शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

भाष्य - बिथरलेला सलाहुद्दिन

By admin | Updated: July 6, 2017 01:09 IST

अमेरिकेने जागतिक दहशतवादी जाहीर केल्यामुळे हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दिन प्रचंड बिथरला आहे

अमेरिकेने जागतिक दहशतवादी जाहीर केल्यामुळे हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दिन प्रचंड बिथरला आहे. एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने भारताविरुद्ध जी आग ओकली त्यावरून त्याचा झालेला थयथयाट लक्षात येतो. भारतातील हल्ल्यांबाबत त्याने दिलेल्या कबुलीने नेहमी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेणारा पाकिस्तान पुन्हा एकदा ‘नापाक’ ठरला आहे. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानच्या भूमीचा सर्रास वापर केला जातो हे सुद्धा त्याच्या बरगळण्यावरून सिद्ध झाले आहे. भारतीय सुरक्षा दल हे हिजबुल मुजाहिदीनचे लक्ष्य असून त्या देशात आम्ही केव्हाही आणि कुठेही हल्ला करुन शकतो, अशी वल्गना या दहशतवादी म्होरक्याने केली आहे. काश्मीरला स्वत:चे घर सांगताना भारतात आपले असंख्य समर्थक असल्याचा त्याचा दावा आहे. खरे तर सलाहुद्दिन हा दहशतवादी असल्याचे भारताने यापूर्वीच सांगितले होते. परंतु नेहमीप्रमाणे पाकने ते फेटाळून लावले. एवढेच नाहीतर त्याला दहशतवादी जाहीर करणे हा अन्याय असल्याचेही शेजारील देशाचे म्हणणे आहे. सध्या पाकव्याप्त काश्मिरात दडून बसलेला हिजबूलचा हा म्होरक्या हिजबूलसोबतच युनायटेड जिहाद कौन्सिल ही संघटनाही चालवितो. याच कौन्सिलने पठाणकोट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, हे उल्लेखनीय. सलाहुद्दिन हा पाकिस्तानातील आपल्या ठिकाणावरुन जम्मू-काश्मिरात दहशतवादी कारवाया घडवित असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिली आहे. त्याची पुष्टी खुद्द सलाहुद्दिननेच केल्याने पाकिस्तान तोंडाच्या भारावर आपटला असून त्याने सलाहुद्दिनला इतरत्र हलविण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे आता संपूर्ण जगाला माहिती झाले आहे. दाऊद असो, हाफिज सईद वा सलाहुद्दिन पाकने नेहमीच या दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्याची परिणती म्हणजे आज इतर देशांसोबतच पाकलाही दहशतवादाची झळ बसू लागली आहे. ज्या दहशतवाद्यांना पाकने एवढे वर्ष पोसले तेच आता त्याच्यावर उलटले आहेत; हे अलीकडच्या काळात त्या देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतून दिसून येते. तेव्हा आतातरी पाक सरकारने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबविले पाहिजे. परंतु कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे असे म्हणतात त्याप्रमाणे पाकचीही यातून धडा घेण्याची मानसिकता दिसत नाही. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाशिवाय आपल्या देशात आणि जगातही शांतता नांदणार नाही, हे पाकला केव्हा कळणार?