शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

भाष्य - अन्न आयोग केव्हा?

By admin | Updated: May 4, 2017 00:13 IST

देशातील गोरगरीब जनतेला सवलतीच्या दरात हक्काचे अन्न मिळावे, आपली भूक भागविता यावी या व्यापक उद्दिष्टातून केंद्र सरकारने

देशातील गोरगरीब जनतेला सवलतीच्या दरात हक्काचे अन्न मिळावे, आपली भूक भागविता यावी या व्यापक उद्दिष्टातून केंद्र सरकारने अन्नसुरक्षा कायदा अस्तित्वात आणला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची जी व्यवस्था करण्यात आली त्याअंतर्गत प्रत्येक राज्यात अन्न आयोगाची स्थापना करणे बंधनकारक होते. विविध उपाययोजनांसोबतच जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्याविरुद्ध अर्जांची सुनावणी करून योग्य निर्णय देणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या आयोगाला पार पाडायच्या आहेत. परंतु हा कायदा तयार होऊन तीन वर्षे लोटून गेल्यावरही अनेक राज्यांत अद्याप हा आयोग स्थापनच झालेला नाही, हे सत्य सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान समोर आले असून, न्यायालयाने या बेजबाबदार वागणुकीबद्दल संबंधित राज्यांना खडसावलेही. यात दुष्काळग्रस्त मध्य प्रदेश, बिहार आणि कर्नाटकशिवाय महाराष्ट्राचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे न्यायालयाने या मुद्द्यावर महाराष्ट्राने दिलेल्या युक्तिवादावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. अन्न आयोगावर पाच सदस्यांची नियुक्ती झाली आहे. पण अनुसूचित जाती जनजातीच्या दोन सदस्यांची नेमणूक केलेली नाही, हे राज्याच्या वतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले तेव्हा संतप्त न्यायाधीशांनी ‘तुम्हाला संपूर्ण राज्यातून अनुसूचित जाती जमातीतील दोन व्यक्ती शोधता आल्या नाहीत काय?’ असा सवाल केला. इतर राज्यांमधीलही स्थिती जवळपास सारखीच असल्याचे निदर्शनास आले आहे. देशाच्या विकासातील हाच सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक महत्त्वाकांक्षी योजना तयार केल्या जातात; पण त्याची काटेकोर अंमलबजावणीच होत नाही. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा ऐतिहासिक कायदा संमत करण्यात आला होता. या योजनेद्वारे देशातील एकूण लोकसंख्येच्या ७८ टक्के लोकांना अन्नसुरक्षा कवच प्राप्त झाले आहे. वाढती लोकसंख्या, बदलते हवामान, पाण्याचे दुर्भिक्ष, दुष्काळ यासारख्या संकटांचा सामना करीत असताना शाश्वत अन्नचक्र निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे. देशातील लाखो लोक अजूनही उपाशीपोटी झोपतात, हे वास्तव नाकारता येणार नाही. ही परिस्थिती बदलायची असल्यास यासंबंधीची शासनाची ध्येयधोरणे आणि कायद्यांची योग्य अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.