शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

विरखेलजवळील तीन पाझर तलाव फुटल्याने ‘पांझरेला’ मोठा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 21:45 IST

धुळे जिल्हा : अक्कलपाडातून ३२ हजार क्यूसेस पाणी सोडले, सर्तकतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  साक्री, पिंपळनेर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे  सोमवारी विरखेल परिसरातील तीन पाझर तलाव फुटले. त्यामुळे  गटखल नदीला पूर आला. ते पुराचे पाणी गांगेश्वरजवळ येऊन मिळाल्याने पांझरा नदीला पूर आलेला आहे. त्यात सततच्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने   अक्कलपाडा धरणातून सध्यस्थितीत २२ हजार क्यूसेस पाणीचा प्रवाह सुरू असतांना  सायंकाळी आणखी १४ हजार  क्यूसेस पाणी  सोडण्यात आले आहे. त्यामुळे एकूण ३६ हजार क्यूसेस पाणी नदीत प्रवाहीत पांझरेला रात्रीतून आणखी मोठा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. तालुक्यातील  विरखेल गावालगत असलेल्या लेंडी धरण असून त्यावर तीन पाझर तलाव फुटले असल्याने लेंडी धरणात प्रचंड जलसाठा वाहून आला आहे. यामुळे गटखल नदीला मोठा पूर आला.  पुढे हे पाणी गांगेश्वर येथे पांझरा नदीला येऊन मिळाले आहे. त्यात पश्चिम पट्ट्यात जोरात सुरु असलेल्या पावसामुळे  रविवार पेक्षाही  जास्त पाणी पांझरा नदीत आले आहे. त्यामुळे नदीला मोठा पूर आला आहे. पुराचे पाणी शहरातील पांझरा नदी काठावरील आदिवासी वस्तीत शिरले आहे. तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.  यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले   आहे.*एकाला वाचविले*दरम्यान, रविवारी पुरात अडकलेल्या  घोडदे, ता.साक्री येथील  सुभाष सोनवणे (४०) याची ३० तासानंतर सुटका करण्यात प्रशासनाला यश लाभले. *दोन जण अजून बेपत्ता*साक्री तालुक्यातील काबºयाखडक प्रकल्पातून होणाºया विसर्गामुळे आलेल्या पुरात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बाळू शाहिराम ठाकरे(२१) व पंडित उलुशा गावीत (२६) दोघे जण वाहून गेले होते. त्यांचा दुसºया दिवशीही शोध लागलेला नव्हता. प्रशासन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात येत आहे. पिंपळनेर पोलिसांत ते हरविल्याची नोंद घेऊन याबाबत सर्वत्र सूचना देण्यात आल्याचे तपासाधिकारी के.आर. रणधीर यांनी सांगितले. 

टॅग्स :Dhuleधुळे