शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

२७ सभा, प्रचंड गर्दी; पण अपेक्षित चमत्कार नाहीच

By admin | Updated: October 20, 2014 01:24 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या जवळ जाण्याइतपत यश मिळाले असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर मोठा चमत्कार घडेल, हा भाजपा नेत्यांचा होरा फोल ठरला.

गजानन जानभोर, (सहायक संपादक, लोकमत) - विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या जवळ जाण्याइतपत यश मिळाले असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर मोठा चमत्कार घडेल, हा भाजपा नेत्यांचा होरा फोल ठरला. मोदींनी राज्यात तब्बल २७ प्रचारसभा घेतल्या़. विशेष म्हणजे, यातील अर्ध्या सभा या तालुक्यांच्या ठिकाणी घेण्यात आल्या़ ग्रामीण भागात भाजपाला मजबूत करणे, हा त्यामागचा उद्देश होता़ परंतु, विदर्भातील ब्रह्मपुरी, धामणगाव रेल्वे, कोल्हापूर जिल्ह्यातील तासगाव, कोकणातील कासर्डे (कनकवली), ही गावे ज्या मतदारसंघात येतात तेथील भाजपा उमेदवार हरले़ याचा अर्थ मोदींचा प्रभाव नव्हता असे म्हणणे चुकीचे ठरेल़ परंतु, यासोबतच मोदी प्रचाराला आले म्हणून आपण जिंकणारच, हा भाजपा उमेदवारांचा विश्वासही खोटा ठरला़ त्यामुळे यापुढे कोणालाही मोदींची सभा झाली म्हणजे, ‘मी निवडून येणारच’ असे ठामपणे म्हणता येणार नाही़ म्हणजे मग महाराष्ट्रात भाजपाला जे मोठे यश मिळाले त्याचे श्रेय मोदींना द्यायचे नाही का? तर ते नक्कीच द्यावे लागेल़ पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा निर्माण झालेला प्रभाव निश्चितच जनतेच्या अपेक्षा उंचावणारा होता़ या देशाने न बोलणारा पंतप्रधान पाहिला आणि सतत संवाद साधणारा पंतप्रधानही पाहिला़ सामान्य माणसांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या लहान-सहान प्रश्नांची आपल्या पंतप्रधानांना जाणीव आहे, हा विश्वास मोदींनी जनतेत निर्माण केला. मोदी सतत देशातील नागरिकांचा, त्यांच्या कल्याणाचा विचार करतात, हेही लोकांना जाणवले़ त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेस अद्याप सावरली नसल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून आले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी प्रचाराला आले खरे़ पण, त्यांचा प्रचार कर्तव्य पालनाचा आणि त्यापेक्षा सोपस्काराचाच भाग अधिक वाटला. प्रचारासाठी आवश्यक असलेली आक्रमकता व विजयासाठी आवश्यक असलेला विश्वास त्यांच्या भाषणातून कधी जाणवला नाही़ काँग्रेसचे प्रादेशिक स्तरावरचे नेतेही आपल्या मतदार संघाबाहेर फिरकले नाहीत़ काँग्रसने ही निवडणूक जणू लढवलीच नाही, असेच म्हणावे लागेल़ काँग्रेस भुईसपाट होते की काय असे वाटत असताना या पक्षाने दखलपात्र यश मिळवले हेही विसरता येणार नाही. ज्या तासगावात मोदी आले तेथे आऱ आऱ पाटील जिंकले़ बारामतीत तर अजित पवार तब्बल ७० हजार मतांनी निवडून आले़ ही मोदींच्या प्रभावाची लक्षणं निश्चितच नाहीत़ या देशातील मतदार प्रत्येकवेळी एखाद्या नेत्याच्या प्रभावात दिपून जातो किंवा लाटेत वाहवत जातो, हे म्हणणे आमच्या मताधिकाराचा अपमान आहे, ही गोष्टही राज्यातील मतदारांनी न बोलता सांगून टाकली आहे़ आपली लोकशाही अधिक दृढ आणि मतदार अधिक सुज्ञ होत असल्याचेच हे लक्षण आहे़