शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

भाष्य - बिथरलेला सलाहुद्दिन

By admin | Updated: July 6, 2017 01:09 IST

अमेरिकेने जागतिक दहशतवादी जाहीर केल्यामुळे हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दिन प्रचंड बिथरला आहे

अमेरिकेने जागतिक दहशतवादी जाहीर केल्यामुळे हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दिन प्रचंड बिथरला आहे. एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने भारताविरुद्ध जी आग ओकली त्यावरून त्याचा झालेला थयथयाट लक्षात येतो. भारतातील हल्ल्यांबाबत त्याने दिलेल्या कबुलीने नेहमी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेणारा पाकिस्तान पुन्हा एकदा ‘नापाक’ ठरला आहे. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानच्या भूमीचा सर्रास वापर केला जातो हे सुद्धा त्याच्या बरगळण्यावरून सिद्ध झाले आहे. भारतीय सुरक्षा दल हे हिजबुल मुजाहिदीनचे लक्ष्य असून त्या देशात आम्ही केव्हाही आणि कुठेही हल्ला करुन शकतो, अशी वल्गना या दहशतवादी म्होरक्याने केली आहे. काश्मीरला स्वत:चे घर सांगताना भारतात आपले असंख्य समर्थक असल्याचा त्याचा दावा आहे. खरे तर सलाहुद्दिन हा दहशतवादी असल्याचे भारताने यापूर्वीच सांगितले होते. परंतु नेहमीप्रमाणे पाकने ते फेटाळून लावले. एवढेच नाहीतर त्याला दहशतवादी जाहीर करणे हा अन्याय असल्याचेही शेजारील देशाचे म्हणणे आहे. सध्या पाकव्याप्त काश्मिरात दडून बसलेला हिजबूलचा हा म्होरक्या हिजबूलसोबतच युनायटेड जिहाद कौन्सिल ही संघटनाही चालवितो. याच कौन्सिलने पठाणकोट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, हे उल्लेखनीय. सलाहुद्दिन हा पाकिस्तानातील आपल्या ठिकाणावरुन जम्मू-काश्मिरात दहशतवादी कारवाया घडवित असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिली आहे. त्याची पुष्टी खुद्द सलाहुद्दिननेच केल्याने पाकिस्तान तोंडाच्या भारावर आपटला असून त्याने सलाहुद्दिनला इतरत्र हलविण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे आता संपूर्ण जगाला माहिती झाले आहे. दाऊद असो, हाफिज सईद वा सलाहुद्दिन पाकने नेहमीच या दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्याची परिणती म्हणजे आज इतर देशांसोबतच पाकलाही दहशतवादाची झळ बसू लागली आहे. ज्या दहशतवाद्यांना पाकने एवढे वर्ष पोसले तेच आता त्याच्यावर उलटले आहेत; हे अलीकडच्या काळात त्या देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतून दिसून येते. तेव्हा आतातरी पाक सरकारने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबविले पाहिजे. परंतु कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे असे म्हणतात त्याप्रमाणे पाकचीही यातून धडा घेण्याची मानसिकता दिसत नाही. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाशिवाय आपल्या देशात आणि जगातही शांतता नांदणार नाही, हे पाकला केव्हा कळणार?