शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२७ सभा, प्रचंड गर्दी; पण अपेक्षित चमत्कार नाहीच

By admin | Updated: October 20, 2014 01:24 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या जवळ जाण्याइतपत यश मिळाले असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर मोठा चमत्कार घडेल, हा भाजपा नेत्यांचा होरा फोल ठरला.

गजानन जानभोर, (सहायक संपादक, लोकमत) - विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या जवळ जाण्याइतपत यश मिळाले असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर मोठा चमत्कार घडेल, हा भाजपा नेत्यांचा होरा फोल ठरला. मोदींनी राज्यात तब्बल २७ प्रचारसभा घेतल्या़. विशेष म्हणजे, यातील अर्ध्या सभा या तालुक्यांच्या ठिकाणी घेण्यात आल्या़ ग्रामीण भागात भाजपाला मजबूत करणे, हा त्यामागचा उद्देश होता़ परंतु, विदर्भातील ब्रह्मपुरी, धामणगाव रेल्वे, कोल्हापूर जिल्ह्यातील तासगाव, कोकणातील कासर्डे (कनकवली), ही गावे ज्या मतदारसंघात येतात तेथील भाजपा उमेदवार हरले़ याचा अर्थ मोदींचा प्रभाव नव्हता असे म्हणणे चुकीचे ठरेल़ परंतु, यासोबतच मोदी प्रचाराला आले म्हणून आपण जिंकणारच, हा भाजपा उमेदवारांचा विश्वासही खोटा ठरला़ त्यामुळे यापुढे कोणालाही मोदींची सभा झाली म्हणजे, ‘मी निवडून येणारच’ असे ठामपणे म्हणता येणार नाही़ म्हणजे मग महाराष्ट्रात भाजपाला जे मोठे यश मिळाले त्याचे श्रेय मोदींना द्यायचे नाही का? तर ते नक्कीच द्यावे लागेल़ पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा निर्माण झालेला प्रभाव निश्चितच जनतेच्या अपेक्षा उंचावणारा होता़ या देशाने न बोलणारा पंतप्रधान पाहिला आणि सतत संवाद साधणारा पंतप्रधानही पाहिला़ सामान्य माणसांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या लहान-सहान प्रश्नांची आपल्या पंतप्रधानांना जाणीव आहे, हा विश्वास मोदींनी जनतेत निर्माण केला. मोदी सतत देशातील नागरिकांचा, त्यांच्या कल्याणाचा विचार करतात, हेही लोकांना जाणवले़ त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेस अद्याप सावरली नसल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून आले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी प्रचाराला आले खरे़ पण, त्यांचा प्रचार कर्तव्य पालनाचा आणि त्यापेक्षा सोपस्काराचाच भाग अधिक वाटला. प्रचारासाठी आवश्यक असलेली आक्रमकता व विजयासाठी आवश्यक असलेला विश्वास त्यांच्या भाषणातून कधी जाणवला नाही़ काँग्रेसचे प्रादेशिक स्तरावरचे नेतेही आपल्या मतदार संघाबाहेर फिरकले नाहीत़ काँग्रसने ही निवडणूक जणू लढवलीच नाही, असेच म्हणावे लागेल़ काँग्रेस भुईसपाट होते की काय असे वाटत असताना या पक्षाने दखलपात्र यश मिळवले हेही विसरता येणार नाही. ज्या तासगावात मोदी आले तेथे आऱ आऱ पाटील जिंकले़ बारामतीत तर अजित पवार तब्बल ७० हजार मतांनी निवडून आले़ ही मोदींच्या प्रभावाची लक्षणं निश्चितच नाहीत़ या देशातील मतदार प्रत्येकवेळी एखाद्या नेत्याच्या प्रभावात दिपून जातो किंवा लाटेत वाहवत जातो, हे म्हणणे आमच्या मताधिकाराचा अपमान आहे, ही गोष्टही राज्यातील मतदारांनी न बोलता सांगून टाकली आहे़ आपली लोकशाही अधिक दृढ आणि मतदार अधिक सुज्ञ होत असल्याचेच हे लक्षण आहे़