शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

दराअभावी हजारो टन कांदा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:26 IST

साक्री तालुका : हंगाम चुकू नये म्हणून नवीन लागवडीला सुरुवात, जलपातळी घटली

लोकमत न्यूज नेटवर्कधमनार : कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. तसेच हंगाम चुकू नये म्हणून नवीन लागवडीला सुरुवातही केली आहे. मात्र, विहिरींची पाण्याची पातळी घटत असल्याचे चित्र दिसत आहे.नवरात्रीच्या कालावधीत उन्हाळी कांद्याला तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळनेर येथे दीड ते दोन हजार रुपयेपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र, आठवड्यानंतरच कांद्याचा दर दोनशे ते तीनशे रुपयांनी दररोजच घसरू लागल्याने कांदा उत्पादकांमध्ये चिंता पसरली. त्यातच दिवाळीत आठवडाभर कांदा खरेदी बंद होती. जुलै- आॅगस्ट महिन्यात कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने दरवाढीच्या अपेक्षेने शेतकºयांनी चाळीत साठवण केलेला कांदा काढलाच नाही. आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्येही तीच स्थिती असल्याने व सध्या प्रतिक्विंटल दीडशे ते तीनशे रूपये भाव उन्हाळी कांद्याला मिळत असल्याने आधीच कमी पावसामुळे दुष्काळाचे चटके सहन करणारा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.साक्री तालुक्यातील  धमनार, वसमार, दातर्ती, शेवाळी, बेहेड, कासारे, काटवान परिसरात, चिकसे-जिरापूर शिवारात उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर उत्पादित केला जातो. मात्र, पुरेशा दराअभावी आतापर्यंत एकूण कांद्यापैकी ६५ ते ७० टक्केच कांदा येथील शेतकºयांचा विकला गेला आहे. अजूनही साधारणत: दीड हजार टन उन्हाळी कांदा गावातील शेतकºयांकडे शिल्लक आहे. मात्र, कांदा सडण्याच्या समस्येबरोबरच कांद्याचे वजन कमी होणे, कांद्याला अंकूर फुटणे व काजळी चढणे अशा समस्या निर्माण होत आहेत.शेतकºयांची नाराजीकांद्याचा दर न वाढण्यास शेतकरी सरकारच्या कांदा आयात निर्यात धोरणास जबाबदार मानत असून विविध सोशल मिडीयावरून  नाराजी व्यक्त करीत आहेत. कांदा उत्पादकांची गळचेपी सरकारने केली असून शेतकरीविरोधी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी खचला असल्याची भावना शेतकºयांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे. याचा फटका सरकारला पुढील निवडणुकांत बसेल, असेही भाजीपाला व इतर पिकांच्या दराने निराश झालेला शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.जलपातळी खालावलीचिकसेत नवीन कांदा लागवडीला सुरूवात झाली आहे. मात्र, विहिरींची जलपातळी खालावली आहे. नविन लागवडीचा हंगाम चूकवू नये म्हणून गेल्या हंगामाचा उन्हाळी कांदा शिल्लक असताना व खरीप पिकही पुरेसे आलेले नसताना येथील शेतकºयांनी कांदा लागवडीचा हंगाम सुरू केला आहे. आठवडागणिक विहिरीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. म्हणून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी शेतकरी लागवड क्षेत्रात ठिबकसिंचन करून घेत आहेत. येथील बहुतांश शेतकरी नासिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यासह कळवण, देवळा तालुक्यातूनही नातेवाईकांकडून लागवडीयोग्य तयार रोप उपलब्ध करून लागवड करीत आहेत. नासिक जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या विहिरी आटल्याने साक्री तालुक्यातील शेतकºयांना रोप विक्री करून किंवा मोफत रोप पुरवठा करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे