शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

अजातशत्रू भाऊसाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 05:52 IST

महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर शुक्रवारी पंचतत्त्वात विलीन झाले

महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर शुक्रवारी पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या निधनामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी व सहकार क्षेत्राची जाण असलेला नेता महाराष्ट्राने गमावला. त्याचबरोबर पश्चिम विदर्भानेही राज्यव्यापी ओळख व कर्तृत्व असलेला एकमेव नेता गमावला. भाऊसाहेब सच्चे भूमिपुत्र होते. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील नारखेड या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबातून सुरू झालेला भाऊसाहेबांचा जीवनप्रवास राज्याचे कृषिमंत्री म्हणून संपुष्टात आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९९८ व १९९९ मध्ये केंद्रात भारतीय जनता प़क्षाचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी दुर्दैवाने भाऊसाहेबांना अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला; अन्यथा ते कदाचित देशाचेही कृषिमंत्री झाले असते. भाऊसाहेबांच्या संपूर्ण जीवनप्रवासादरम्यान त्यांची जमिनीशी जुळलेली नाळ कधीही तुटली नाही. भाऊसाहेब कर्तबगारी व मेहनतीच्या बळावर मोठे होत गेले; पण ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत, आधी जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्ष मोठा करण्यासाठी अपार कष्ट केले, त्यांचा त्यांना कधीही विसर पडला नाही. छोट्यातील छोट्या गावातील लहान कार्यकर्त्याशीही नजरानजर झाली की भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावर ओळखीचे स्मित उम़टायचेच उमटायचे! त्या बळावर गावोगावी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फौज, हीच त्यांची खरी गंगाजळी होती. शुक्रवारी खामगाव येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो शोकाकूल कार्यकर्त्यांंनी केलेली गर्दी त्याची साक्ष देत होती. आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रासह केंद्रात आणि इतरही अनेक राज्यात सरकार आहे; पण मूठभर अभिजनांचा पक्ष ही त्या पक्षाची जुनी ओळख पुसून टाकून, पक्षाला बहुजन चेहरा देण्यासाठी, खेडोपाडी, वस्त्या, तांड्यांपर्यंत पक्ष पोहचविण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या मोजक्या नेत्यांमध्ये भाऊसाहेबांचा समावेश होतो. त्याचा मोबदला म्हणून त्यांनी पक्षाकडून कधीही बड्या पदांची अपेक्षा केली नाही; मात्र पक्षाने जी जबाबदारी दिली, ती इमानेइतबारे पार पाडली. संसद किंवा विधिमंडळात, तसेच इतर व्यासपीठांवरही विरोधकांवर तुटून पडणाºया भाऊसाहेबांचे सर्वपक्षीय नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या भाऊसाहेबांचे अचानक निघून जाणे हा त्यांच्या पक्षासाठी, तसेच पश्चिम विदर्भासाठीही मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी पश्चिम विदर्भात बराच काळ जाणवत राहील.