शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

दराअभावी हजारो टन कांदा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:26 IST

साक्री तालुका : हंगाम चुकू नये म्हणून नवीन लागवडीला सुरुवात, जलपातळी घटली

लोकमत न्यूज नेटवर्कधमनार : कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. तसेच हंगाम चुकू नये म्हणून नवीन लागवडीला सुरुवातही केली आहे. मात्र, विहिरींची पाण्याची पातळी घटत असल्याचे चित्र दिसत आहे.नवरात्रीच्या कालावधीत उन्हाळी कांद्याला तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळनेर येथे दीड ते दोन हजार रुपयेपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र, आठवड्यानंतरच कांद्याचा दर दोनशे ते तीनशे रुपयांनी दररोजच घसरू लागल्याने कांदा उत्पादकांमध्ये चिंता पसरली. त्यातच दिवाळीत आठवडाभर कांदा खरेदी बंद होती. जुलै- आॅगस्ट महिन्यात कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने दरवाढीच्या अपेक्षेने शेतकºयांनी चाळीत साठवण केलेला कांदा काढलाच नाही. आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्येही तीच स्थिती असल्याने व सध्या प्रतिक्विंटल दीडशे ते तीनशे रूपये भाव उन्हाळी कांद्याला मिळत असल्याने आधीच कमी पावसामुळे दुष्काळाचे चटके सहन करणारा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.साक्री तालुक्यातील  धमनार, वसमार, दातर्ती, शेवाळी, बेहेड, कासारे, काटवान परिसरात, चिकसे-जिरापूर शिवारात उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर उत्पादित केला जातो. मात्र, पुरेशा दराअभावी आतापर्यंत एकूण कांद्यापैकी ६५ ते ७० टक्केच कांदा येथील शेतकºयांचा विकला गेला आहे. अजूनही साधारणत: दीड हजार टन उन्हाळी कांदा गावातील शेतकºयांकडे शिल्लक आहे. मात्र, कांदा सडण्याच्या समस्येबरोबरच कांद्याचे वजन कमी होणे, कांद्याला अंकूर फुटणे व काजळी चढणे अशा समस्या निर्माण होत आहेत.शेतकºयांची नाराजीकांद्याचा दर न वाढण्यास शेतकरी सरकारच्या कांदा आयात निर्यात धोरणास जबाबदार मानत असून विविध सोशल मिडीयावरून  नाराजी व्यक्त करीत आहेत. कांदा उत्पादकांची गळचेपी सरकारने केली असून शेतकरीविरोधी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी खचला असल्याची भावना शेतकºयांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे. याचा फटका सरकारला पुढील निवडणुकांत बसेल, असेही भाजीपाला व इतर पिकांच्या दराने निराश झालेला शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.जलपातळी खालावलीचिकसेत नवीन कांदा लागवडीला सुरूवात झाली आहे. मात्र, विहिरींची जलपातळी खालावली आहे. नविन लागवडीचा हंगाम चूकवू नये म्हणून गेल्या हंगामाचा उन्हाळी कांदा शिल्लक असताना व खरीप पिकही पुरेसे आलेले नसताना येथील शेतकºयांनी कांदा लागवडीचा हंगाम सुरू केला आहे. आठवडागणिक विहिरीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. म्हणून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी शेतकरी लागवड क्षेत्रात ठिबकसिंचन करून घेत आहेत. येथील बहुतांश शेतकरी नासिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यासह कळवण, देवळा तालुक्यातूनही नातेवाईकांकडून लागवडीयोग्य तयार रोप उपलब्ध करून लागवड करीत आहेत. नासिक जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या विहिरी आटल्याने साक्री तालुक्यातील शेतकºयांना रोप विक्री करून किंवा मोफत रोप पुरवठा करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे