शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

भाष्य - विस्तवाशी खेळ!

By admin | Updated: July 7, 2017 00:41 IST

फडणवीस सरकारने राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना केल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल (पाशा पटेल) यांची अध्यक्षपदी

फडणवीस सरकारने राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना केल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल (पाशा पटेल) यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. शेतकरी संघटनेत फूट पडल्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात पाशा पटेल भाजपात आले होते. भाजपातील शेतकरी प्रतिनिधी म्हणून ते ओळखले जातात. लढाऊ कार्यकर्ते म्हणून त्यांची राज्याला ओळख आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाची कार्यकक्षा रुंदावत हमीभावाबद्दल शिफारशी करणे, शेतमालाच्या भावातील चढउतारांचा अभ्यास करत बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी सरकारला सल्ला देण्याचेही अधिकार दिले आहेत. शेतमालाचे भाव ठरविण्याची पद्धत चुकीची असून त्यामुळे प्रत्यक्ष देवालाही शेती करणे परवडणारे नाही, अशी भूमिका काँग्रेस सरकारच्या काळात पाशा पटेल यांनी घेतली होती. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के भावासाठी त्यांनी २०१३ मध्ये मराठवाड्यात पायी शेतकरी दिंडी काढली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी हमीभावाच्या ५० टक्के अधिक शेतमालाला किंमत देऊ, असे आश्वासन दिले होते. दुष्काळ, नापिकी, अपेक्षित भावाअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला भरभरून मते दिली. मात्र त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शेतमालाला यंदा हमीभावापेक्षा ५० टक्के अधिक सोडाच उत्पादन खर्चाएवढेही भाव मिळाले नाहीत. त्यातच नोटाबंदीनंतर अडचणीत आलेल्या कृषीक्षेत्राला दिलासा देण्यासाठी देशात एकामागून एक राज्य कर्जमाफी देत आहे. स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी राज्यातील शेतकरीही आग्रही आहे. अशा विचित्र परिस्थितीत पाशा पटेल यांची नियुक्ती झाली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या इतर समर्थकांप्रमाणे पाशा पटेल हे सुद्धा काहीसे अडगळीत गेल्याची चर्चा होती. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाजप प्रेमावर टीका करताना खा. राजू शेट्टी यांनी तर थेट तुमचा पाशा पटेल होईल, अशी जाहीर टीका केली होती. त्यामुळे पटेल यांची राजकीय सोय करण्याबरोबरच शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असतानाही एकीकडे जाहीर केलेला हमीभाव मिळत नसल्याने पाशा पटेल यांच्यावर शेतकऱ्यांना न्याय देण्याची मोठी जबाबदारी आहे. अर्थात त्यांनी सुचविलेले मूल्य शेतकऱ्याला मिळेल का, याबाबत शंकाच आहे. कृषी मूल्य आयोग केवळ कागदावरच राहणार नाही, याची त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांची ही नवी भूमिका म्हणजे विस्तवाशी खेळण्याचाच प्रकार आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!