शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

भाष्य - केवळ पोकळ!

By admin | Updated: July 8, 2017 00:11 IST

भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे भिडतात तिथे भारतीय व चिनी सैन्य अमोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेली

भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे भिडतात तिथे भारतीय व चिनी सैन्य अमोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेली स्थिती अधिकाधिक चिघळत असल्याचे चित्र उभे झाले आहे. चीन सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वर्तमानपत्राची मजल तर चक्क भारताला धमकावण्यापर्यंत गेली आहे. भारताने चुपचाप आपले सैन्य मागे घ्यावे; अन्यथा युद्धासाठी सज्ज व्हावे, असा इशारा ‘ग्लोबल टाइम्स’ने दिला आहे. भारतीय सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याने आणि वरून भारतीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आताचा भारत १९६२ मधील भारत नव्हे, या शब्दात चीनला खिजविल्याने चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. चीनच्या एकपक्षीय राजवटीने जनतेवर दडपशाही करून नेत्रदीपक आर्थिक प्रगती साधली आहे. प्रचंड भौगोलिक विस्तार, सर्वाधिक लोकसंख्या आणि जोडीला लाभलेली आर्थिक ताकद या बळावर आपण जे म्हणू ते इतरांना मान्य करायला लावण्याची खोड चिनी राज्यकर्त्यांना जडली आहे. क्रांती यशस्वी होताबरोबर तिबेट गिळंकृत केलेल्या चिनी राज्यकर्त्यांची नजर आता नेपाळ, भूतान आदी छोट्या शेजारी देशांवर खिळली आहे. पाकिस्तानने तर जणू चीनचे मांडलिकत्वच पत्करले आहे. भारतानेही आपल्यासमोर तसेच झुकावे ही चिनी राज्यकर्त्यांची मनीषा आहे. चीनची लष्करी ताकद भारताच्या तुलनेत बरीच जास्त असली तरी हिमालयात भारतीय सैन्य चिनी सैन्याला भारी पडू शकते. यापूर्वी १९६७ आणि १९८७ मध्ये ते सिद्धही झाले आहे. लष्करासह निमलष्करी दलांची संख्या विचारात घेतल्यास भारतीय सैन्य चिनी सैन्याच्या तोडीस तोड ठरू शकते. शिवाय हिंद महासागरात भारतीय नौदल पारंपारिकरीत्या वरचढ आहे. अंदमान-निकोबार बेट समूहांवर भारतीय नौदलाचा तळ असल्यामुळे, युद्धाच्या स्थितीत मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होणारे चिनी जहाजांचे आवागमन थांबवून भारत चीनचा इंधन पुरवठा व व्यापार रोखू शकतो. हा धोका ओळखल्यामुळेच तर चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग (सीपीईसी) प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची चीनला घाई झाली आहे. यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की अमेरिकेपेक्षा मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चीनला भारतासारखी प्रचंड मोठी बाजारपेठ गमावणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे चीनला भारतासोबत युद्ध परवडू शकत नाही. असे युद्ध झालेच तर त्यामध्ये चीन विजेता ठरणार नाही. लाभ होईल तो अमेरिकेचा! त्यामुळे चीनतर्फे दिल्या जात असलेल्या युद्धाच्या धमक्या पोकळच आहेत, यात शंका नाही.