शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’ची जरब गेली कुठे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दररोज चोरी, धूमस्टाईलने सोनपोत लांबविणे, भरदिवसा रस्तालूट, पेट्रोल पंपमालकाची रेकी करून लाखोंची लूट अशा घटनांची मालिकाच ...

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दररोज चोरी, धूमस्टाईलने सोनपोत लांबविणे, भरदिवसा रस्तालूट, पेट्रोल पंपमालकाची रेकी करून लाखोंची लूट अशा घटनांची मालिकाच सुरू आहे. १८ ऑगस्टपासून दहा दिवसात दररोज चोरी,लूट अशा घटना घडल्या आहेत. पुन्हा-पुन्हा अशा घटना घडणे म्हणजे लुटारु आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयीचा धाकच संपला आहे, असेच म्हणावे लागेल. अन्य जिल्ह्यात विकासाचा आलेख वाढताना दिसतो. याउलट खून, लूट, मोटारसायकल चोरी, घरफोडी सारख्या वाढत्या घटनांमुळे धुळ्याच्या गुन्हेगारीचा आलेख हा वाढताना दिसत आहे. शहरातून विविध गुन्ह्यातील गुंड तडीपार करण्याचा धडाका मध्यंतरी पोलिसांकडून लावण्यात आला होता. यामुळे नक्कीच शहरातील गुंडगिरी व गुन्हेगारीवर आळा बसेल, असा विश्वास नागरिकांना होता. पोलिसांच्या कामगिरीवर नागरिक खुश होते. परंतु झाले उलटच तडीपार झालेले गुंड सर्रासपणे शहरात फिरताना दिसू लागले. मग तडीपार झालेल्या गुंडांना पकडण्यासाठी मग विशेष मोहीम राबविण्यात आली; मात्र तडीपार केलेल्या गुंडांची शहरात येण्याची हिंमतच कशी होते, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. शहरासह जिल्ह्यात घरफोडीचे सत्र तर थांबता थांबत नाही, अशी परिस्थिती आहे. दोंडाईचात बँकेसमोरुन एक लाख लंपास, धुळ्यात जे.बी.रोडवरुन सव्वालाख लंपास, खंबाळे गावात सव्वालाखाची घरफोडी, उंटावदला १३ लाखांची लूट, मोराणेला चालत्या वाहनातून ६ लाखांची चोरी, धुळ्यात अभयनगरात साडेतीन लाखांची चोरी, हट्टी शिवारात ६ लाखांची लूट, धुळे शहरात संतोषी माता मंदिरात नवस फेडण्यासाठी आलेल्या महिलेची सोनपोत लंपास, नगाव शिवारात अज्ञात दोन लुटारुंनी एकाला दमदाटी करुन लूट केल्याची घटना अशा पद्धतीने चोरीची मालिका सुरु आहे. आधी झालेल्या चोरीचा शोध लागत नसताना दररोज चोरी आणि लुटीच्या घटना घडत आहेत. भरदुपारी घरात चोरीची घटना होते. धुळे शहरासह अन्य ठिकाणीही तिची परिस्थिती आहे. मोटारसायकल चोरीची घटना तर आता सायकल चोरीसारखीच झाली आहे. मोटारसायकल चोरी झाल्यानंतर लगेच त्याची फिर्याद घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. आधी नातेवाईकांकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घ्या, असा सल्ला दिला जातो, अशी नागरिकांची तक्रार आहे. तरीही नाही सापडली तर मग आठ - दहा दिवसांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल होतात. या सर्वांमागे एक कारण मुख्य आहे की, जिल्ह्यात खाकीची आधी असलेली जरब आता दिसत नाही. आधी पोलीस चौकात असल्याचे पाहून ट्रिपल सीट मोटारसायकल घेऊन जाण्याची हिंमत कोणी करत नसे. परंतु आतातर महाविद्यालयीन तरुण - तरुणी चौकात पोलीस उभे असताना सुसाट वेगाने ट्रिपल सीट निघून जातात. पोलीस सुद्धा बघून न बघितल्यासारखे करतात. जर महाविद्यालयीन तरुण - तरुणीच जर पोलिसांना घाबरत नसतील, तर मग अट्टल चोरटे, तडीपार गुंड हे तर फार लांबची गोष्ट आहे. खाकीची गमावलेली ती जरब पुन्हा निर्माण करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही राजकीय दबावाखाली न येता जे दोषी आहे, मग ते कोणीही असोत, त्यांच्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे. शहरात कानठळ्या फोडणारे सायलन्सरचे फटाके फोडत बुलेटवर सुसाट वेगाने फिरणाऱ्यांवर पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांची जागा दाखवून दिली. त्याचपद्धतीने पोलिसांनी कर्तव्य बजाविताना कोणावर गय करता कामा नये, तसे केले तरच पोलिसांची जरब निर्माण होऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा चांगली होईल. तसेच चोरी, रस्तालुटीच्या घटनांना ‘ब्रेक’ बसेल.