शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

अजातशत्रू भाऊसाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 05:52 IST

महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर शुक्रवारी पंचतत्त्वात विलीन झाले

महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर शुक्रवारी पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या निधनामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी व सहकार क्षेत्राची जाण असलेला नेता महाराष्ट्राने गमावला. त्याचबरोबर पश्चिम विदर्भानेही राज्यव्यापी ओळख व कर्तृत्व असलेला एकमेव नेता गमावला. भाऊसाहेब सच्चे भूमिपुत्र होते. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील नारखेड या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबातून सुरू झालेला भाऊसाहेबांचा जीवनप्रवास राज्याचे कृषिमंत्री म्हणून संपुष्टात आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९९८ व १९९९ मध्ये केंद्रात भारतीय जनता प़क्षाचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी दुर्दैवाने भाऊसाहेबांना अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला; अन्यथा ते कदाचित देशाचेही कृषिमंत्री झाले असते. भाऊसाहेबांच्या संपूर्ण जीवनप्रवासादरम्यान त्यांची जमिनीशी जुळलेली नाळ कधीही तुटली नाही. भाऊसाहेब कर्तबगारी व मेहनतीच्या बळावर मोठे होत गेले; पण ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत, आधी जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्ष मोठा करण्यासाठी अपार कष्ट केले, त्यांचा त्यांना कधीही विसर पडला नाही. छोट्यातील छोट्या गावातील लहान कार्यकर्त्याशीही नजरानजर झाली की भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावर ओळखीचे स्मित उम़टायचेच उमटायचे! त्या बळावर गावोगावी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फौज, हीच त्यांची खरी गंगाजळी होती. शुक्रवारी खामगाव येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो शोकाकूल कार्यकर्त्यांंनी केलेली गर्दी त्याची साक्ष देत होती. आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रासह केंद्रात आणि इतरही अनेक राज्यात सरकार आहे; पण मूठभर अभिजनांचा पक्ष ही त्या पक्षाची जुनी ओळख पुसून टाकून, पक्षाला बहुजन चेहरा देण्यासाठी, खेडोपाडी, वस्त्या, तांड्यांपर्यंत पक्ष पोहचविण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या मोजक्या नेत्यांमध्ये भाऊसाहेबांचा समावेश होतो. त्याचा मोबदला म्हणून त्यांनी पक्षाकडून कधीही बड्या पदांची अपेक्षा केली नाही; मात्र पक्षाने जी जबाबदारी दिली, ती इमानेइतबारे पार पाडली. संसद किंवा विधिमंडळात, तसेच इतर व्यासपीठांवरही विरोधकांवर तुटून पडणाºया भाऊसाहेबांचे सर्वपक्षीय नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या भाऊसाहेबांचे अचानक निघून जाणे हा त्यांच्या पक्षासाठी, तसेच पश्चिम विदर्भासाठीही मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी पश्चिम विदर्भात बराच काळ जाणवत राहील.