शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

...पुन्हा फुशारकी!

By admin | Updated: June 1, 2016 03:19 IST

आदिवासी विकास विभाग आणि त्या खात्याचे मंत्री विष्णू सवरा यांच्या कार्यकर्तुत्वाच्या (?) कहाण्या अधूमनमधून प्रसृत होत असतात.

आदिवासी विकास विभाग आणि त्या खात्याचे मंत्री विष्णू सवरा यांच्या कार्यकर्तुत्वाच्या (?) कहाण्या अधूमनमधून प्रसृत होत असतात. हिवाळा संपल्यानंतर स्वेटर खरेदीचे प्रकरण असो की, मागण्यांसाठी पायी मोर्चा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन असो, सवरा स्वत:वरवा खात्यावर कोणतीही जबाबदारी येऊ देत नाहीत. पुन्हा याचाच प्रत्यय आला. निमित्त होते, पेसा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात हा सोहळा झाला. पेसा योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची फुशारकी सवरा यांनी मारली. खरेतर असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी करायला हवे. बहुदा मुख्यमंत्र्यांना या खात्याच्या एकंदरीत कर्तबगारीची जाणीव असावी, म्हणून ते अंमलबजावणीविषयी काही बोलले नाहीत. मग मंत्रिमहोदयांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. प्रत्यक्षात ही चांगली योजना असूनही केवळ आदिवासी विकास विभागाच्या उदासीन भूमिका आणि बेपर्वा वृत्तीमुळे तिची योग्य अंमलबजावणी झालेली नाही. राज्यातील १३ जिल्ह्यातील पाच हजार ९०५ गावांमध्ये २३ हजार ६५४ कामांची निवड करण्यात आली. आदिवासी गावांमध्ये आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, वन्यजीव संवर्धन, जलसंधारण, वनतळी, वन्यजीव पर्यटन, वनउपजिविका ही कामे करण्यासाठी शासनाने २६७ कोटी रुपये वितरीत केले. ही रक्कम थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग झाली. ती खर्च करण्यापूर्वी ग्रामपंचायतींना विकास कामांचा आराखडा जिल्हा परिषदेकडून मंजूर करुन घेणे बंधनकारक आहे. याचे प्रशिक्षण सरपंच वा सदस्यांना दिले गेलेच नाही. त्यामुळे कुठे आराखडे तयार झाले नाहीत, कुठे त्याना मंजुरीच मिळाली नाही, काही ठिकाणी मंजुरी मिळाली मात्र कामाला सुरुवात झाली नाही, अशी स्थिती आहे. सर्वाधिक पेसा गावे नंदुरबार जिल्ह्यात आहे. तिथली परिस्थिती धक्कादायक आहे. तेथे ३४ कोटी रुपयांचा निधी वितरीत झाला. चार हजार ९३१ कामांचे आराखडे मंजूर झाले. प्रत्यक्षात ७८० कामांनाच या वर्षी सुरुवात झाली. पुरेशी जनजागृती आणि प्रशिक्षणाच्या अभावाने ही परिस्थिती उद्भवली. या विभागाच्या अटीनुसार या वर्षीची कामे पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या वर्षीचा निधीदेखील या गावांना मिळणार नाही, हे वास्तव असताना राज्य शासन आणि आदिवासी विकास विभागाचा वर्षपूर्ती सोहळ्याचा उत्साह हा आश्चर्यजनक आणि धक्कादायक असाच आहे.