शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

अण्वस्रे हा उपाय नाही!

By admin | Updated: August 2, 2015 04:36 IST

आॅल्विन टॉफलर या लेखकाने आपल्या वॉर अ‍ॅॅॅॅॅॅॅन्ड वॉर या पुस्तकात भविष्यातील युद्धे ही ब्रूट वॉरऐवजी ब्रेन वॉर राहतील असे नमूद केले आहे. याचाच अर्थ पूर्वीसारखी क्रौर्याने भरलेली युद्धे संपून तेथे

- ले. कर्नल सुनील देशपांडे (निवृत्त)आॅल्विन टॉफलर या लेखकाने आपल्या वॉर अ‍ॅॅॅॅॅॅॅन्ड वॉर या पुस्तकात भविष्यातील युद्धे ही ब्रूट वॉरऐवजी ब्रेन वॉर राहतील असे नमूद केले आहे. याचाच अर्थ पूर्वीसारखी क्रौर्याने भरलेली युद्धे संपून तेथे वैचारिक लढाया व त्यातून होणारा हिंसाचार घडेल असा होतो. अणुयुद्ध हे या ब्रेन वॉर प्रकारात मोडते. मात्र अणुयुद्ध हा जागतिक शांततेवरचा तोडगा कधीच ठरू शकणार नाही. कारण त्यातून जे नुकसान होईल ते कुणा एका देशाचे वा प्रांताचे नसून अवघ्या मानवजातीचेच नुकसान असेल. म्हणून विचार कुठलेही राष्ट्र करणार नाही असे वाटते. अणुबॉम्बची निर्मिती ही प्रत्येक राष्ट्राला त्याचा वापर करण्यापेक्षा त्याचा धाक बसविण्यासाठी गरजेचेही वाटते. राष्ट्रांजवळ त्यांची अत्याधुनिक शस्त्रे व आयुधे असावीत. तसे होणे हे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचेही आहे. मात्र ती अण्वस्त्रे चुकीच्या हाती पडू नयेत याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा रशियाचे विकेंद्रीकरण झाले व त्याचे १७ देशात तुकडे झाले तेव्हा त्यातील काही प्रांतांकडे प्रगत अण्वस्त्रे होती. मात्र त्या अण्वस्त्रांचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा जवानांना पगार देण्याइतपतही आर्थिक बळ त्या देशांत उरले नव्हते.परिणामी ही अण्वस्त्रे त्या काळात चोरीला गेली व ती आजतायागत बेपत्ता आहेत. ती कुणाजवळ आहेत याचा कधीच छडा लागला नाही. ती जर अतिरेक्यांच्या हाती असतील तर त्याचा धोका सर्व जगालाच राहणार आहे. आधीच्या युद्धांमध्ये देशात ब्लॅकआऊट केला जात असे. शत्रूला गाव कोणते व जंगल कोणते हे ओळखता येऊ नये यासाठी ही शक्कल लढविली जात असे. मात्र आता तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, एखाद्या विशिष्ट जागी अणुबॉम्ब टाकायचा झाल्यास ती जागा नेमकी हेरून तेथे तो पडेल अशी व्यवस्था केली जाऊ शकते. त्यामुळे उद्या जर पाकिस्तानने भारतावर बॉम्ब टाकायचा ठरवला आणि तो मुंबईवर टाकला तर उध्वस्त मुंबई पुन्हा स्थापन व्हायला किमान १०० वर्षे जाऊ द्यावी लागतील. मात्र पाकिस्तानवर भारताने तो प्रयोग केला तर अवघे पाकिस्तानच बेचिराख होऊ शकते. त्यामुळे असा अविचार उभयपक्षी होणार नाही असे वाटते. अण्वस्त्रांच्या शक्तीसोबत भारतात आंतरिक शक्तींनाही मजबूत केले गेले पाहिजे. यात देशाचे लष्कर, अर्थकारण, औद्योगिक क्षेत्र व सामाजिक क्षेत्र यांचा समावेश होतो. देशाची मानसिकता ही जर सैनिकाची, एका लढवय्याची मानसिकता असेल तर कुठलाही देश वाकडी नजर करून आपल्याकडे पाहू शकणार नाही. जागतिक शांततेसाठी अण्वस्त्रे हा उपाय नाही मात्र ती खबरदारी निश्चितच आहे.