शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

वीजपुरवठा खंडित केल्याने गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST

गावाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या जास्त असल्यामुळे संपूर्ण गावात नेहमीप्रमाणे चार दिवसांआड नळांना पाणी सोडले जाते. मात्र ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ...

गावाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या जास्त असल्यामुळे संपूर्ण गावात नेहमीप्रमाणे चार दिवसांआड नळांना पाणी सोडले जाते. मात्र ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या वीजपंपांचे थकीत बिल असल्यामुळे अखेर महावितरणने येथील पाच विहिरी मुख्य जलस्रोतांचे व गावातील सर्व सार्वजनिक विहिरी, सर्व गुरांचे पाणी पिण्याचे हाळ या वीजपंपांचे वीज प्रवाह महावितरणने खंडित केले. यामुळे ग्रामपंचायतीची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कापडणे ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांच्या वीजपंपांची जवळ जवळ एक कोटीपेक्षाही जास्त रक्कम थकीत आहे.

सरपंच सोनीबाई गंगाराम भिल उपसरपंच प्रा. अंकिता पाटील, सामाजिक कार्यकर्ते अंजन पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी थकीत वीज बिल भरण्यासाठी प्रयत्न केल्याने अखेर मंगळवारी महावितरणकडे तीस हजार रुपयांच्या भरणा केला आहे. त्यानंतर महावितरणने पाच विहिरीजवळील मुख्य वीजपंपाचा खंडित वीज प्रवाह पूर्ववत वीज जोडणी केली. त्यानंतर ग्रामपंचायतीद्वारे नळांना पाणी सोडण्यात आले. २३ रोजी दुपारी उशिरापर्यंतही सार्वजनिक हाळची वीजपंपाची जोडणी महावितरणने केलेली नव्हती, अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिली आहे.