शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

दराअभावी हजारो टन कांदा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:26 IST

साक्री तालुका : हंगाम चुकू नये म्हणून नवीन लागवडीला सुरुवात, जलपातळी घटली

लोकमत न्यूज नेटवर्कधमनार : कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. तसेच हंगाम चुकू नये म्हणून नवीन लागवडीला सुरुवातही केली आहे. मात्र, विहिरींची पाण्याची पातळी घटत असल्याचे चित्र दिसत आहे.नवरात्रीच्या कालावधीत उन्हाळी कांद्याला तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळनेर येथे दीड ते दोन हजार रुपयेपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र, आठवड्यानंतरच कांद्याचा दर दोनशे ते तीनशे रुपयांनी दररोजच घसरू लागल्याने कांदा उत्पादकांमध्ये चिंता पसरली. त्यातच दिवाळीत आठवडाभर कांदा खरेदी बंद होती. जुलै- आॅगस्ट महिन्यात कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने दरवाढीच्या अपेक्षेने शेतकºयांनी चाळीत साठवण केलेला कांदा काढलाच नाही. आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्येही तीच स्थिती असल्याने व सध्या प्रतिक्विंटल दीडशे ते तीनशे रूपये भाव उन्हाळी कांद्याला मिळत असल्याने आधीच कमी पावसामुळे दुष्काळाचे चटके सहन करणारा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.साक्री तालुक्यातील  धमनार, वसमार, दातर्ती, शेवाळी, बेहेड, कासारे, काटवान परिसरात, चिकसे-जिरापूर शिवारात उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर उत्पादित केला जातो. मात्र, पुरेशा दराअभावी आतापर्यंत एकूण कांद्यापैकी ६५ ते ७० टक्केच कांदा येथील शेतकºयांचा विकला गेला आहे. अजूनही साधारणत: दीड हजार टन उन्हाळी कांदा गावातील शेतकºयांकडे शिल्लक आहे. मात्र, कांदा सडण्याच्या समस्येबरोबरच कांद्याचे वजन कमी होणे, कांद्याला अंकूर फुटणे व काजळी चढणे अशा समस्या निर्माण होत आहेत.शेतकºयांची नाराजीकांद्याचा दर न वाढण्यास शेतकरी सरकारच्या कांदा आयात निर्यात धोरणास जबाबदार मानत असून विविध सोशल मिडीयावरून  नाराजी व्यक्त करीत आहेत. कांदा उत्पादकांची गळचेपी सरकारने केली असून शेतकरीविरोधी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी खचला असल्याची भावना शेतकºयांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे. याचा फटका सरकारला पुढील निवडणुकांत बसेल, असेही भाजीपाला व इतर पिकांच्या दराने निराश झालेला शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.जलपातळी खालावलीचिकसेत नवीन कांदा लागवडीला सुरूवात झाली आहे. मात्र, विहिरींची जलपातळी खालावली आहे. नविन लागवडीचा हंगाम चूकवू नये म्हणून गेल्या हंगामाचा उन्हाळी कांदा शिल्लक असताना व खरीप पिकही पुरेसे आलेले नसताना येथील शेतकºयांनी कांदा लागवडीचा हंगाम सुरू केला आहे. आठवडागणिक विहिरीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. म्हणून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी शेतकरी लागवड क्षेत्रात ठिबकसिंचन करून घेत आहेत. येथील बहुतांश शेतकरी नासिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यासह कळवण, देवळा तालुक्यातूनही नातेवाईकांकडून लागवडीयोग्य तयार रोप उपलब्ध करून लागवड करीत आहेत. नासिक जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या विहिरी आटल्याने साक्री तालुक्यातील शेतकºयांना रोप विक्री करून किंवा मोफत रोप पुरवठा करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे