शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

किसान सन्मान निधीचे काम इतर विभागाकडे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

निवेदनात म्हटले आहे, केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना ही ...

निवेदनात म्हटले आहे, केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना ही कृषी विभागामार्फत आहे. मात्र याचे काम तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आतापर्यंत केलेले आहे. यात नवीन लाभार्थी पोर्टलवर अपलोड करणे,अपात्र खातेदारांना अपात्र करणे तसेच त्यांची पोर्टलवर दुरुस्ती करणे इत्यादी कामे आतापर्यंत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केलेली आहेत. तसेच हा अपात्र खातेदारांनाकडून व इन्कम टॅक्स भरणाऱ्या खातेदारांकडून रक्कम बऱ्यापैकी वसूल करण्यात आलेली आहे.

सद्या स्थितीत तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना महसूल विभागातील महसूल वसुली कामकाज पाहून इतरही कामकाज करावे लागते. निवडणूका, संजय गांधी योजनेतील लाभार्थी शोधणे, तसेच शासनाच्या इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्प, सातबारा संगणकीकरण, नैसर्गिक आपत्ती व आपत्तीग्रस्तांना अनुदान वाटप करणे. इत्यादी कामे करावी लागत आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर इतर विभागातील निगडित असलेल्या अतिरिक्त कामकाजाचा बोजा पडत आहे. त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून असलेली महसुली व बिगर महसुली कामे पाहता पीएम किसान योजनेचे काम नियोजित होण्यास विलंब होत आहे. म्हणून त्याची संपूर्ण जबाबदारी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर टाकली जाते हे अन्यायकारक आहे.

निवेदनावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष एस.पी. कोकणी, बी. आर. सानप, एम. आर. वळवी, पी. पी. ढोले, पी.पी. गिरासे, के. एम. चव्हाण, एम. डी. बाविस्कर, एम. एस. भावसार,बी. एस. चौधरी, एस. पी. महाजन, ए. आर. राजपूत, डी. डी. ऐशी, आर. ए. साळुंखे, एस. ए. कोळी, व्ही. पी. गिरासे, बी. बी. पवार, एन. एस. पटेल, पी.बी. पावरा, एस.एस. वाघ, डी.जे. बोरसे, व्ही.बी. पाटील, पी.एस. महाले, डी.ए. पावरा आदींच्या सह्या आहेत.