शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - लावण्य धोक्यात!

By admin | Updated: February 24, 2017 00:34 IST

पृथ्वीच्या पाठीवरील सरोवरांपैकी एकूण २० सरोवरे अशनीपातामुळे निर्माण झाल्याचे मान्य करण्यात आले

पृथ्वीच्या पाठीवरील सरोवरांपैकी एकूण २० सरोवरे अशनीपातामुळे निर्माण झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कॅनडाच्या लॅब्राडोर क्षेत्रातील ‘न्यू क्युबेक’, आफ्रिकेतील घाना देशातील ‘बोसमट्वी’, अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना भागातील ‘बॅरिंजर’, महाराष्ट्रातील ‘लोणार’ इत्यादी सरोवरांचा प्रामुख्याने समावेश होतो. लोणार सरोवर त्यामध्येही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते अशनीपातामुळे निर्माण झालेले बेसॉल्ट खडकातील एकमेव विवर आहे. ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेचे ‘क्युरिओसिटी रोव्हर’ पाच वर्षांपूर्वी मंगळावर उतरले. त्या मोहिमेत ‘नासा’ने लोणार सरोवराचा ‘डाटा’ आणि दगडमातीचे नमुने वापरल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, जगाचे लक्ष लोणारकडे वेधल्या गेले. यापूर्वी लोणारचा संबंध चंद्रावरील विवरांशी लावल्या गेला होता. तो आता मंगळासोबतही जुळला. लोणार सरोवराच्या बाबतीत असे एखादे वैज्ञानिक सत्य समोर आले, की लोणारच्या संवर्धनासाठी शासनाकडून एखादी घोषणा होते. पुढे अंमलबजावणी मात्र थंड बस्त्यात पडते. पुढील आठवड्यात लोणार महोत्सव होऊ घातला आहे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा लोणार सरोवराची काळजी शासन स्तरावर व्यक्त केली जाईल. जगप्रसिद्ध ओळख असतानाही लोणार सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी होणारे प्रयत्न हे एखाद्या ग्रामपंचायत स्तरावरचेच असावे, हे दुर्दैव आहे. सरोवराच्या काठी तब्बल २७ मंदिरे आहेत. दहाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत निर्माण झालेला हा प्राचीन ठेवा सध्या उपेक्षित आहे. सरोवराभोवती घनदाट अरण्य असून, त्यामध्ये ७५ जातींचे पक्षी, तसेच अनेक औषधोपयोगी वनस्पतींचे अस्तित्व आहे. पाण्यावर तरंगणारे दगड, चुंबकीय दगड व परग्रहांवर आढळणारे स्फटिक तसेच सिलिका आॅक्साइडसारखे स्फटिक तिथे आढळतात. अशी सर्व महती असतानाही लोणारचे लावण्य धोक्यात आले आहे. या जागतिक दर्जाच्या ठेव्याचे जतन आणि संवर्धनासाठी सरोवरप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन एक विशेष कृती आराखडा २०१०मध्ये तयार झाला. तो मंजूरही झाला; मात्र नेहमीच्या अनास्थेची झालर मिळाल्याने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात व सरोवरातील पाणी स्वच्छ करण्यात ‘नीरी’सारखी संस्थाही अपयशी ठरली आहे. त्यामुळे लोणारचा ठेवा जपण्याची जबाबदारी केवळ महोत्सव साजरा करून पूर्ण होणार नाही, तर कळकळीचे प्रयत्न आवश्यक आहेत.