शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अण्वस्रे हा उपाय नाही!

By admin | Updated: August 2, 2015 04:36 IST

आॅल्विन टॉफलर या लेखकाने आपल्या वॉर अ‍ॅॅॅॅॅॅॅन्ड वॉर या पुस्तकात भविष्यातील युद्धे ही ब्रूट वॉरऐवजी ब्रेन वॉर राहतील असे नमूद केले आहे. याचाच अर्थ पूर्वीसारखी क्रौर्याने भरलेली युद्धे संपून तेथे

- ले. कर्नल सुनील देशपांडे (निवृत्त)आॅल्विन टॉफलर या लेखकाने आपल्या वॉर अ‍ॅॅॅॅॅॅॅन्ड वॉर या पुस्तकात भविष्यातील युद्धे ही ब्रूट वॉरऐवजी ब्रेन वॉर राहतील असे नमूद केले आहे. याचाच अर्थ पूर्वीसारखी क्रौर्याने भरलेली युद्धे संपून तेथे वैचारिक लढाया व त्यातून होणारा हिंसाचार घडेल असा होतो. अणुयुद्ध हे या ब्रेन वॉर प्रकारात मोडते. मात्र अणुयुद्ध हा जागतिक शांततेवरचा तोडगा कधीच ठरू शकणार नाही. कारण त्यातून जे नुकसान होईल ते कुणा एका देशाचे वा प्रांताचे नसून अवघ्या मानवजातीचेच नुकसान असेल. म्हणून विचार कुठलेही राष्ट्र करणार नाही असे वाटते. अणुबॉम्बची निर्मिती ही प्रत्येक राष्ट्राला त्याचा वापर करण्यापेक्षा त्याचा धाक बसविण्यासाठी गरजेचेही वाटते. राष्ट्रांजवळ त्यांची अत्याधुनिक शस्त्रे व आयुधे असावीत. तसे होणे हे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचेही आहे. मात्र ती अण्वस्त्रे चुकीच्या हाती पडू नयेत याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा रशियाचे विकेंद्रीकरण झाले व त्याचे १७ देशात तुकडे झाले तेव्हा त्यातील काही प्रांतांकडे प्रगत अण्वस्त्रे होती. मात्र त्या अण्वस्त्रांचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा जवानांना पगार देण्याइतपतही आर्थिक बळ त्या देशांत उरले नव्हते.परिणामी ही अण्वस्त्रे त्या काळात चोरीला गेली व ती आजतायागत बेपत्ता आहेत. ती कुणाजवळ आहेत याचा कधीच छडा लागला नाही. ती जर अतिरेक्यांच्या हाती असतील तर त्याचा धोका सर्व जगालाच राहणार आहे. आधीच्या युद्धांमध्ये देशात ब्लॅकआऊट केला जात असे. शत्रूला गाव कोणते व जंगल कोणते हे ओळखता येऊ नये यासाठी ही शक्कल लढविली जात असे. मात्र आता तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, एखाद्या विशिष्ट जागी अणुबॉम्ब टाकायचा झाल्यास ती जागा नेमकी हेरून तेथे तो पडेल अशी व्यवस्था केली जाऊ शकते. त्यामुळे उद्या जर पाकिस्तानने भारतावर बॉम्ब टाकायचा ठरवला आणि तो मुंबईवर टाकला तर उध्वस्त मुंबई पुन्हा स्थापन व्हायला किमान १०० वर्षे जाऊ द्यावी लागतील. मात्र पाकिस्तानवर भारताने तो प्रयोग केला तर अवघे पाकिस्तानच बेचिराख होऊ शकते. त्यामुळे असा अविचार उभयपक्षी होणार नाही असे वाटते. अण्वस्त्रांच्या शक्तीसोबत भारतात आंतरिक शक्तींनाही मजबूत केले गेले पाहिजे. यात देशाचे लष्कर, अर्थकारण, औद्योगिक क्षेत्र व सामाजिक क्षेत्र यांचा समावेश होतो. देशाची मानसिकता ही जर सैनिकाची, एका लढवय्याची मानसिकता असेल तर कुठलाही देश वाकडी नजर करून आपल्याकडे पाहू शकणार नाही. जागतिक शांततेसाठी अण्वस्त्रे हा उपाय नाही मात्र ती खबरदारी निश्चितच आहे.