शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
3
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
4
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
5
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
6
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
7
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
8
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
9
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
10
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
12
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
13
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
14
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
15
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
16
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
17
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
18
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
19
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
20
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या

विहिरींनी गाठला तळ, तर दुबार पेरणी केलेली बाजरी गेली हवेतच उडून यामुळे शेतकरी संकटात, दुष्काळग्रस्त जाहीर करून द्यावा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST

अर्धा पावसाळा संपला तरी मालपूर येथील नदी, नाले कोरडे ठाक असून, नाल्यावरील जलयुक्त शिवारांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात ठणठणाट दिसून ...

अर्धा पावसाळा संपला तरी मालपूर येथील नदी, नाले कोरडे ठाक असून, नाल्यावरील जलयुक्त शिवारांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात ठणठणाट दिसून येत आहे. यामुळे येथील विहिरी, कूपनलिकांचा जलस्रोत घटून विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे भर उन्हाळ्यात वाढीस लावलेला कापूस शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत करपून गेला आहे. आता पाऊस आला तरीदेखील त्यावरील फुलफुगडी गळून मातीत मिसळणार आहे म्हणून नुकसान हे ठरलेलेच आहे. म्हणून येथील जुजबी स्वरुपातील बागायती शेतीदेखील यावर्षी संकटात सापडली आहे, तर कोरडवाहू वाणाचे तीन तेरा झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे.

तुटपुंज्या पावसाच्या भरवशावर मालपूरसह परिसरातील शेतकऱ्यांनी कोरडवाहू कापसाची लागवड १६ जून रोजी दाखल झालेल्या पावसावर केली. मात्र लागवड झाल्यावर एकथेंबदेखील आठवडाभर पाऊस पडला नाही. परिणामी कापसाचा अंकुर जमिनीवर येण्याआधी जमिनीतच नेस्तनाबूत झाला. यामुळे रोटावेटर, वखर फिरवून येथील शेतकऱ्यांनी कमी पावसाचे व कमी दिवसांचे भुसार पिकाला पसंती देऊन बाजरीची दुबार पेरणी केली. बाजरीची पेरणी झाल्यानंतर महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. दरम्यानच्या काळात वारादेखील येथे तासी ३० ते ३५ किलोमीटर वेगाने वाहिल्याने या पिकाला सुरुवातीला एकच मूळ असल्याने या वाऱ्याच्या वेगाने बाजरी पीक हवेतच उडून गेल्याचे येथील विदारक चित्र दिसून येत आहे. यामुळे दुबार पेरणी केलेले पीकदेखील हातचे गेले व अर्धा पावसाळा संपल्यामुळे येथील शेतकर्‍यांचे मनोधैर्य खचून गेले असून, वैफल्यग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नसल्याने मदतीची अपेक्षा येथील शेतकरीवर्गाने व्यक्त केली आहे.

येथील अमरावती मध्यम प्रकल्पातील पाणीदेखील विखरण, कामपूर, खर्दे येथील तलाव भरण्यासाठी वापर झाल्याने त्यात कमालीची घट दिसून येत आहे. आहे ते पाणी आगामी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करावे

लागेल. यामुळे येथील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांजवळ कुठलाच पर्याय दिसून येत नसल्यामुळे साहजिकच आहे की भागभांडवल लावून पिके हातची वाया गेल्याने आगामी काळात कुटुंबीयांची उपजीविका कशाप्रकारे भागवायची यामुळे दुष्काळी तालुका जाहीर करून येथील शेतकर्‍यांना धीर द्यावा अन्यथा खान्देशाचा नजीकच्या काळात विदर्भ होऊन शेतकरी टोकाचे पाऊल उचलतील ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन त्वरित शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा अशी येथील शेतकर्‍यांसह धवल दूध संकलनाचे प्रमुख माजी सरपंच हेमराज पाटील यांनी केली आहे.

120821\20210811_133657.jpg~120821\20210811_133641.jpg

मालपूर येथील विहिरींचा जलस्रोत घटल्याने गाठला तळ.~मालपूर येथील विहिरींनी गाठला तळ