शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

पुन्हा झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 04:19 IST

पावसाच्या तडाख्याने झाड कोसळून मुंबईत आणखी दोघांचा आणि महिनाभरात सहा जणांचा बळी गेल्याने योग्य छाटणी न केलेल्या धोकादायक झाडांचा विषय ऐरणीवर आला आहे

पावसाच्या तडाख्याने झाड कोसळून मुंबईत आणखी दोघांचा आणि महिनाभरात सहा जणांचा बळी गेल्याने योग्य छाटणी न केलेल्या धोकादायक झाडांचा विषय ऐरणीवर आला आहे. मुंबईतील २९ लाख झाडांपैकी यंदा ९३ हजार झाडांची छाटणी करण्याची गरज होती. त्यासाठी पालिकेने चार हजारांवर सोसायट्यांना नोटिसा पाठवल्या, पण त्यातील अवघ्या दीड हजार सोसायट्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे झाड पडले, की त्याला पालिका जबाबदार की सोसायटी हा वाद दरवेळी रंगतो. पालिकेच्या पथकाने सतत पाहणी करून झाडांवर लक्ष ठेवायला हवे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे, तर ही त्या त्या सोसायट्यांची जबाबदारी आहे, असे सांगून पालिका हात झटकते. ठाण्यातील अशा वादात जागरूक नागरिकांनी न्यायालयात लढत देऊन या प्रकरणातील पालिकेची जबाबदारी निश्चित केली आणि झाड पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यास भाग पाडले होते. सध्याच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील वातावरणातच शहरातील झाडे घटत आहेत. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी झाडे तोडली जातात आणि त्याऐवजी झुडपे लावली जातात. पुढे ती जगत नाहीत. अनेकदा छान दिसावीत म्हणून लावलेली परदेशी झाडे या वातावरणात मूळ धरत नाहीत. या साऱ्यांवर देखरेख ठेवणे, केवळ वृक्ष लागवड करून घेणेच नव्हे, तर ती झाडे जगवणे; शहराच्या पर्यावरणाचा-स्थानिक वातावरणाचा विचार करून झाडांची जोपासना करणे अशी अनेक कामे करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण यापुढील काळात कळीचे ठरणार आहे. मुंबई-ठाण्यातील वृक्ष प्राधिकरणावर तज्ज्ञांच्या नेमणुका न करता तेथे राजकीय पक्षांच्या मर्जीतील व्यक्तींची वर्णी लावण्याचा घाट स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिकांनी न्यायालयाच्या मदतीने उधळल्याचा इतिहास ताजा आहे. अनेकदा झाड पडण्यामागे त्याच्या अयोग्य छाटणीचा मुद्दा समोर येतो. झाडाचा जमिनीवर असलेला घेर जेवढा मोठा असतो, तेवढीच त्याची मुळे खाली पसरलेली असतात. अनेकदा वेगवेगळ््या कामांसाठी रस्ते किंवा पदपथ खोदताना मुळे कशीही तोडली जातात. त्यात झाडाचा तोल बिघडतो. कधी फांद्यांची छाटणी एकाच बाजूने केली, तरीही झाड कलंडते. यासाठी वृक्ष प्राधिकरण, त्यांतील तज्ज्ञ सदस्य शहराच्या मदतीला येऊ शकतात. पण तेथेही पडेल उमेदवारांना संधी आणि चरण्यासाठी नवे कुरण मिळेल, या अपेक्षेने जर नेमणुका होत असतील; तर झाडे पडून होणाºया मृत्यूंबद्दल पालिकेतील यंत्रणांवर गुन्हे दाखल करायला हवेत. तसे झाले तरच या समित्या, त्यांचे महत्त्व साºयांच्या ध्यानी येईल. शिवाय झाडे पडण्याचा विषय हा केवळ पावसाचा फटका न राहता शहराच्या पर्यावरणाचा, त्यातील नागरिकांच्या जगण्या-मरण्याचा विषय होईल.