शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कलवाडे रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा- साक्री रस्ता मालपूर गावाच्या पुढे अमरावती मध्यम प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा- साक्री रस्ता मालपूर गावाच्या पुढे अमरावती मध्यम प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील वैंदाणे गावाचा व साक्री तालुक्यातील इंदवे गावाचा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावाशी दररोजचा होणारा संपर्क तुटला आहे. यामुळे दोन जिल्हा व तीन तालुके दुरावले आहेत. याला पर्याय म्हणून कलवाडे फाट्यापासुन भटाई विहीर रस्ता देखील सुमारे ३ किलोमीटर कच्चा तयार केला आहे. मात्र, पुढील दोन किलोमीटरचे काम रखडल्याने या गावातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील वैंदाणे गावाचे अंतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.या रस्त्याचे काम सुमारे पाच वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे नंदुरबार व धुळे जिल्हा तसेच शिंदखेडा साक्री व नंदुरबार असे तीन तालुक्यांच्या सिमा देखील दुरावल्या आहेत. हे रखडलेले काम मार्गी लागल्यास या सिमा एकमेकांना जोडल्या जावुन जवळील दोंडाईचा बाजारपेठेचे अंतर देखील यामुळे कमी होणार आहे.या रस्त्यावर अमरावती मध्यम प्रकल्पापुर्वी मोठी वर्दळ असायची ती या रस्त्याच्या अभावी कमी झाली आहे. तसेच मालपुर येथील शेतकऱ्यांना कलवाडे, वैंदाणे, इंदवे शिवारातील शेतीचा रस्ता देखील यामुळे उत्तम होणार आहे. मात्र पाच वर्षांपासून केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम रखडल्याने हा तयार झालेला भटाई विहीरपर्यंतचा रस्ता देखील वापराअभावी नादुरुस्त झाला असून यामुळे झालेला खर्च देखील वाया जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. म्हणून रखडलेला या दोन किलोमीटर रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी या तीनही तालुक्यातील ग्रामस्थांची आहे. हा रस्ता दर्जेदार झाल्यास अमरावती मध्यम प्रकल्पाच्या शिरो पॉर्इंटवर अवजड वाहन, आधुनिक यंत्रे घेवुन जाणे देखील सोयीस्कर ठरणार आहे. तसेच या प्रकल्पाची देखभाल दुरुस्तीसाठी हा रस्ता सोयीचा होणार आहे.