शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

भाष्य - प्रदूषणाचा धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 00:36 IST

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात राज्यातील १७ शहरांतील हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’ या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे. सतरा शहरांमध्ये मुंबईसह नवी मुंबईचा समावेश आहे. या मेगासिटीमधील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि प्रदूषणाचे हे प्रमाण वाढत असताना आपण ज्या नवी मुंबईला ‘स्मार्ट सिटी’ करणार आहोत; तेथेही प्रदूषण वाढतच राहिले तर पुढील पिढ्या मागील पिढ्यांना दोष देण्याशिवाय काहीच करू शकणार नाही. कारण तोवर वाढत्या प्रदूषणासह ओझोनचा थर घटलेला असेल आणि सुरू झालेल्या पृथ्वीच्या अस्ताच्या क्लायमॅक्सने संपूर्ण मानवजातीला गिळंकृत केलेले असेल. केंद्राच्या सर्वेक्षणानुसार, देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे. मुंबईसह नागपूर, नवी मुंबई, उल्हासनगर, बदलापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव या राज्यातील १७ शहरातील हवा आरोग्यासाठी हानिकारक आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत मोटारींमुळे शहरात दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत आहेत. त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. याचे कारण म्हणजे संबंधित ठिकाणांवरील वाढती लोकसंख्या, बांधकाम प्रकल्प, कारखाने आणि उर्वरित घटक होय. महाराष्ट्रानंतर प्रदूषणात उत्तर प्रदेशचा नंबर आहे. उत्तर प्रदेशातील पंधरा शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. पंजाबमधील आठ, हिमाचल प्रदेशामधील सात शहरांचा समावेश आहे. गुजरातमधील सूरत, तामिळनाडूमधील तुतीकोरीन, कर्नाटकातील चार आणि आंध्र प्रदेशातील पाच शहरे प्रदूषित असल्याचे सर्वेक्षणात नमूद आहे. आता आपण विकासाच्या अथवा ‘स्मार्ट’ सिटीच्या किती गप्पा मारत असलो तरी ज्या सोलापूरसह नवी मुंबईला आपण ‘स्मार्ट’’ सिटी करणार आहोत; तेच सोलापूर आणि नवी मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. केवळ सोलापूर नाही तर मुंबईनजीकच्या नवी मुंंबई, बदलापूर, उल्हासनगरची हीच परिस्थिती आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहे तो मानवाचा हव्यास. जोवर हा हव्यास कमी होत नाही तोवर प्रदूषण वाढतच जाणार आहे. त्यामुळे सुरू झालेला हा पृथ्वीच्या अस्ताचा क्लायमॅक्स मानवजातीला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती मानायलाच हवी.