शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धुळ्याहून अद्याप मुंबईसाठी अद्यापही बस सुरूच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 11:22 IST

पुण्यासाठी दिवसभरात फक्त पाच बसेस

आॅनलाइन लोकमतधुळे : अनलॉकच्या चौथ्या टप्यात आंतरजिल्हा बससेवा सुरू झालेली आहे. मात्र अजूनही राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसाठी धुळ्यातून एकही बस अद्याप सुरू झालेली नाही. तर पुण्यासाठी दिवसभरात फक्त पाच बसेस आहे. त्यामानाने औरंगाबाद, नाशिकसाठी पुरेशाप्रमाणात बसेस उपलब्ध आहेत.नाशिक, पुणे हे एस.टी. महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारे मार्ग समजले जातात. अनेक आगाराच्या बसेस याच मार्गावर धावत असतात.सध्या रेल्वेसेवाही सुरू नाही. त्यामुळे अनलॉकच्या टप्यात आता प्रवाशी महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. मात्र बसेसची अपुर्ण संख्येमुळे त्यांनाही नाईलाजास्तव खाजगी बससेवेकडे वळावे लागत आहे.आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत पुण्यासाठी फक्त पाच बसेस जात आह. यात अमळनेर आगाराच्या दोन, धुळे आगाराच्या दोन व शिरपूर आगाराच्या एका बसचा समावेश आहे.दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसाठी अद्यापही बस सुरू झालेली नाही. धुळेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातूनही मुंबईसाठी बसेस नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या भागातील प्रवाशांना मुंबईला जायाचे असल्यास त्यांना दोन टप्यातच प्रवास करावा लागत आहे.दरम्यान चोपडा आगाराची वाशी बस सुरू असून ती फक्त ठाण्यापर्यंत जाते. तर यावल, रावेर, धुळे, नंदुरबार, अक्कलकुवा येथून कल्याणसाठी बसेस उपलब्ध आहेत. मात्र थेट मुंबईपर्यंत एकही बस नाही. त्यामुळे धुळे आगारातून रात्रीच्यावेळेला मुंबईसाठी एक बस सुरू करावी अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे.नाशिकसाठी बसेस उपलब्धदरम्यान नाशिकला जाण्यासाठी सकाळी ५.३० वाजेपासूनच बसेस उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिकला जाण्यासाठी प्रवाशांना तूर्ततरी कुठलीही अडचण भासत नाही. तीच स्थिती औरंगाबादची आहे. या मार्गावरही पुरेशा प्रमाणात बस सुरू असल्याचे धुळे आगारातून सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे