शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

पाणीपुरवठा योजनांची वीज कापणार!

By admin | Updated: February 6, 2017 00:03 IST

महावितरण : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांना पत्र, तब्बल 51 कोटी रुपये थकले

धुळे :  वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या वीज महावितरण कंपनीने राज्यभरात वसुलीची धडक मोहीम सुरू केली आह़े त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांपोटी 51 कोटी रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरणने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांना पत्र देऊन थकबाकी भरण्याचे आदेश ग्रामपंचायतींना द्यावे, अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा दिला आह़ेवीज देयक थकीत असलेल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत़ त्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आह़े दरम्यान, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांपोटी थकीत असलेले वीज देयक सर्वाधिक असल्याने आता पाणीपुरवठा योजना महावितरणच्या ‘रडार’वर आहेत़  शहर व जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या योजना ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित येतात़ या योजनांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो़ पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असल्याने थकबाकी वाढली तरी त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे महावितरणला सहज शक्य होत नाही़ मात्र त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीचा डोंगर वाढतच असल्याने महावितरणला थकबाकीसाठी पावले उचलावी लागणार होती़ त्यामुळे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यातील चारही प्रादेशिक संचालक व 16 परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत़ तसेच या कामात कुचराई करणा:यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यभरात वीज देयक थकीत असलेल्यांवर कारवाई केली जात आह़े  जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी घेण्यात आलेल्या वीज कनेक्शनची संख्या 1 हजार 99 इतकी आह़े जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये एकूण 11 उपविभाग असून त्यापैकी शिरपूर 2 या उपविभागात सर्वाधिक 9 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी पाणीपुरवठा योजनांपोटी आह़े दरम्यान, महावितरणने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना पत्र दिले आह़े या पत्रानुसार, जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींकडे 51 कोटी 57 लाख रुपयांचे वीज देयक थकले आहेत़ वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतींकडून वीज देयके भरण्यात आलेली नाही़ महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने संबंधित ग्रामपंचायतींना सार्वजनिक पाणीपुरवठय़ाची थकीत वीज देयके भरण्यास सूचित कराव़े  ग्रामपंचायतींना वेळोवेळी नोटिसा दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसून थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, याबाबत ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले आह़े  त्यामुळे  आता या पत्रावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आह़े प्रत्यक्षात ग्रामपंचायतींकडून जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती दिली जात नसल्याने जिल्हा परिषद प्रशासन अनेक बाबतीत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत़ेमहावितरणने तोडले 465 वीज कनेक्शऩ़़ महावितरण कंपनीकडून थकबाकीदार घरगुती, वाणिज्य व कृषी ग्राहकांवरदेखील कारवाई केली जात आह़े त्यानुसार आतार्पयत 465 कनेक्शनचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े 54 लाख 60 हजार रुपयांच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली आह़े थकबाकीदारांनी तत्काळ वीज देयके भरावीत, असे आवाहन करण्यात आले आह़े