शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - प्रदूषणाचा धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 00:36 IST

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात राज्यातील १७ शहरांतील हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’ या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे. सतरा शहरांमध्ये मुंबईसह नवी मुंबईचा समावेश आहे. या मेगासिटीमधील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि प्रदूषणाचे हे प्रमाण वाढत असताना आपण ज्या नवी मुंबईला ‘स्मार्ट सिटी’ करणार आहोत; तेथेही प्रदूषण वाढतच राहिले तर पुढील पिढ्या मागील पिढ्यांना दोष देण्याशिवाय काहीच करू शकणार नाही. कारण तोवर वाढत्या प्रदूषणासह ओझोनचा थर घटलेला असेल आणि सुरू झालेल्या पृथ्वीच्या अस्ताच्या क्लायमॅक्सने संपूर्ण मानवजातीला गिळंकृत केलेले असेल. केंद्राच्या सर्वेक्षणानुसार, देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे. मुंबईसह नागपूर, नवी मुंबई, उल्हासनगर, बदलापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव या राज्यातील १७ शहरातील हवा आरोग्यासाठी हानिकारक आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत मोटारींमुळे शहरात दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत आहेत. त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. याचे कारण म्हणजे संबंधित ठिकाणांवरील वाढती लोकसंख्या, बांधकाम प्रकल्प, कारखाने आणि उर्वरित घटक होय. महाराष्ट्रानंतर प्रदूषणात उत्तर प्रदेशचा नंबर आहे. उत्तर प्रदेशातील पंधरा शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. पंजाबमधील आठ, हिमाचल प्रदेशामधील सात शहरांचा समावेश आहे. गुजरातमधील सूरत, तामिळनाडूमधील तुतीकोरीन, कर्नाटकातील चार आणि आंध्र प्रदेशातील पाच शहरे प्रदूषित असल्याचे सर्वेक्षणात नमूद आहे. आता आपण विकासाच्या अथवा ‘स्मार्ट’ सिटीच्या किती गप्पा मारत असलो तरी ज्या सोलापूरसह नवी मुंबईला आपण ‘स्मार्ट’’ सिटी करणार आहोत; तेच सोलापूर आणि नवी मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. केवळ सोलापूर नाही तर मुंबईनजीकच्या नवी मुंंबई, बदलापूर, उल्हासनगरची हीच परिस्थिती आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहे तो मानवाचा हव्यास. जोवर हा हव्यास कमी होत नाही तोवर प्रदूषण वाढतच जाणार आहे. त्यामुळे सुरू झालेला हा पृथ्वीच्या अस्ताचा क्लायमॅक्स मानवजातीला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती मानायलाच हवी.