राज्यातून अनुसूचित जाती जमातीतील दोन व्यक्ती शोधता आल्या नाहीत काय?’ असा सवाल केला. इतर राज्यांमधीलही स्थिती जवळपास सारखीच असल्याचे निदर्शनास आले आहे. देशाच्या विकासातील हाच सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक महत्त्वाकांक्षी योजना तयार केल्या जातात; पण त्याची काटेकोर अंमलबजावणीच होत नाही. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा ऐतिहासिक कायदा संमत करण्यात आला होता. या योजनेद्वारे देशातील एकूण लोकसंख्येच्या ७८ टक्के लोकांना अन्नसुरक्षा कवच प्राप्त झाले आहे. वाढती लोकसंख्या, बदलते हवामान, पाण्याचे दुर्भिक्ष, दुष्काळ यासारख्या संकटांचा सामना करीत असताना शाश्वत अन्नचक्र निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे. देशातील लाखो लोक अजूनही उपाशीपोटी झोपतात, हे वास्तव नाकारता येणार नाही. ही परिस्थिती बदलायची असल्यास यासंबंधीची शासनाची ध्येयधोरणे आणि कायद्यांची योग्य अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.