शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे कांदा चाळी उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST

कोरोना महामारीत जीव मुठीत घेऊन जगत असतानाच नेरसह परिसरात गेल्या आठवड्यात दोनदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. ...

कोरोना महामारीत जीव मुठीत घेऊन जगत असतानाच नेरसह परिसरात गेल्या आठवड्यात दोनदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसमान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात कांदा काढणीनंतर जादा भाव मिळेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच चाळीत कांदा साठवून ठेवला होता. उन्हाळा कडक असल्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस येईल, अशी कोणतीही शक्यता शेतकऱ्यांना वाटली नव्हती. मात्र, या अस्मानी संकटाने रुद्र रूप धारण करीत शेतकऱ्यांच्या कांदा चाळी उद्‌ध्वस्त करीत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. एवढेच नव्हे, तर अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आता घरांची डागडुजी किंवा भाड्याचे दुसरे घर घेऊन नागरिकांना संसार थाटावा लागणार आहे.

शासकीय यंत्रणा सुस्त

नेर हे नऊ सजा महसूल मिळून तयार झालेले गाव आहे. गावाची लोकसंख्या ३५ हजारांवर असल्याने दोन तलाठी असून, एका तलाठ्याला अतिरिक्त पदभार दिला असून, मंडळ अधिकाऱ्यांचेही कार्यालय नेर-म्हसदी फाट्यावर आहे; परंतु हे दोन्ही अधिकारी आपल्या मनाप्रमाणे कार्यालयात येतात. कार्यालयात आल्यावर दैनंदिन दाखले, उतारे देण्याचे काम करून परत निघून जातात. अनेकदा शेतकरी व नागरिक आपल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी या कार्यालयात चकरा मारतात; परंतु ते वेळेवर उपस्थित नसल्याने वाट पाहून आपल्या कामाला निघून जातात; पण एकही अधिकारी स्वतःहून गावातील घरांचे आणि शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पुढे येत नाही. महसूल कर्मचाऱ्याच्या आदेशाने कोतवाल पंचनाम्यासाठी शेताच्या बांधावर जातो; परंतु महसूल तलाठ्याची भेट झाली तरी शासकीय कामे आहेत, धुळ्याला मीटिंग आहे, पंचानाम्याचे तेवढेच थोडे काम आहे, असे सांगून नागरिकांना निरुत्तर करतात. म्हणूनच नागरिक भरपाईपासून वंचितच राहत आहेत. बहुतांश सर्वच शेतकऱ्यांना आता शेतीची मशागत आणि अन्य कामांसाठी मजुरी देण्यासही पैसे राहिले नसल्याने अस्मानीबरोबरच सुलतानी संकटाने ते हताश झाले आहेत.

नुकसानभरपाईच्या ते प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले; परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेकडून झालेले नाहीत.

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

दोन वेळा अवकाळी पावसाने नुकसान झाले तरी एकाही लोकप्रतिनिधीने पुढे येऊन पंचनामा करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयीही नाराजीचा सूर आहे.

सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडल्याने मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. दिवसभर वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले.