शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - प्रदूषणाचा धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 00:36 IST

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात राज्यातील १७ शहरांतील हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’ या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे. सतरा शहरांमध्ये मुंबईसह नवी मुंबईचा समावेश आहे. या मेगासिटीमधील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि प्रदूषणाचे हे प्रमाण वाढत असताना आपण ज्या नवी मुंबईला ‘स्मार्ट सिटी’ करणार आहोत; तेथेही प्रदूषण वाढतच राहिले तर पुढील पिढ्या मागील पिढ्यांना दोष देण्याशिवाय काहीच करू शकणार नाही. कारण तोवर वाढत्या प्रदूषणासह ओझोनचा थर घटलेला असेल आणि सुरू झालेल्या पृथ्वीच्या अस्ताच्या क्लायमॅक्सने संपूर्ण मानवजातीला गिळंकृत केलेले असेल. केंद्राच्या सर्वेक्षणानुसार, देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे. मुंबईसह नागपूर, नवी मुंबई, उल्हासनगर, बदलापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव या राज्यातील १७ शहरातील हवा आरोग्यासाठी हानिकारक आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत मोटारींमुळे शहरात दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत आहेत. त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. याचे कारण म्हणजे संबंधित ठिकाणांवरील वाढती लोकसंख्या, बांधकाम प्रकल्प, कारखाने आणि उर्वरित घटक होय. महाराष्ट्रानंतर प्रदूषणात उत्तर प्रदेशचा नंबर आहे. उत्तर प्रदेशातील पंधरा शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. पंजाबमधील आठ, हिमाचल प्रदेशामधील सात शहरांचा समावेश आहे. गुजरातमधील सूरत, तामिळनाडूमधील तुतीकोरीन, कर्नाटकातील चार आणि आंध्र प्रदेशातील पाच शहरे प्रदूषित असल्याचे सर्वेक्षणात नमूद आहे. आता आपण विकासाच्या अथवा ‘स्मार्ट’ सिटीच्या किती गप्पा मारत असलो तरी ज्या सोलापूरसह नवी मुंबईला आपण ‘स्मार्ट’’ सिटी करणार आहोत; तेच सोलापूर आणि नवी मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. केवळ सोलापूर नाही तर मुंबईनजीकच्या नवी मुंंबई, बदलापूर, उल्हासनगरची हीच परिस्थिती आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहे तो मानवाचा हव्यास. जोवर हा हव्यास कमी होत नाही तोवर प्रदूषण वाढतच जाणार आहे. त्यामुळे सुरू झालेला हा पृथ्वीच्या अस्ताचा क्लायमॅक्स मानवजातीला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती मानायलाच हवी.