शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

जिल्ह्यातील १५३ तलाव होणार गाळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:47 IST

लघुसिंचन विभाग : तलावांची साठवण क्षमता वाढणार, पावसाळ्यापूर्वी सर्व काम पूर्ण होण्याची शक्यता

धुळे : जिल्ह्यात लघुसिंचन विभागांतर्गत असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव, यांची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र यातील बहुतांश प्रकल्प हे गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे चांगले पर्जन्यमान होऊनही प्रकल्पाच्या क्षमतेप्रमाणे पाणीसाठा होत नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील १५३ तलावांमधील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यास प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती जिल्हा परिषदेतील लघुसिंचन विभागातून देण्यात आली.तलावांमधील साचलेला गाळ काढल्यास त्यांची पाण्याची क्षमता वाढणार आहे.जिल्ह्यातील गाव तलाव, पाझर तलाव हे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागांतर्गत येत असतात. त्यांची देखरेखीची जबाबदारी याच विभागाची आहे. जिल्ह्यात असलेल्या पाझर तलाव, गाव तलावांमध्ये गाळ साचून राहिल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाले. त्यामुळे तलावात जमा झालेला गाळ काढून तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे आहे.या अनुषंगाने गाळ मुक्त तलाव, गाळयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात तलावातील गाळ काढून तो गाव शिवारातील शेतात टाकण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५३ तलावातील गाळ काढण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यात धुळे तालुक्यातील ६०, शिरपूर तालुक्यातील १९, शिंदखेडा तालुक्यातील ४२ व साक्री तालुक्यातील ३२ गाव तलाव, पाझर तलावातील गाळ काढण्यात येणार आहे.तलावातील गाळ काढण्याची जबाबदारी अनुलोम संस्थेकडे आहे. त्यांचा शासनाशी करार झालेला आहे असे सांगण्यात आले.अनुलोम संस्थेने जिल्ह्यातील तलावाचे सर्वेक्षण केले. त्यातून संस्थेला जिल्ह्यातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आढळून आला.त्यामुळे अनुलोम संस्थेने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारया अभियानांतर्गत तलावातील साचलेला गाळ बाहेर काढण्यास सुरूवात केलेली आहे.गाळ काढण्यासाठी संस्थेचे जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिलेली आहेत. तलावातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. शेतकºयांनी हा गाळ शेतात टाकल्यास जमीनीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे.या संस्थेला गाळ काढण्यासाठी ११रूपये ९२ पैसे प्रति घनमीटरप्रमाणे काम देण्यात आले आहे असेही सांगण्यात आले. पावसळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Dhuleधुळे