शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

...पुन्हा फुशारकी!

By admin | Updated: June 1, 2016 03:19 IST

आदिवासी विकास विभाग आणि त्या खात्याचे मंत्री विष्णू सवरा यांच्या कार्यकर्तुत्वाच्या (?) कहाण्या अधूमनमधून प्रसृत होत असतात.

आदिवासी विकास विभाग आणि त्या खात्याचे मंत्री विष्णू सवरा यांच्या कार्यकर्तुत्वाच्या (?) कहाण्या अधूमनमधून प्रसृत होत असतात. हिवाळा संपल्यानंतर स्वेटर खरेदीचे प्रकरण असो की, मागण्यांसाठी पायी मोर्चा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन असो, सवरा स्वत:वरवा खात्यावर कोणतीही जबाबदारी येऊ देत नाहीत. पुन्हा याचाच प्रत्यय आला. निमित्त होते, पेसा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात हा सोहळा झाला. पेसा योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची फुशारकी सवरा यांनी मारली. खरेतर असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी करायला हवे. बहुदा मुख्यमंत्र्यांना या खात्याच्या एकंदरीत कर्तबगारीची जाणीव असावी, म्हणून ते अंमलबजावणीविषयी काही बोलले नाहीत. मग मंत्रिमहोदयांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. प्रत्यक्षात ही चांगली योजना असूनही केवळ आदिवासी विकास विभागाच्या उदासीन भूमिका आणि बेपर्वा वृत्तीमुळे तिची योग्य अंमलबजावणी झालेली नाही. राज्यातील १३ जिल्ह्यातील पाच हजार ९०५ गावांमध्ये २३ हजार ६५४ कामांची निवड करण्यात आली. आदिवासी गावांमध्ये आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, वन्यजीव संवर्धन, जलसंधारण, वनतळी, वन्यजीव पर्यटन, वनउपजिविका ही कामे करण्यासाठी शासनाने २६७ कोटी रुपये वितरीत केले. ही रक्कम थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग झाली. ती खर्च करण्यापूर्वी ग्रामपंचायतींना विकास कामांचा आराखडा जिल्हा परिषदेकडून मंजूर करुन घेणे बंधनकारक आहे. याचे प्रशिक्षण सरपंच वा सदस्यांना दिले गेलेच नाही. त्यामुळे कुठे आराखडे तयार झाले नाहीत, कुठे त्याना मंजुरीच मिळाली नाही, काही ठिकाणी मंजुरी मिळाली मात्र कामाला सुरुवात झाली नाही, अशी स्थिती आहे. सर्वाधिक पेसा गावे नंदुरबार जिल्ह्यात आहे. तिथली परिस्थिती धक्कादायक आहे. तेथे ३४ कोटी रुपयांचा निधी वितरीत झाला. चार हजार ९३१ कामांचे आराखडे मंजूर झाले. प्रत्यक्षात ७८० कामांनाच या वर्षी सुरुवात झाली. पुरेशी जनजागृती आणि प्रशिक्षणाच्या अभावाने ही परिस्थिती उद्भवली. या विभागाच्या अटीनुसार या वर्षीची कामे पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या वर्षीचा निधीदेखील या गावांना मिळणार नाही, हे वास्तव असताना राज्य शासन आणि आदिवासी विकास विभागाचा वर्षपूर्ती सोहळ्याचा उत्साह हा आश्चर्यजनक आणि धक्कादायक असाच आहे.