शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

भाष्य - केवळ पोकळ!

By admin | Updated: July 8, 2017 00:11 IST

भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे भिडतात तिथे भारतीय व चिनी सैन्य अमोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेली

भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे भिडतात तिथे भारतीय व चिनी सैन्य अमोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेली स्थिती अधिकाधिक चिघळत असल्याचे चित्र उभे झाले आहे. चीन सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वर्तमानपत्राची मजल तर चक्क भारताला धमकावण्यापर्यंत गेली आहे. भारताने चुपचाप आपले सैन्य मागे घ्यावे; अन्यथा युद्धासाठी सज्ज व्हावे, असा इशारा ‘ग्लोबल टाइम्स’ने दिला आहे. भारतीय सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याने आणि वरून भारतीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आताचा भारत १९६२ मधील भारत नव्हे, या शब्दात चीनला खिजविल्याने चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. चीनच्या एकपक्षीय राजवटीने जनतेवर दडपशाही करून नेत्रदीपक आर्थिक प्रगती साधली आहे. प्रचंड भौगोलिक विस्तार, सर्वाधिक लोकसंख्या आणि जोडीला लाभलेली आर्थिक ताकद या बळावर आपण जे म्हणू ते इतरांना मान्य करायला लावण्याची खोड चिनी राज्यकर्त्यांना जडली आहे. क्रांती यशस्वी होताबरोबर तिबेट गिळंकृत केलेल्या चिनी राज्यकर्त्यांची नजर आता नेपाळ, भूतान आदी छोट्या शेजारी देशांवर खिळली आहे. पाकिस्तानने तर जणू चीनचे मांडलिकत्वच पत्करले आहे. भारतानेही आपल्यासमोर तसेच झुकावे ही चिनी राज्यकर्त्यांची मनीषा आहे. चीनची लष्करी ताकद भारताच्या तुलनेत बरीच जास्त असली तरी हिमालयात भारतीय सैन्य चिनी सैन्याला भारी पडू शकते. यापूर्वी १९६७ आणि १९८७ मध्ये ते सिद्धही झाले आहे. लष्करासह निमलष्करी दलांची संख्या विचारात घेतल्यास भारतीय सैन्य चिनी सैन्याच्या तोडीस तोड ठरू शकते. शिवाय हिंद महासागरात भारतीय नौदल पारंपारिकरीत्या वरचढ आहे. अंदमान-निकोबार बेट समूहांवर भारतीय नौदलाचा तळ असल्यामुळे, युद्धाच्या स्थितीत मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होणारे चिनी जहाजांचे आवागमन थांबवून भारत चीनचा इंधन पुरवठा व व्यापार रोखू शकतो. हा धोका ओळखल्यामुळेच तर चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग (सीपीईसी) प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची चीनला घाई झाली आहे. यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की अमेरिकेपेक्षा मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चीनला भारतासारखी प्रचंड मोठी बाजारपेठ गमावणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे चीनला भारतासोबत युद्ध परवडू शकत नाही. असे युद्ध झालेच तर त्यामध्ये चीन विजेता ठरणार नाही. लाभ होईल तो अमेरिकेचा! त्यामुळे चीनतर्फे दिल्या जात असलेल्या युद्धाच्या धमक्या पोकळच आहेत, यात शंका नाही.