शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

भाष्य - कर्जमाफीचे नेमके काय?

By admin | Updated: July 8, 2017 00:09 IST

‘शेतकऱ्यांची कर्जमाफी’ हा गेले जूनचा महिनाभर चर्चेतला विषय आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीची घोषणा अर्ध्या

‘शेतकऱ्यांची कर्जमाफी’ हा गेले जूनचा महिनाभर चर्चेतला विषय आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीची घोषणा अर्ध्या रात्री केली; पण केवळ आंदोलन शमविण्यासाठी सरकारने ही फसवी घोषणा केल्याचा अर्थ विरोधकांनी केला आणि कर्जमाफीचा विषय थांबला नाही. या कर्जमाफीचा अर्थ धड सरकारला सांगता येईना, ना बँकांना समजेना. दरम्यान, सरकारने बँकांकडून आकडेवारी मागविण्यास सुरुवात केली. कर्जमाफीच्या घोषणेनंतर बँकांना एक लाखापर्यंतच्या कर्जदार शेतकऱ्यांची आकडेवारी सादर करण्यास जेमतेम १० दिवसांचाही कालावधी दिला नाही. ती यादी सादर होते न् होते तोच दीड लाखापर्यंतच्या थकबाकीदारांची आकडेवारी सरकारने मागवली. या याद्या बाजूला ठेवून सरकारने दीड लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांना ३४,००० कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यामध्ये राज्यातील सरसकट ८९ लाख शेतकऱ्यांचा समावेश झाल्याचे सरकारचे म्हणणे असले तरी दीड लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांनाही सरकारने आणखी निकष लावले आहेत. उर्वरित कर्ज भरले तरच माफी मिळेल, नोकरदार किंवा १० लाखांपर्यंतचे व्यापारी, शेतकरी, आजी-माजी मंत्री यांना अशा काही अटी घालण्यात आल्याने सरतेशेवटी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र होणार हे सरकारलाच माहीत. ज्यावेळी सरकारने बँकांकडे अशी आकडेवारी मागितली तेव्हा बँकांनाही अशा अटींची कल्पना नव्हती. त्यांनी सरसकट आकडेवारी पाठवली. सरकारच्या घोषणेने बँकांनी पाठवलेल्या याद्या या कचऱ्यात गेल्या असून, त्यांना काहीही अर्थ उरलेला नाही. प्रथम एक लाखापर्यंतचे थकबाकीदार शेतकरी, नंतर दीड लाखापर्यंतचे आणि त्यानंतर दीड लाख माफीची घोषणा. ही घोषणा म्हणजे पुन्हा एकदा कर्जफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना पळ म्हटल्याचा प्रकार आहे. अजूनही शेतकरी या घोषणेचा अर्थ लावत बसला आहे. दरम्यान, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात कर्जमुक्तीचा नव्याने आदेश काढणार असल्याची घोषणा केली. त्यामध्ये कर्जमाफीत न बसणाऱ्या शेतकऱ्यांना कसे बसवता येईल असे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे उर्वरित कर्ज भरुन कर्जमुक्तीच्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे. जे नोकरदार व व्यापारी शेतकरी आहेत त्यांच्याही आशा पल्लवित झाल्या असून, असा वर्गही बँकांच्या तगाद्याला जुमानेसा झाला आहे. म्हणजे कर्जमाफी कुणाला द्यायची, किती द्यायची, याबाबत सरकारमध्ये गोंधळाची स्थिती आहे हे नक्की. सरकारनेच लवकर नव्हे एकदाच काय तो निर्णय घ्यावा आणि नेमके कोणाचा कर्जमाफीत समावेश करायचा ते स्पष्ट सांगावे.