शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

भाष्य - बिथरलेला सलाहुद्दिन

By admin | Updated: July 6, 2017 01:09 IST

अमेरिकेने जागतिक दहशतवादी जाहीर केल्यामुळे हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दिन प्रचंड बिथरला आहे

अमेरिकेने जागतिक दहशतवादी जाहीर केल्यामुळे हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दिन प्रचंड बिथरला आहे. एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने भारताविरुद्ध जी आग ओकली त्यावरून त्याचा झालेला थयथयाट लक्षात येतो. भारतातील हल्ल्यांबाबत त्याने दिलेल्या कबुलीने नेहमी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेणारा पाकिस्तान पुन्हा एकदा ‘नापाक’ ठरला आहे. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानच्या भूमीचा सर्रास वापर केला जातो हे सुद्धा त्याच्या बरगळण्यावरून सिद्ध झाले आहे. भारतीय सुरक्षा दल हे हिजबुल मुजाहिदीनचे लक्ष्य असून त्या देशात आम्ही केव्हाही आणि कुठेही हल्ला करुन शकतो, अशी वल्गना या दहशतवादी म्होरक्याने केली आहे. काश्मीरला स्वत:चे घर सांगताना भारतात आपले असंख्य समर्थक असल्याचा त्याचा दावा आहे. खरे तर सलाहुद्दिन हा दहशतवादी असल्याचे भारताने यापूर्वीच सांगितले होते. परंतु नेहमीप्रमाणे पाकने ते फेटाळून लावले. एवढेच नाहीतर त्याला दहशतवादी जाहीर करणे हा अन्याय असल्याचेही शेजारील देशाचे म्हणणे आहे. सध्या पाकव्याप्त काश्मिरात दडून बसलेला हिजबूलचा हा म्होरक्या हिजबूलसोबतच युनायटेड जिहाद कौन्सिल ही संघटनाही चालवितो. याच कौन्सिलने पठाणकोट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, हे उल्लेखनीय. सलाहुद्दिन हा पाकिस्तानातील आपल्या ठिकाणावरुन जम्मू-काश्मिरात दहशतवादी कारवाया घडवित असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिली आहे. त्याची पुष्टी खुद्द सलाहुद्दिननेच केल्याने पाकिस्तान तोंडाच्या भारावर आपटला असून त्याने सलाहुद्दिनला इतरत्र हलविण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे आता संपूर्ण जगाला माहिती झाले आहे. दाऊद असो, हाफिज सईद वा सलाहुद्दिन पाकने नेहमीच या दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्याची परिणती म्हणजे आज इतर देशांसोबतच पाकलाही दहशतवादाची झळ बसू लागली आहे. ज्या दहशतवाद्यांना पाकने एवढे वर्ष पोसले तेच आता त्याच्यावर उलटले आहेत; हे अलीकडच्या काळात त्या देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतून दिसून येते. तेव्हा आतातरी पाक सरकारने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबविले पाहिजे. परंतु कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे असे म्हणतात त्याप्रमाणे पाकचीही यातून धडा घेण्याची मानसिकता दिसत नाही. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाशिवाय आपल्या देशात आणि जगातही शांतता नांदणार नाही, हे पाकला केव्हा कळणार?