शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

भाष्य - लावण्य धोक्यात!

By admin | Updated: February 24, 2017 00:34 IST

पृथ्वीच्या पाठीवरील सरोवरांपैकी एकूण २० सरोवरे अशनीपातामुळे निर्माण झाल्याचे मान्य करण्यात आले

पृथ्वीच्या पाठीवरील सरोवरांपैकी एकूण २० सरोवरे अशनीपातामुळे निर्माण झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कॅनडाच्या लॅब्राडोर क्षेत्रातील ‘न्यू क्युबेक’, आफ्रिकेतील घाना देशातील ‘बोसमट्वी’, अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना भागातील ‘बॅरिंजर’, महाराष्ट्रातील ‘लोणार’ इत्यादी सरोवरांचा प्रामुख्याने समावेश होतो. लोणार सरोवर त्यामध्येही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते अशनीपातामुळे निर्माण झालेले बेसॉल्ट खडकातील एकमेव विवर आहे. ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेचे ‘क्युरिओसिटी रोव्हर’ पाच वर्षांपूर्वी मंगळावर उतरले. त्या मोहिमेत ‘नासा’ने लोणार सरोवराचा ‘डाटा’ आणि दगडमातीचे नमुने वापरल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, जगाचे लक्ष लोणारकडे वेधल्या गेले. यापूर्वी लोणारचा संबंध चंद्रावरील विवरांशी लावल्या गेला होता. तो आता मंगळासोबतही जुळला. लोणार सरोवराच्या बाबतीत असे एखादे वैज्ञानिक सत्य समोर आले, की लोणारच्या संवर्धनासाठी शासनाकडून एखादी घोषणा होते. पुढे अंमलबजावणी मात्र थंड बस्त्यात पडते. पुढील आठवड्यात लोणार महोत्सव होऊ घातला आहे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा लोणार सरोवराची काळजी शासन स्तरावर व्यक्त केली जाईल. जगप्रसिद्ध ओळख असतानाही लोणार सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी होणारे प्रयत्न हे एखाद्या ग्रामपंचायत स्तरावरचेच असावे, हे दुर्दैव आहे. सरोवराच्या काठी तब्बल २७ मंदिरे आहेत. दहाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत निर्माण झालेला हा प्राचीन ठेवा सध्या उपेक्षित आहे. सरोवराभोवती घनदाट अरण्य असून, त्यामध्ये ७५ जातींचे पक्षी, तसेच अनेक औषधोपयोगी वनस्पतींचे अस्तित्व आहे. पाण्यावर तरंगणारे दगड, चुंबकीय दगड व परग्रहांवर आढळणारे स्फटिक तसेच सिलिका आॅक्साइडसारखे स्फटिक तिथे आढळतात. अशी सर्व महती असतानाही लोणारचे लावण्य धोक्यात आले आहे. या जागतिक दर्जाच्या ठेव्याचे जतन आणि संवर्धनासाठी सरोवरप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन एक विशेष कृती आराखडा २०१०मध्ये तयार झाला. तो मंजूरही झाला; मात्र नेहमीच्या अनास्थेची झालर मिळाल्याने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात व सरोवरातील पाणी स्वच्छ करण्यात ‘नीरी’सारखी संस्थाही अपयशी ठरली आहे. त्यामुळे लोणारचा ठेवा जपण्याची जबाबदारी केवळ महोत्सव साजरा करून पूर्ण होणार नाही, तर कळकळीचे प्रयत्न आवश्यक आहेत.