शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

पुन्हा झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 04:19 IST

पावसाच्या तडाख्याने झाड कोसळून मुंबईत आणखी दोघांचा आणि महिनाभरात सहा जणांचा बळी गेल्याने योग्य छाटणी न केलेल्या धोकादायक झाडांचा विषय ऐरणीवर आला आहे

पावसाच्या तडाख्याने झाड कोसळून मुंबईत आणखी दोघांचा आणि महिनाभरात सहा जणांचा बळी गेल्याने योग्य छाटणी न केलेल्या धोकादायक झाडांचा विषय ऐरणीवर आला आहे. मुंबईतील २९ लाख झाडांपैकी यंदा ९३ हजार झाडांची छाटणी करण्याची गरज होती. त्यासाठी पालिकेने चार हजारांवर सोसायट्यांना नोटिसा पाठवल्या, पण त्यातील अवघ्या दीड हजार सोसायट्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे झाड पडले, की त्याला पालिका जबाबदार की सोसायटी हा वाद दरवेळी रंगतो. पालिकेच्या पथकाने सतत पाहणी करून झाडांवर लक्ष ठेवायला हवे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे, तर ही त्या त्या सोसायट्यांची जबाबदारी आहे, असे सांगून पालिका हात झटकते. ठाण्यातील अशा वादात जागरूक नागरिकांनी न्यायालयात लढत देऊन या प्रकरणातील पालिकेची जबाबदारी निश्चित केली आणि झाड पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यास भाग पाडले होते. सध्याच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील वातावरणातच शहरातील झाडे घटत आहेत. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी झाडे तोडली जातात आणि त्याऐवजी झुडपे लावली जातात. पुढे ती जगत नाहीत. अनेकदा छान दिसावीत म्हणून लावलेली परदेशी झाडे या वातावरणात मूळ धरत नाहीत. या साऱ्यांवर देखरेख ठेवणे, केवळ वृक्ष लागवड करून घेणेच नव्हे, तर ती झाडे जगवणे; शहराच्या पर्यावरणाचा-स्थानिक वातावरणाचा विचार करून झाडांची जोपासना करणे अशी अनेक कामे करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण यापुढील काळात कळीचे ठरणार आहे. मुंबई-ठाण्यातील वृक्ष प्राधिकरणावर तज्ज्ञांच्या नेमणुका न करता तेथे राजकीय पक्षांच्या मर्जीतील व्यक्तींची वर्णी लावण्याचा घाट स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिकांनी न्यायालयाच्या मदतीने उधळल्याचा इतिहास ताजा आहे. अनेकदा झाड पडण्यामागे त्याच्या अयोग्य छाटणीचा मुद्दा समोर येतो. झाडाचा जमिनीवर असलेला घेर जेवढा मोठा असतो, तेवढीच त्याची मुळे खाली पसरलेली असतात. अनेकदा वेगवेगळ््या कामांसाठी रस्ते किंवा पदपथ खोदताना मुळे कशीही तोडली जातात. त्यात झाडाचा तोल बिघडतो. कधी फांद्यांची छाटणी एकाच बाजूने केली, तरीही झाड कलंडते. यासाठी वृक्ष प्राधिकरण, त्यांतील तज्ज्ञ सदस्य शहराच्या मदतीला येऊ शकतात. पण तेथेही पडेल उमेदवारांना संधी आणि चरण्यासाठी नवे कुरण मिळेल, या अपेक्षेने जर नेमणुका होत असतील; तर झाडे पडून होणाºया मृत्यूंबद्दल पालिकेतील यंत्रणांवर गुन्हे दाखल करायला हवेत. तसे झाले तरच या समित्या, त्यांचे महत्त्व साºयांच्या ध्यानी येईल. शिवाय झाडे पडण्याचा विषय हा केवळ पावसाचा फटका न राहता शहराच्या पर्यावरणाचा, त्यातील नागरिकांच्या जगण्या-मरण्याचा विषय होईल.