शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

अजातशत्रू भाऊसाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 05:52 IST

महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर शुक्रवारी पंचतत्त्वात विलीन झाले

महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर शुक्रवारी पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या निधनामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी व सहकार क्षेत्राची जाण असलेला नेता महाराष्ट्राने गमावला. त्याचबरोबर पश्चिम विदर्भानेही राज्यव्यापी ओळख व कर्तृत्व असलेला एकमेव नेता गमावला. भाऊसाहेब सच्चे भूमिपुत्र होते. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील नारखेड या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबातून सुरू झालेला भाऊसाहेबांचा जीवनप्रवास राज्याचे कृषिमंत्री म्हणून संपुष्टात आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९९८ व १९९९ मध्ये केंद्रात भारतीय जनता प़क्षाचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी दुर्दैवाने भाऊसाहेबांना अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला; अन्यथा ते कदाचित देशाचेही कृषिमंत्री झाले असते. भाऊसाहेबांच्या संपूर्ण जीवनप्रवासादरम्यान त्यांची जमिनीशी जुळलेली नाळ कधीही तुटली नाही. भाऊसाहेब कर्तबगारी व मेहनतीच्या बळावर मोठे होत गेले; पण ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत, आधी जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्ष मोठा करण्यासाठी अपार कष्ट केले, त्यांचा त्यांना कधीही विसर पडला नाही. छोट्यातील छोट्या गावातील लहान कार्यकर्त्याशीही नजरानजर झाली की भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावर ओळखीचे स्मित उम़टायचेच उमटायचे! त्या बळावर गावोगावी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फौज, हीच त्यांची खरी गंगाजळी होती. शुक्रवारी खामगाव येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो शोकाकूल कार्यकर्त्यांंनी केलेली गर्दी त्याची साक्ष देत होती. आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रासह केंद्रात आणि इतरही अनेक राज्यात सरकार आहे; पण मूठभर अभिजनांचा पक्ष ही त्या पक्षाची जुनी ओळख पुसून टाकून, पक्षाला बहुजन चेहरा देण्यासाठी, खेडोपाडी, वस्त्या, तांड्यांपर्यंत पक्ष पोहचविण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या मोजक्या नेत्यांमध्ये भाऊसाहेबांचा समावेश होतो. त्याचा मोबदला म्हणून त्यांनी पक्षाकडून कधीही बड्या पदांची अपेक्षा केली नाही; मात्र पक्षाने जी जबाबदारी दिली, ती इमानेइतबारे पार पाडली. संसद किंवा विधिमंडळात, तसेच इतर व्यासपीठांवरही विरोधकांवर तुटून पडणाºया भाऊसाहेबांचे सर्वपक्षीय नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या भाऊसाहेबांचे अचानक निघून जाणे हा त्यांच्या पक्षासाठी, तसेच पश्चिम विदर्भासाठीही मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी पश्चिम विदर्भात बराच काळ जाणवत राहील.