शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - स्वागतार्ह सूतोवाच

By admin | Updated: December 26, 2016 00:25 IST

यापुढील काळात मोटार विकत घेण्यापूर्वी, ती नांगरून (पार्किंग) ठेवण्यासाठी पुरेशी जागा असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा विचार

यापुढील काळात मोटार विकत घेण्यापूर्वी, ती नांगरून (पार्किंग) ठेवण्यासाठी पुरेशी जागा असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे सूतोवाच, केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंंकय्या नायडू यांनी केले आहे. आपण स्वत: या संदर्भात अत्यंत आग्रही असून, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि राज्य सरकारांशी चर्चा सुरू आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. खरे तर हा निर्णय खूप आधीच व्हायला हवा होता. अगोदरच भारतातील बहुतांश शहरांमध्ये नियोजनाची बोंब आहे. अरुंद रस्ते-गल्ल्या, दुचाकी-तिचाकी-चारचाकी अशा नाना तऱ्हेच्या वाहनांची भरमसाठ गर्दी, वाहतुकीच्या नियमांना सर्रास ठेंगा दाखविण्याची नागरिकांची प्रवृत्ती, यामुळे देशातील सर्वच लहानमोठ्या शहरांमध्ये, काही तुरळक रस्त्यांचा अपवाद वगळता, वाहतुकीची पार ऐशीतैशी झाल्याचे चित्र सदासर्वकाळ बघावयास मिळते. त्यामध्ये भर पडते ती रस्त्याच्या कडेच्या जागेला किंवा पदपथांना आपली जहागीर समजून केलेल्या उभे केलेल्या वाहनांची! बहुमजली इमारतींमध्ये पाहुण्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय केलेली नसते. त्यामुळे अशा इमारतींसमोर पाहुण्यांच्या वाहनांनी रस्त्याचा बराच मोठा भाग व्यापून टाकल्याचे चित्र दिसते. ते कमी म्हणून की काय, अनेक इमारतींमध्ये रहिवाशांच्या वाहनांच्याच पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसते. असली तरी अनेकदा ती भयंकर अडचणीची असते. त्यामुळे अशा इमारतींमधील रहिवासीही अनेकदा त्यांची वाहने इमारतीसमोरील रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर उभी करून ठेवतात. त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्यामुळे मोठा मनस्ताप होतो. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होऊन, कधीकधी अग्निशमन दलाचे बंब किंवा रुग्णवाहिकांचाही खोळंबा होतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता नायडूंनी सूतोवाच केलेला निर्णय प्रत्यक्षात येणे अत्यंत गरजेचे आहे. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने २०१५ मध्येच सिमला महानगरपालिकेच्या क्षेत्रापुरता असा आदेश राज्य सरकारला दिला होता. या वर्षीच्या प्रारंभी नोएडा येथील स्थानिक प्रशासनानेही व्यापारी वाहनांसाठी असाच आदेश अंमलात आणला होता. नोएडात साडेचार लाखांपेक्षा जास्त व्यापारी व खासगी वाहने आहेत आणि त्यामध्ये दररोज सरासरी सुमारे पाचशे वाहनांची भर पडत असते. परिणामी तिथे वाहतूक कोंडीचा मोठाच प्रश्न निर्माण झाला असून, सार्वजनिक वाहनतळांवर कब्जा करणारे ‘पार्किंग माफिया’ जन्माला आले आहेत. राष्ट्रीय राजधानीला खेटून वसले असल्यामुळे नोएडात या प्रश्नाने गंभीर स्वरुप धारण केले असले तरी, इतर शहरांमध्येही कमीअधिक फरकाने अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे कठोर निर्णय घेणे अत्यावश्यक झाले आहे. व्यंंकय्या नायडू यांनी सूतोवाच केले आहेच, तर हा मुद्दा रेटून धरून शेवटावर न्यावा, हीच अपेक्षा!