शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

विद्यार्थी अपेक्षित संचांविनाच

By admin | Updated: January 26, 2016 00:13 IST

शासकीय आश्रमशाळेतील दहावी व बारावीच्या विद्याथ्र्याना अभ्यासासाठी अपेक्षित संच, मार्गदर्शिका अद्याप देण्यात आलेल्या नाहीत

तळोदा विद्याथ्र्याची परीक्षा अवघ्या पुढच्या महिन्यात येऊन ठेपली असतानादेखील शासकीय आश्रमशाळेतील दहावी व बारावीच्या विद्याथ्र्याना अभ्यासासाठी अपेक्षित संच, मार्गदर्शिका अद्याप देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे विद्याथ्र्याच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला असून, प्रकल्पाच्या भोंगळ नियोजनाबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा आहे.

तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील जवळपास 37 शासकीय आश्रमशाळांना दहावी व बारावीचे वर्ग जोडले आहेत. यात साधारण एक हजार 200 दहावीचे, तर 320 विद्यार्थी बारावीचे शिक्षण घेत आहेत. या विद्याथ्र्याना अभ्यासासाठी प्रकल्पाकडून दरवर्षी 21 अपेक्षित संच मार्गदर्शिका पुरविण्यात येते. तथापि, यंदा परीक्षा अवघ्या पुढच्या महिन्यात येऊन ठेपली असताना अजूनही ही पुस्तके देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विद्याथ्र्याच्या अभ्यासावर एकप्रकारे मोठा परिणाम झाल्याची व्यथा विद्याथ्र्यानी मांडली आहे.

वास्तविक हे अपेक्षित संच दिवाळीनंतर दिले पाहिजे होते. कारण विद्याथ्र्याना अभ्यासाचे योग्य स्वरूप मिळून त्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन केले जात असते. मात्र प्रकल्पाच्या भोंगळ नियोजनामुळे अजूनही विद्याथ्र्याना अपेक्षित संच, मार्गदर्शिका मिळालेल्या नाहीत. आधीच विषय शिक्षकांची प्रत्येक आश्रमशाळेत वानवा आहे. जे काही नियुक्त करण्यात आले आहेत तेही रोजंदारीवरील आहेत. साहजिकच अध्यापनावर विपरित परिणाम झाला आहे. एकीकडे आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी आश्रमशाळांच्या दहावी-बारावीच्या निकालाच्या टक्केवारीची मोठी अपेक्षा करतात, तर दुसरीकडे प्रकल्पाच्या अशा शून्य नियोजनामुळे विद्याथ्र्याना पुस्तके उपलब्ध करून दिली जात नसल्याचे चित्र आहे. कुठे भौतिक सुविधांची वानवा, कुठे अन्नधान्याची ओरड तर कुठे पाठय़पुस्तक अन् शिक्षकांचा प्रश्न असे विदारक चित्र आश्रमशाळांचे असताना वरिष्ठ अधिकारी कोणत्या आधारावर शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची अपेक्षा करतात, असा उद्विगA सवालही पालकांनी उपस्थित केला आहे.

प्रकल्पातील आश्रमशाळांच्या प्रश्नांची शासनाने ठोस दखल घ्यावी, अन्यथा या शाळाच बंद कराव्यात, अशी व्यथा हताश पालकांनी व्यक्त केली आहे.