शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

भाष्य - केवळ पोकळ!

By admin | Updated: July 8, 2017 00:11 IST

भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे भिडतात तिथे भारतीय व चिनी सैन्य अमोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेली

भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे भिडतात तिथे भारतीय व चिनी सैन्य अमोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेली स्थिती अधिकाधिक चिघळत असल्याचे चित्र उभे झाले आहे. चीन सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वर्तमानपत्राची मजल तर चक्क भारताला धमकावण्यापर्यंत गेली आहे. भारताने चुपचाप आपले सैन्य मागे घ्यावे; अन्यथा युद्धासाठी सज्ज व्हावे, असा इशारा ‘ग्लोबल टाइम्स’ने दिला आहे. भारतीय सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याने आणि वरून भारतीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आताचा भारत १९६२ मधील भारत नव्हे, या शब्दात चीनला खिजविल्याने चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. चीनच्या एकपक्षीय राजवटीने जनतेवर दडपशाही करून नेत्रदीपक आर्थिक प्रगती साधली आहे. प्रचंड भौगोलिक विस्तार, सर्वाधिक लोकसंख्या आणि जोडीला लाभलेली आर्थिक ताकद या बळावर आपण जे म्हणू ते इतरांना मान्य करायला लावण्याची खोड चिनी राज्यकर्त्यांना जडली आहे. क्रांती यशस्वी होताबरोबर तिबेट गिळंकृत केलेल्या चिनी राज्यकर्त्यांची नजर आता नेपाळ, भूतान आदी छोट्या शेजारी देशांवर खिळली आहे. पाकिस्तानने तर जणू चीनचे मांडलिकत्वच पत्करले आहे. भारतानेही आपल्यासमोर तसेच झुकावे ही चिनी राज्यकर्त्यांची मनीषा आहे. चीनची लष्करी ताकद भारताच्या तुलनेत बरीच जास्त असली तरी हिमालयात भारतीय सैन्य चिनी सैन्याला भारी पडू शकते. यापूर्वी १९६७ आणि १९८७ मध्ये ते सिद्धही झाले आहे. लष्करासह निमलष्करी दलांची संख्या विचारात घेतल्यास भारतीय सैन्य चिनी सैन्याच्या तोडीस तोड ठरू शकते. शिवाय हिंद महासागरात भारतीय नौदल पारंपारिकरीत्या वरचढ आहे. अंदमान-निकोबार बेट समूहांवर भारतीय नौदलाचा तळ असल्यामुळे, युद्धाच्या स्थितीत मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होणारे चिनी जहाजांचे आवागमन थांबवून भारत चीनचा इंधन पुरवठा व व्यापार रोखू शकतो. हा धोका ओळखल्यामुळेच तर चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग (सीपीईसी) प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची चीनला घाई झाली आहे. यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की अमेरिकेपेक्षा मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चीनला भारतासारखी प्रचंड मोठी बाजारपेठ गमावणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे चीनला भारतासोबत युद्ध परवडू शकत नाही. असे युद्ध झालेच तर त्यामध्ये चीन विजेता ठरणार नाही. लाभ होईल तो अमेरिकेचा! त्यामुळे चीनतर्फे दिल्या जात असलेल्या युद्धाच्या धमक्या पोकळच आहेत, यात शंका नाही.