शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 05:44 IST

२०१४ ते २०१९ या काळात त्यांनी राज्याला एक सक्षम नेतृत्व दिले, पायाभूत सुविधांपासून सामान्य माणसांशी निगडित अनेक निर्णयांना त्यांनी गती दिली. 

मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस... शपथ घेतो की... आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी हा आवाज घुमेल. या आवाजाच्या मागे असेल तो गेल्या पाच वर्षांतील संघर्ष, त्याग आणि मेहनतही. ‘बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला आहे. वडील दिवंगत गंगाधरराव यांच्या कर्तव्यनिष्ठ आणि पारदर्शी राजकारणाचा वारसा चालवताना त्यांचे सर्वसमावेशक असे नेतृत्व घडत गेले. गेल्या काही वर्षांतील संघर्ष, त्याग आणि त्यातून झालेला संकोच हे सगळे सहन करत फडणवीस पुढे गेले. त्यांचा अभिमन्यू करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; पण ते चक्रव्यूहातून सहीसलामत बाहेर पडले. परिस्थितीने कठोर परीक्षा घेतली; पण अपार पक्षनिष्ठा, प्रचंड आत्मविश्वास आणि राजकीय डावपेचांमध्ये भल्याभल्यांना चीत करण्याची क्षमता या आधारे ते वाटचाल करीत राहिले. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी राज्याला एक सक्षम नेतृत्व दिले, पायाभूत सुविधांपासून सामान्य माणसांशी निगडित अनेक निर्णयांना त्यांनी गती दिली. 

‘जलयुक्त शिवार’ ही अभिनव योजना आणली. भाजपचा यावेळच्या दमदार, शानदार विजयाचे सिंचनही त्यांचेच. त्यांच्या कुशल नेतृत्वातच हा देदीप्यमान विजय मिळाला. भाजपला महायुतीमध्ये १३२ जागा मिळाल्या असताना त्यांच्याकडेच राज्याचे नेतृत्व जाणार हे स्पष्ट झाले होते. आमदारांसह सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांच्या मनातही मुख्यमंत्रिपदासाठी देवाभाऊंचेच नाव होते. ऐनवेळी भलतेच नाव समोर येईल, असा तर्क काहींनी दिला होता. त्यासाठी राजस्थान, मध्य प्रदेशची उदाहरणे दिली जात होती; पण जनभावनेचा आदर राखत भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वानेही असे धक्कातंत्र महाराष्ट्रात न वापरता फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिली.

  कार्यकर्त्यांच्या मनातील धाकधुकीची जागा आता आनंदाने घेतली आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र यांचे बोट धरून त्यांना मुख्यमंत्री केले, यावेळीही ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ हे सूत्र भाजपने स्वीकारले. निकालानंतर सत्तास्थापनेतील विलंबामुळे महायुतीमध्ये आणि विशेषत: भाजप-शिंदेसेनेत काहीसे रुसवेफुगवे असल्याचे चित्र समोर आले. मात्र, आता सत्ताकारणाचे आकाश पुरते मोकळे झाले आहे. फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी सर्वानुमते झालेली निवड, त्यानंतर राज्यपालांकडे महायुतीने सत्तास्थापनेचा केलेला दावा आणि राज्यपालांनी त्यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करण्याचे सोपस्कारही पूर्ण झाले असून, गुरुवारी फडणवीस हे हजारो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रभावित असलेला आणि त्यांच्या पदचिन्हांवर चालणारा हा नेता महाराष्ट्राची सूत्रे पाच वर्षांसाठी सांभाळणार आहे. राज्याशी संबंधित सामाजिक, आर्थिक, औद्योगिक विषयांचा फडणवीस यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्यातील दूरदृष्टीचा परिचय त्यांनी या आधीच अनेक प्रसंगांमध्ये दिलेला आहे. आता तर त्यांच्या गाठीशी गेल्या काही वर्षांमधील चढउतारांचे चांगले-वाईट अनुभवदेखील आहेत. आपल्यातील नेतृत्वगुणांचा लाभ ते महाराष्ट्राला नक्कीच मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे.

  एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे ‘जनतेचा मुख्यमंत्री’ अशी स्वत:ची प्रतिमा निश्चितच तयार केली. ‘मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन आहे’, असे ते म्हणत. लाडक्या बहिणीसह अनेक लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले आणि त्यांना लोकप्रियताही मिळाली. सर्वसामान्यांच्या हिताचे धडाकेबाज निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून जनसामान्यांचे प्रेमही त्यांना मिळाले. आता तेच प्रेम टिकविण्याचे आणि वृद्धिंगत करण्याचे आव्हान फडणवीस यांच्यासमोर असेल. आधी शिंदे-फडणवीस-अजित पवार असा क्रम होता, आता तो फडणवीस-शिंदे-अजित पवार असा असेल एवढाच काय तो फरक. अडीच वर्षांच्या काळात शिंदे यांनी आपल्या दोन सहकारी उपमुख्यमंत्र्यांचा योग्य सन्मान राखत कारभार केला; आता ती जबाबदारी फडणवीस यांची असेल. फडणवीस यांच्या रूपाने एक सुसंस्कृत नेतृत्व महाराष्ट्राला मिळत आहे. सुसंस्कृतपणा आणि संस्कृती या एकमेकांच्या हातात हात घालून चालणाऱ्या बाबी. राज्याच्या राजकीय संस्कृतीचा स्तर गेल्या काही वर्षांमध्ये फारच बिघडला आहे. पातळी सोडून होणारे आरोप, बडबोल्या नेत्यांची गर्दी, एकमेकांचे चारित्र्यहनन, किळसवाणी भाषा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला साजेशी नव्हतीच. एकूणच राजकीय गढूळपणा इतका वाढलेला असताना फडणवीस यांनी सुसंस्कृतपणाची तुरटी त्यात फिरवावी, त्यासाठी विरोधकांनाही विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस