शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

भाष्य - स्वागतार्ह सूतोवाच

By admin | Updated: December 26, 2016 00:25 IST

यापुढील काळात मोटार विकत घेण्यापूर्वी, ती नांगरून (पार्किंग) ठेवण्यासाठी पुरेशी जागा असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा विचार

यापुढील काळात मोटार विकत घेण्यापूर्वी, ती नांगरून (पार्किंग) ठेवण्यासाठी पुरेशी जागा असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे सूतोवाच, केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंंकय्या नायडू यांनी केले आहे. आपण स्वत: या संदर्भात अत्यंत आग्रही असून, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि राज्य सरकारांशी चर्चा सुरू आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. खरे तर हा निर्णय खूप आधीच व्हायला हवा होता. अगोदरच भारतातील बहुतांश शहरांमध्ये नियोजनाची बोंब आहे. अरुंद रस्ते-गल्ल्या, दुचाकी-तिचाकी-चारचाकी अशा नाना तऱ्हेच्या वाहनांची भरमसाठ गर्दी, वाहतुकीच्या नियमांना सर्रास ठेंगा दाखविण्याची नागरिकांची प्रवृत्ती, यामुळे देशातील सर्वच लहानमोठ्या शहरांमध्ये, काही तुरळक रस्त्यांचा अपवाद वगळता, वाहतुकीची पार ऐशीतैशी झाल्याचे चित्र सदासर्वकाळ बघावयास मिळते. त्यामध्ये भर पडते ती रस्त्याच्या कडेच्या जागेला किंवा पदपथांना आपली जहागीर समजून केलेल्या उभे केलेल्या वाहनांची! बहुमजली इमारतींमध्ये पाहुण्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय केलेली नसते. त्यामुळे अशा इमारतींसमोर पाहुण्यांच्या वाहनांनी रस्त्याचा बराच मोठा भाग व्यापून टाकल्याचे चित्र दिसते. ते कमी म्हणून की काय, अनेक इमारतींमध्ये रहिवाशांच्या वाहनांच्याच पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसते. असली तरी अनेकदा ती भयंकर अडचणीची असते. त्यामुळे अशा इमारतींमधील रहिवासीही अनेकदा त्यांची वाहने इमारतीसमोरील रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर उभी करून ठेवतात. त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्यामुळे मोठा मनस्ताप होतो. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होऊन, कधीकधी अग्निशमन दलाचे बंब किंवा रुग्णवाहिकांचाही खोळंबा होतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता नायडूंनी सूतोवाच केलेला निर्णय प्रत्यक्षात येणे अत्यंत गरजेचे आहे. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने २०१५ मध्येच सिमला महानगरपालिकेच्या क्षेत्रापुरता असा आदेश राज्य सरकारला दिला होता. या वर्षीच्या प्रारंभी नोएडा येथील स्थानिक प्रशासनानेही व्यापारी वाहनांसाठी असाच आदेश अंमलात आणला होता. नोएडात साडेचार लाखांपेक्षा जास्त व्यापारी व खासगी वाहने आहेत आणि त्यामध्ये दररोज सरासरी सुमारे पाचशे वाहनांची भर पडत असते. परिणामी तिथे वाहतूक कोंडीचा मोठाच प्रश्न निर्माण झाला असून, सार्वजनिक वाहनतळांवर कब्जा करणारे ‘पार्किंग माफिया’ जन्माला आले आहेत. राष्ट्रीय राजधानीला खेटून वसले असल्यामुळे नोएडात या प्रश्नाने गंभीर स्वरुप धारण केले असले तरी, इतर शहरांमध्येही कमीअधिक फरकाने अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे कठोर निर्णय घेणे अत्यावश्यक झाले आहे. व्यंंकय्या नायडू यांनी सूतोवाच केले आहेच, तर हा मुद्दा रेटून धरून शेवटावर न्यावा, हीच अपेक्षा!