शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
4
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
5
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
6
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
7
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
8
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
9
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
10
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
11
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
12
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
13
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
14
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
15
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
16
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
17
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
18
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
19
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
20
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स

पुरोगामी राज्यात अघोरीराज !

By admin | Updated: January 3, 2015 22:31 IST

सुखप्राप्तीसाठी मुलाने आपल्या आई आणि मावशीचा बळी देण्याच्या नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरातील धक्कादायक घटनेने साऱ्यांनाच सुन्न केले.

सुखप्राप्तीसाठी मुलाने आपल्या आई आणि मावशीचा बळी देण्याच्या नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरातील धक्कादायक घटनेने साऱ्यांनाच सुन्न केले. अंधश्रद्धेपासून दूर राहा, ही महाराष्ट्राच्या मातीतील संतांची शिकवण. मात्र भौतिक सुखापोटी अंधश्रद्धेतून बळी देण्याचा हा अघोरी प्रकार याच पुरोगामी परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रात घडावा, हे अघोरीराजच म्हणावे लागेल. या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा वेध...

 

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाला तब्बल ३०० वर्षांची परंपरा आहे. अनेक संतांनी, त्यानंतर महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व गेल्या २५ वर्षांत तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संघटितपणे यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही अंधश्रद्धा कमी न होता वाढतच चालली आहे. गेल्या वर्षभरात म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा झाल्यापासून महाराष्ट्रात सुमारे १२ प्रकार केवळ नरबळीचे झाले आहेत. याचा अर्थ हे प्रमाण दर महिन्याला एक असे आहे व ही अत्यंत गंभीर बाब आहे.असे होण्याची कारणे आपल्याकडच्या सामाजिक परिस्थितीत आहेत, असे गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून लक्षात आले आहे. आपल्याभोवताली सुखोपभोगाची अनेक साधने निर्माण झाली आहेत. त्याचा लाभ घेतानाही अनेक जण दिसतात. मात्र ही संख्या मर्यादित आहे. असा लाभ घेणाऱ्या लोकांना पाहणारे अनेक आहेत़ त्यांनाही वाटते आपण असे करावे, मात्र ती साधने त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत. त्यातून त्यांच्यातील असमाधान वाढीला लागते. एक प्रकारची अगतिकता त्यांच्यात निर्माण होते. त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे का नाही, कसे मिळवता येईल, अशी ही भावना आहे. अशी वर्गीय दरी आपल्याकडे फार झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाला कोणतीही गोष्ट लगेच, तत्काळ हवी आहे़ ती मिळेपर्यंत वाट पाहण्याची, थांबण्याची त्यांची तयारी नसते. ती लवकर मिळावी, यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. त्यातूनच मग नको तो मार्ग निवडला जातो.सुशिक्षित तरुण पिढीही यात मागे नाही. प्रयोगशाळेत प्रयोग करणारी मुले त्या वेळी कार्यकारणभाव विचारात घेऊनच प्रयोग करीत असतात. आपल्या जगण्यात हा विचार आणणे मात्र त्यांना जमत नाही. नरबळीसारखा प्रकार घडल्यावरच आपल्याला अंधश्रद्धेमधील दाहकता लक्षात येते. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यातही आपण अनेकदा अविवेकाने वागत असतो. नवस केल्यावर, हात जोडल्यावर काही होईल ही भावना याचेच प्रतीक आहे. कोणत्याही परिस्थितीत कार्यकारणभाव म्हणजे विवेकाची कसोटी लावणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अगतिक स्थितीत हा विवेकच हरवला जातो व त्यातून असे लहानसहान व नंतर मग गंभीर प्रकार घडतात.मांत्रिक व तत्सम प्रकारच्या व्यक्ती खतपाणी घालतात. त्यातून विवेकासमोर अंधार पसरतो व अविवेक जागृत होतो. त्याला आळा घालायचा असेल तर त्यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच सामाजिक प्रबोधनदेखील होण्याची गरज आहे, जे आपल्याकडे होताना दिसत नाही. जादूटोणाविरोधी कायदा होण्यापूर्वी नरबळी देण्यासाठी तयारी करणे, हा गुन्हा समजला जात नव्हता. आता मात्र या कायद्यामुळे तो गुन्हा समजला जातो व सिद्ध झाल्यावर त्यासाठी शिक्षादेखील आहे. असे बदल करून तो कायदा अधिक टोकदार करण्याची गरज आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही सुद्धा खंत वाटावी अशीच गोष्ट आहे. अचानक झालेले मृत्यू शोधून त्यामागील कारणांचा पोलिसांनी शोध घेतला, तर त्यातून अनेक गंभीर प्रकार सापडू शकतील. असा शोध सुरू आहे, अशी माहिती प्रसिद्ध झाली तरीही नरबळीसारखे अनेक प्रकार टळू शकतील. याशिवाय शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा यातून प्रबोधन होण्याची गरज आहे. समितीच्या माध्यमातून असे उपक्रम होतच असतात. मात्र थेट समाजातून यासाठी गावोगाव युवक उभे राहिले पाहिजेत. सुरुवातीला विरोध होईल, मात्र एकदा भूमिका लक्षात आली तर त्याचे निदान महाराष्ट्रात तरी स्वागतच होईल, अशी मला खात्री आहे. ही सुरुवात मात्र लवकर झाली पाहिजे; कारण शेजारच्या मुलीला, नात्यातील एका महिलेला असे करता करता आता प्रकरण थेट मुलाने आईला बळी देण्यापर्यंत येऊन ठेपले आहे. समाजाचा विवेक जागा व्हावा, यासाठी आता समाजानेच प्रयत्न करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. (शब्दांकन : राजू इनामदार)

- मुक्ता दाभोलकरअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ पदाधिकारी.