शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

कोरोना काळातच नागरिकांना पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील पाणीसाठा केवळ एक ते दीड महिने पुरेल एवढाच आहे. जूनपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास ...

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील पाणीसाठा केवळ एक ते दीड महिने पुरेल एवढाच आहे. जूनपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास शहराला पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. अक्कलपाडा व नकाणे तलावातील उपलब्ध जलसाठ्यात महापालिकेला शहरासह हद्दवाढीतील अकरा गावांची तहान भागवावी लागणार आहे. गेल्या वेळेस पाऊस कमी झाल्याने नकाणे तलाव भरण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाटचरीतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पाण्याचे वेगात बाष्पीभवन होत असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे़

शहरातील गळती थांबेना

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह तसेच जलवाहिनी लिकेजद्वारे दिवसाला हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जाते. पाण्याच्या नासाडीनंतर दुरुस्ती होत असल्याने तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. नियोजन नसल्यामुळे नागरिकांना उशिरा पाणीपुरवठा केला जातो.

पाणीचोरी रोखण्याचे आव्हान

महापालिकेला पाणीपुरवठ्याचा भार डोईजड झाला असल्याने अवैध नळधारकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करीत विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.

हद्दवाढीतही पाणीटंचाईचे संकट

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमध्ये सद्य:स्थितीत जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध असला तरी हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची टँकरद्वारे तहान भागविण्याची वेळ आली आहे. महापालिकेत गावाचा समावेश झाल्यानंतर सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, मूलभूत प्रश्न सुटत नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.