शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींनी गाठला तळ, तर दुबार पेरणी केलेली बाजरी गेली हवेतच उडून यामुळे शेतकरी संकटात, दुष्काळग्रस्त जाहीर करून द्यावा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST

अर्धा पावसाळा संपला तरी मालपूर येथील नदी, नाले कोरडे ठाक असून, नाल्यावरील जलयुक्त शिवारांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात ठणठणाट दिसून ...

अर्धा पावसाळा संपला तरी मालपूर येथील नदी, नाले कोरडे ठाक असून, नाल्यावरील जलयुक्त शिवारांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात ठणठणाट दिसून येत आहे. यामुळे येथील विहिरी, कूपनलिकांचा जलस्रोत घटून विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे भर उन्हाळ्यात वाढीस लावलेला कापूस शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत करपून गेला आहे. आता पाऊस आला तरीदेखील त्यावरील फुलफुगडी गळून मातीत मिसळणार आहे म्हणून नुकसान हे ठरलेलेच आहे. म्हणून येथील जुजबी स्वरुपातील बागायती शेतीदेखील यावर्षी संकटात सापडली आहे, तर कोरडवाहू वाणाचे तीन तेरा झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे.

तुटपुंज्या पावसाच्या भरवशावर मालपूरसह परिसरातील शेतकऱ्यांनी कोरडवाहू कापसाची लागवड १६ जून रोजी दाखल झालेल्या पावसावर केली. मात्र लागवड झाल्यावर एकथेंबदेखील आठवडाभर पाऊस पडला नाही. परिणामी कापसाचा अंकुर जमिनीवर येण्याआधी जमिनीतच नेस्तनाबूत झाला. यामुळे रोटावेटर, वखर फिरवून येथील शेतकऱ्यांनी कमी पावसाचे व कमी दिवसांचे भुसार पिकाला पसंती देऊन बाजरीची दुबार पेरणी केली. बाजरीची पेरणी झाल्यानंतर महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. दरम्यानच्या काळात वारादेखील येथे तासी ३० ते ३५ किलोमीटर वेगाने वाहिल्याने या पिकाला सुरुवातीला एकच मूळ असल्याने या वाऱ्याच्या वेगाने बाजरी पीक हवेतच उडून गेल्याचे येथील विदारक चित्र दिसून येत आहे. यामुळे दुबार पेरणी केलेले पीकदेखील हातचे गेले व अर्धा पावसाळा संपल्यामुळे येथील शेतकर्‍यांचे मनोधैर्य खचून गेले असून, वैफल्यग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नसल्याने मदतीची अपेक्षा येथील शेतकरीवर्गाने व्यक्त केली आहे.

येथील अमरावती मध्यम प्रकल्पातील पाणीदेखील विखरण, कामपूर, खर्दे येथील तलाव भरण्यासाठी वापर झाल्याने त्यात कमालीची घट दिसून येत आहे. आहे ते पाणी आगामी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करावे

लागेल. यामुळे येथील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांजवळ कुठलाच पर्याय दिसून येत नसल्यामुळे साहजिकच आहे की भागभांडवल लावून पिके हातची वाया गेल्याने आगामी काळात कुटुंबीयांची उपजीविका कशाप्रकारे भागवायची यामुळे दुष्काळी तालुका जाहीर करून येथील शेतकर्‍यांना धीर द्यावा अन्यथा खान्देशाचा नजीकच्या काळात विदर्भ होऊन शेतकरी टोकाचे पाऊल उचलतील ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन त्वरित शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा अशी येथील शेतकर्‍यांसह धवल दूध संकलनाचे प्रमुख माजी सरपंच हेमराज पाटील यांनी केली आहे.

120821\20210811_133657.jpg~120821\20210811_133641.jpg

मालपूर येथील विहिरींचा जलस्रोत घटल्याने गाठला तळ.~मालपूर येथील विहिरींनी गाठला तळ