शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आरोग्य सेतू ॲपचा वापर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST

अवास्तव वीजबिलांना नागरिक हैराण धुळे : लाॅकडाऊन कालावधीत मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. शिवाय सहा महिने वीज बिलेदेखील दिली ...

अवास्तव वीजबिलांना नागरिक हैराण

धुळे : लाॅकडाऊन कालावधीत मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. शिवाय सहा महिने वीज बिलेदेखील दिली नाहीत; परंतु अनलाॅक झाल्यानंतर दिलेली बिले मात्र अव्वाच्या सव्वा असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. एकीकडे कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी सातत्याने होत असताना वीज बिलमाफी तर होत नाही; परंतु पाचपट अधिक बिल वसूल केले जात असल्याने संतापाची लाट आहे. अनेक पक्ष संघटनांनी या विरोधात आवाज उठविला आहे. वीजबिल माफ होण्याच्या आशेवर अनेकांनी वर्षभरापासून बिल भरले नाही. आता महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केल्याने एकत्र बिल भरणे महागात पडत आहे.

मोबाईल नेटवर्कची समस्या कायम

धुळे : ग्रामीण भागात काही कंपन्यांच्या मोबाईलला रेंज नसते. त्यामुळे फोन लागत नाही तसेच इंटरनेटला स्पीड मिळत नाही. अत्यावश्यक कामेदेखील विलंबाने होतात. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने या शिक्षणात मोबाईल रेंजअभावी गेल्या काही महिन्यांपासून अडथळे येत आहेत. ग्रामीण भागातील सरकारी कामकाजावरदेखील त्याचा परिणाम होत आहे. रिचार्जसाठी खर्च केलेला पैसा वाया जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच ग्रामीण भागातच नव्हे तर धुळ्यासारख्या शहरी भागातदेखील काही ठिकाणी काही कंपन्यांच्या सिमला रेंज नसते. वलवाडी, माराने, चितोड, मोहाडी, अवधान या भागात रेंजची समस्या आहे. शहरात आल्यावर मात्र रेंज पूर्ण मिळते. संबंधित कंपन्यांनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.