धुळे : भक्तांची वाट पाहणारे, भक्तांच्या भेटीस जाणारे दैवत म्हणजे विठ्ठल होय. दरवर्षी पंढरीच्या वारीत लाखो भाविक सहभागी होत असतात. वारी म्हणजे एक रोज स्थलांतरीत होणारे गावच असते. आळंदी ते पंढरपूर या वारीला आठशेपेक्षा अधिक वर्षांचा इतिहास आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे निवृत्त उपायुक्त राजेंद्र कलाल यांनी येथे दिली.राजवाडे ग्रंथालय आणि विचारपुष्प वाचक मंचातर्फे आयोजित ‘वारी एक आनंदयात्रा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा होते. राजेंद्र कलाल म्हणाले, शालीवाहन राजाने ‘वारी’ केल्याचा उल्लेख आहे. ज्ञानदेवांच्या अभंगात वारीचा उल्लेख आहे. संत तुकाराम महाराज यांच्या घराण्याच्या सात पिढ्यांना वारीचा वारसा आहे. वारीला आठशे पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आहे. पालखी फक्त विसाव्याच्या ठिकाणीच थांबते. दिनचर्या निश्चित असते. त्यात बदल होत नाही. काही अभंग हे पंढरीच्या वेशीवर, पंढरीत चंद्रभागेच्या तिरीच म्हटले जातात. विविध ठिकाणाहून येणाºया दिंडींमध्ये पाच ते सहा लाख भाविक सहभागी होत असतात. वारी म्हणजे रोज स्थलांतरीत होणारे मोठे गाव असते. प्रास्ताविक ग्रंथालय सचिव जयश्री शहा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्योती बोरकर यांनी केले. आभार सीमा पाटील यांनी मानले. पसायदान किर्ती नांदोडे यांनी म्हटले. यावेळी माधुरी कलाल, डॉ. अंजली महाजन, माधुरी गावंडे, पुष्पा कानडे, लता आगीवाल, लखन भतवाल, नंदलाल अग्रवाल, श्रीपाद नांदेडकर, रेखा मुंदडा, विजय चांडक, जयश्री छाजेड उपस्थित होते. यावेळी राजेंद्र देशपांडे, रोहिदास बोरसे, गुलाब भिल, परेश चंद्रात्रे, प्रकाश कुळकर्णी यांनी विठ्ठल नामाचा गजर केला. त्यांना वैशाली कुळकर्णी, राजेश्री भडागे, रेणुका शिंदे, यांनी साथ दिली.
भक्ताच्या भेटीस जाणारे दैवत म्हणजे विठ्ठल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:36 IST