शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

अवकाळीमुळे कांदा चाळी उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST

कोरोना महामारीत जीव मुठीत घेऊन जगत असतानाच नेरसह परिसरात गेल्या आठवड्यात दोनदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. ...

कोरोना महामारीत जीव मुठीत घेऊन जगत असतानाच नेरसह परिसरात गेल्या आठवड्यात दोनदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसमान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात कांदा काढणीनंतर जादा भाव मिळेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच चाळीत कांदा साठवून ठेवला होता. उन्हाळा कडक असल्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस येईल, अशी कोणतीही शक्यता शेतकऱ्यांना वाटली नव्हती. मात्र, या अस्मानी संकटाने रुद्र रूप धारण करीत शेतकऱ्यांच्या कांदा चाळी उद्‌ध्वस्त करीत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. एवढेच नव्हे, तर अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आता घरांची डागडुजी किंवा भाड्याचे दुसरे घर घेऊन नागरिकांना संसार थाटावा लागणार आहे.

शासकीय यंत्रणा सुस्त

नेर हे नऊ सजा महसूल मिळून तयार झालेले गाव आहे. गावाची लोकसंख्या ३५ हजारांवर असल्याने दोन तलाठी असून, एका तलाठ्याला अतिरिक्त पदभार दिला असून, मंडळ अधिकाऱ्यांचेही कार्यालय नेर-म्हसदी फाट्यावर आहे; परंतु हे दोन्ही अधिकारी आपल्या मनाप्रमाणे कार्यालयात येतात. कार्यालयात आल्यावर दैनंदिन दाखले, उतारे देण्याचे काम करून परत निघून जातात. अनेकदा शेतकरी व नागरिक आपल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी या कार्यालयात चकरा मारतात; परंतु ते वेळेवर उपस्थित नसल्याने वाट पाहून आपल्या कामाला निघून जातात; पण एकही अधिकारी स्वतःहून गावातील घरांचे आणि शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पुढे येत नाही. महसूल कर्मचाऱ्याच्या आदेशाने कोतवाल पंचनाम्यासाठी शेताच्या बांधावर जातो; परंतु महसूल तलाठ्याची भेट झाली तरी शासकीय कामे आहेत, धुळ्याला मीटिंग आहे, पंचानाम्याचे तेवढेच थोडे काम आहे, असे सांगून नागरिकांना निरुत्तर करतात. म्हणूनच नागरिक भरपाईपासून वंचितच राहत आहेत. बहुतांश सर्वच शेतकऱ्यांना आता शेतीची मशागत आणि अन्य कामांसाठी मजुरी देण्यासही पैसे राहिले नसल्याने अस्मानीबरोबरच सुलतानी संकटाने ते हताश झाले आहेत.

नुकसानभरपाईच्या ते प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले; परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेकडून झालेले नाहीत.

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

दोन वेळा अवकाळी पावसाने नुकसान झाले तरी एकाही लोकप्रतिनिधीने पुढे येऊन पंचनामा करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयीही नाराजीचा सूर आहे.

सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडल्याने मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. दिवसभर वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले.