शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

अवकाळीमुळे कांदा चाळी उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST

कोरोना महामारीत जीव मुठीत घेऊन जगत असतानाच नेरसह परिसरात गेल्या आठवड्यात दोनदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. ...

कोरोना महामारीत जीव मुठीत घेऊन जगत असतानाच नेरसह परिसरात गेल्या आठवड्यात दोनदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसमान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात कांदा काढणीनंतर जादा भाव मिळेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच चाळीत कांदा साठवून ठेवला होता. उन्हाळा कडक असल्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस येईल, अशी कोणतीही शक्यता शेतकऱ्यांना वाटली नव्हती. मात्र, या अस्मानी संकटाने रुद्र रूप धारण करीत शेतकऱ्यांच्या कांदा चाळी उद्‌ध्वस्त करीत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. एवढेच नव्हे, तर अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आता घरांची डागडुजी किंवा भाड्याचे दुसरे घर घेऊन नागरिकांना संसार थाटावा लागणार आहे.

शासकीय यंत्रणा सुस्त

नेर हे नऊ सजा महसूल मिळून तयार झालेले गाव आहे. गावाची लोकसंख्या ३५ हजारांवर असल्याने दोन तलाठी असून, एका तलाठ्याला अतिरिक्त पदभार दिला असून, मंडळ अधिकाऱ्यांचेही कार्यालय नेर-म्हसदी फाट्यावर आहे; परंतु हे दोन्ही अधिकारी आपल्या मनाप्रमाणे कार्यालयात येतात. कार्यालयात आल्यावर दैनंदिन दाखले, उतारे देण्याचे काम करून परत निघून जातात. अनेकदा शेतकरी व नागरिक आपल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी या कार्यालयात चकरा मारतात; परंतु ते वेळेवर उपस्थित नसल्याने वाट पाहून आपल्या कामाला निघून जातात; पण एकही अधिकारी स्वतःहून गावातील घरांचे आणि शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पुढे येत नाही. महसूल कर्मचाऱ्याच्या आदेशाने कोतवाल पंचनाम्यासाठी शेताच्या बांधावर जातो; परंतु महसूल तलाठ्याची भेट झाली तरी शासकीय कामे आहेत, धुळ्याला मीटिंग आहे, पंचानाम्याचे तेवढेच थोडे काम आहे, असे सांगून नागरिकांना निरुत्तर करतात. म्हणूनच नागरिक भरपाईपासून वंचितच राहत आहेत. बहुतांश सर्वच शेतकऱ्यांना आता शेतीची मशागत आणि अन्य कामांसाठी मजुरी देण्यासही पैसे राहिले नसल्याने अस्मानीबरोबरच सुलतानी संकटाने ते हताश झाले आहेत.

नुकसानभरपाईच्या ते प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले; परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेकडून झालेले नाहीत.

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

दोन वेळा अवकाळी पावसाने नुकसान झाले तरी एकाही लोकप्रतिनिधीने पुढे येऊन पंचनामा करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयीही नाराजीचा सूर आहे.

सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडल्याने मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. दिवसभर वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले.