शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - केवळ पोकळ!

By admin | Updated: July 8, 2017 00:11 IST

भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे भिडतात तिथे भारतीय व चिनी सैन्य अमोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेली

भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे भिडतात तिथे भारतीय व चिनी सैन्य अमोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेली स्थिती अधिकाधिक चिघळत असल्याचे चित्र उभे झाले आहे. चीन सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वर्तमानपत्राची मजल तर चक्क भारताला धमकावण्यापर्यंत गेली आहे. भारताने चुपचाप आपले सैन्य मागे घ्यावे; अन्यथा युद्धासाठी सज्ज व्हावे, असा इशारा ‘ग्लोबल टाइम्स’ने दिला आहे. भारतीय सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याने आणि वरून भारतीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आताचा भारत १९६२ मधील भारत नव्हे, या शब्दात चीनला खिजविल्याने चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. चीनच्या एकपक्षीय राजवटीने जनतेवर दडपशाही करून नेत्रदीपक आर्थिक प्रगती साधली आहे. प्रचंड भौगोलिक विस्तार, सर्वाधिक लोकसंख्या आणि जोडीला लाभलेली आर्थिक ताकद या बळावर आपण जे म्हणू ते इतरांना मान्य करायला लावण्याची खोड चिनी राज्यकर्त्यांना जडली आहे. क्रांती यशस्वी होताबरोबर तिबेट गिळंकृत केलेल्या चिनी राज्यकर्त्यांची नजर आता नेपाळ, भूतान आदी छोट्या शेजारी देशांवर खिळली आहे. पाकिस्तानने तर जणू चीनचे मांडलिकत्वच पत्करले आहे. भारतानेही आपल्यासमोर तसेच झुकावे ही चिनी राज्यकर्त्यांची मनीषा आहे. चीनची लष्करी ताकद भारताच्या तुलनेत बरीच जास्त असली तरी हिमालयात भारतीय सैन्य चिनी सैन्याला भारी पडू शकते. यापूर्वी १९६७ आणि १९८७ मध्ये ते सिद्धही झाले आहे. लष्करासह निमलष्करी दलांची संख्या विचारात घेतल्यास भारतीय सैन्य चिनी सैन्याच्या तोडीस तोड ठरू शकते. शिवाय हिंद महासागरात भारतीय नौदल पारंपारिकरीत्या वरचढ आहे. अंदमान-निकोबार बेट समूहांवर भारतीय नौदलाचा तळ असल्यामुळे, युद्धाच्या स्थितीत मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होणारे चिनी जहाजांचे आवागमन थांबवून भारत चीनचा इंधन पुरवठा व व्यापार रोखू शकतो. हा धोका ओळखल्यामुळेच तर चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग (सीपीईसी) प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची चीनला घाई झाली आहे. यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की अमेरिकेपेक्षा मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चीनला भारतासारखी प्रचंड मोठी बाजारपेठ गमावणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे चीनला भारतासोबत युद्ध परवडू शकत नाही. असे युद्ध झालेच तर त्यामध्ये चीन विजेता ठरणार नाही. लाभ होईल तो अमेरिकेचा! त्यामुळे चीनतर्फे दिल्या जात असलेल्या युद्धाच्या धमक्या पोकळच आहेत, यात शंका नाही.